Wednesday, December 31, 2014

लग्न




लग्न

आयुष्याचे वेग-वेगळे वळणं बालपण, तारुण्य, गृहस्थ जीवन आणि म्हातारपण. मी जेव्हां आयुष्याच्या एका वेगळया अर्थात लग्न या टप्प्यावर येऊन पोचलो आणि या टप्प्याला जाणीवपूर्वक सामोरे गेलो तेव्हा स्वानुभवाने लग्न या शब्दाची उकल करावी असा विचार झाला, तेव्हा हा लेखन प्रपंच. काय लिहायचयं हे मला माहित नाही पण, घेतलेल्या अनुभवातून काही तरी छान लिहीलं जाईल हा विश्वास.
    जन्मगांव अचलपूर येथे आई- बाबा, दादा- स्वर्गवासी ताई, मोठी आई- मोठे वडिल आणि त्यांचे मूल-मुली, आजोबा-आजी अशा संयुक्त कुटुंब पध्दतीत गेलेलं बालपण रमनीयचं. बाबांना लग्नात आजोबांनी(आईचे वडिल) दिलेली राजदूत गाडी त्याहून मनसोक्त केलेला प्रवास, आईने सकाळी उठल्या पासून ते झोपेपर्यंत अगदी शिस्तबध्द  व संस्कारी आयुष्याचा घालून दिलेला वस्तूपाठ, आजोबांचा मस्त मिजास स्वभाव आणि त्यातून आपसूक मिळतगेलेलं सामाजिक भानाचे धडे अधून-मधून आजीच्या मायेची पाखर अन यात स्वगृही व स्वग्रामी निघून गेलेलं ५ वी पर्यंतच शालेय शिक्षण. एका अर्थाने सतत घरी वास्तव्य करण्याचा हाच काळ (एका अर्थाने सुवर्णकाळ) परत माझ्या आयुष्यात आजपर्यंत आलाच नाही म्हणून हा उल्लेख आवर्जून करावासा वाटला.
    ५ वी नंतरच शालेय शिक्षण आजोळी विहीगांवला. येथून बालपणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात. स्वत:च्या घरापासून लांब राहण्याची ही आयुष्यातील पहिलीच वेळ अन त्या अर्थाने आयुष्यात नात्यांच  महत्व, तडजोडी, जीवन शिक्षण समजून घेण्याचा महत्वाचा टप्पाही म्हणेन मी याला. एक सुंदर घर, आपली माणसं त्यांनी दिलेले संस्कार, प्रेम अन शिस्त आयुष्याची मोठी शिदोरी ठरली. विहीगांव या खेडेगांवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक, राजकीय असे बरेच पैलू समजून घेण्यास येथील वास्तव्यात मदत झाली.
    महाविद्यालयीन जीवन हा ही उल्लेखनीय टप्पा म्हणावा लागेल. अंजनगांवसुर्जी येथील राधाबाई सारडा महाविद्यालयाचा बीए द्वितीय व तृतीय वर्षाचा विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना, युवा महोत्सव, विविध क्रिडा व वक्तृत्व स्पर्धांतील सहभाग आणि त्यातून माझी निर्माण झालेली स्वतंत्र ओळख. अन सोबत-सोबत रितसर धार्मीक शिक्षण घेऊन किर्तणकार म्हणून मिळवलेली पदवी आणि कार्यक्रम करण्यास केलेली सुरुवात, तदनंतर रस्त्याच्याकडेला पालात, आदीवासी वसतीगृहात अन झोपडपट्टीत राहणारे मुल-मुली यांना मोफत शिकविण्याचे कार्य, वयाच्या १८ व्या वर्षांपासून  जन्मदिन आणि गुरुपोर्णिमा हे सामाजिकभान राखत आजतागायत रक्तदानाने साजरा करण्याचा जाणीवपूर्वक राबविलेला उपक्रम हे ही महत्वाचे टप्पे. अमरावती , पुणे येथे पत्रकारितेचे शिक्षणपूर्ण करीत असतांना आलेले बरेवाईट अनुभव. अन २००८ मधे दिल्लीत पत्रकारिता क्षेत्रात करीअर करण्यासाठी सुरु झालेली लढाई. अखेर २०१३ मधे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या परिक्षेत दुसराक्रमांक पटकवून शासकीय नोकरी मिळवत दिल्लीतच नोकरीचा श्रीगणेशा करणारा मी. एकेकाळी वयाच्या २८ व्या वर्षी लग्न करण्याची योजना आखणारा मी. वयाच्या एकतीशीनंतर लग्न या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्याला सामोरे जाण्याचं धाडस करून या प्रसंगाला सामोरे जातो.
