आपल्या आजु बाजू नेहमीच ऐकायला येते
की, समाजात अप्रामाणिकपणा वाढला आहे, सर्वीकडे भ्रष्टाचार आहे. मात्र, आजुबाजूचे
लोक त्यांच्या व्यवसायात करीत असलेले प्रामाणिक काम पाहता मला समाजात अजूनही टिकून
असलेला प्रामाणिकपणा हा आशेचा किरण वाटतो आहे.
आजच उदाहरण सांगायच तर इस्त्री बिघडल्याने ती दुरुस्त
करायला म्हणून आमच्या भागातील ‘जैन इलेक्ट्रॉनीक्स’ च्या दुकानात गेलो. इस्त्री को क्या हुआ ? त्यांनी
विचारले ! मी म्हटले, ‘अचानक करंट होना बंद हो
गया’ त्यांनी लगेच इस्त्रीची तार हाती घेऊन इस्त्री चेक केली
. त्याचा जॅक चालत नसल्याचे निदान करून त्यांनी सांगितले , ‘जॅक
लावावा लागेल’ मी विचारले. ‘ खर्च किती
येईल’ त्यावर ते म्हणाले १५० रूपये. मी
म्हटले, ओके शाम में आकर ले जाऊंगा. सायंकाळी इस्त्री आणायला
गेलो तर मी त्यांच्याकडे ५०० ची नोट दिली त्यांनी मला ४०० रूपये परत केले. मी तिथून इस्त्री घेऊन निघतोच तो पुन्हा त्यांनी मला हाक मारली आणि
म्हटले, ‘मैने आपको
और पैसे देने बाकी है’ आणि त्यांनी मला ५० रूपये परत केले आणि म्हटले,
‘थोडा तार ढिला हुआ था तो ज्यादा खर्चा नही आया’. आता त्यांचा हा प्रामाणिकपणा बघून मला मात्र हायस वाटल.
आमच्या वस्तीत असणारा एक भाजी विक्रेताही असाच. तो कधीच
अव्वाच्या सव्व पैसे आकारत नाही. जेवढा नफा त्याला त्यात अपेक्षित असतो त्या पलीकडे
तो पैसे घेत नसल्याचा माझा अनुभव आहे. तसाच आमच्या वस्तीतील चांभार काका सुध्दा
कामाचे जेवढे पैसे होत असतील तेवढेच घेतात अवाजवी पैसे ते आकारत नाहीत. आणि मी
ज्यांच्या बद्दल नेहमीच उल्लेख करतो असे डॉ. पुरणप्रकाश शर्मा आणि त्यांचे डॉक्टर
कुटुंबिय तर स्वस्तात लोकांना उत्तम
आरोग्य सेवा देण्याचे प्रामाणिक काम करीत आहेत.
ही काही प्रातिनिधीक उदाहरणे जरी असली तरी ‘बुंद बुंद से सागर बनता है’ या न्याया प्रमाणे मला हे चित्र अतिशय आश्वासक आणि प्रेरणादायी वाटतं.
आपल्या समाजात प्रत्येकानेच आपली सेवा किंवा काम हे प्रामाणिकपणे केले तर समाजातील
नकारात्मक वातावरण नष्ट होण्यास चांगलीच
मदत होईल हा माझा विश्वास दृढ होतो.
०००००

No comments:
Post a Comment