    आतापर्यंत जगलेलं आयुष्य आता पुढे काय होणार?, आजपर्यंत जपलेल्या आपल्या आवडी-निवडी, विचार, मित्र त्यांच पुढे काय?, दोनाचे चार हात झाल्यानंतर येणार्‍या कौटुंबिक, सामाजिक अशा असंख्य जबाबदार्‍या पेलवता येतील का?, जीवनसाथी म्हणून आयुष्यात येणारी मुलगी कशी असेल?  टयूनींग जूळेल का? असे एकानेक प्रश्न. अन समर्पक उत्तर शोधून अन मिळवून घेत हे आयुष्य पूर्वीसारखच सुंदर, सुबक अन व्यवस्थीत असावं हा माझा मानस पूर्ण होण्यासाठीच्या मी ठरवलेल्या योजना पूर्ण होतील का? यापैकी काही प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत इतर प्रश्नांची उत्तर मिळवू, तूर्तास घडयाळीत पाच वाजत आलेत. लग्न झाल्यानंतर झालेला एक महत्वाचा बदल म्हणजे ऑफीस सूटलं की घरी बायको वाट बघत असेल आता घरी जायला पाहिजे अस वाटनं अन माझी बायको माझी मैत्रीण वाटणं हा होय. बाकीच नंतर लिहीन वेळ मिळेल तसं So its time to say good bye……….
    आज यावर्षीच्या शेवटच्या दिवशी परत हा लेखन प्रपंच पुढे नेतो. मूळ मुदृा लग्न. लग्न जरी एका मुलाचं वा मुलीच होत असलं तरी कुटुंब ,नातेवाईक अन समाज अशा सर्व मान्यता या प्रसंगाला लागतात. मग या मान्यता पूर्ण करण्याकरिता करावयाचे सोपस्कार जसे मुलगा-मुलगी यांच्याकडून पाहणीचा कार्यक्रम ते साखरपुडा अन लग्नापर्यंतची प्रक्रीया ही रुढी, मान्यता(काही अंशी परंपरावदी अन रटाळ)याला चिटकूनच चालते. तिथे मुलगा किती सुशिक्षीत आहे वा नोकरीवर आहे असचं मुलीच्याही बाबतीत सारख्या परिस्थितीत किती काळजी घेतली जातं असावी हे मला अजूनपर्यंत न सुटलेलं कोड आहे जे मी अतिशय जाणीव पूर्वक उदधृत करतोय. दोन अनोळखी व्यक्ती काही पारंपरिक सोपस्कार आटोपून आयुष्याचा नवा डाव मांडतात. ती आणि तो ज्या कौटुंबिक व सामाजिक वातावरणात वाढले, त्यांचे भावविश्व हे पूर्णपणे भिन्न मग अशात लग्नकरून स्वीकारलेली जबाबदारी पेलताना सर्व गोष्टी सुरळीत व्हायला वेळ लागणार हे निश्चित.पण लग्नाआधीच या अनोळखी व्यक्तींनी उपलब्ध संवाद साधणांद्वारे एकमेकांना समजून घेतल तर निश्चितच सुरुवातीचा एकमेकांना जाणून घेण्याचा काळ तेवढा सुलभ होतो हे मी अनुभवांती सांगू शकतो.
    लग्नावर मोठया प्रमाणात खर्च होणारा पैसा अन झगमगाट याला फाटा देण्याचाच माझ्यासह माझ्या कुटुंबिंयाचाही विचार. त्यानुसार आम्हाला हे साधता आल. तूमच्यावर प्रेम करणारे सच्चे नातेवाईक अन मित्र या नाजूक प्रसंगी तूमच्या जवळ असावे अस वाटण सहाजिक आहे अन ते मला मिळाल याबाबत मी स्वत: खूप आनंदी आहे. आपल चांगल होत हे तुमच्या हितशत्रुंच्या डोळयात खूपत असेल ही शक्यताही नाकारता येत नाही तसं काहीस चित्र आढळून आलं. पण आपल्याला त्याच काय? लोक आपल्याशी कसेही वागूदेत पण आपण आपली माणुसकी सोडायची नाही हा आजपर्यंतचा माझा फॉर्मुलाच यावर रामबाण उपाय ठरला. एकंदरीतच लग्नाच्या प्रसंगाला सामोरे जाताना आई-वडिल व आपल्यावर खर प्रेम करणारे नातेवाईक अन मित्र यांच्या साक्षीने जीवनाच्या नवीन टप्प्याला सामोरे जाताना तेवढं टेंशन नाही वाटतं. आपल चांगल होण्यासाठी त्यांना सतत असणारी तळमळ एक सुखद आंनद अन आत्मविश्वास देवून जाते. तुमचा जोडीदार सुशिक्षीत अन समुजदार असेल तर लग्नानंतरच नवरा बायकोच नात जगण्याचं आलेल अप्रत्यक्ष टेंशन आणखी हलकं होतं हाही माझा अनुभव.
    लग्न या विधिच्या पुढे अन मागे अस सर्व गोष्टींना वेळ देण्यासाठी लागणारा कालावधी हा १ महिन्याचा असणे अतिशय योग्य होत पण १८ दिवस सुटी उपभोगून १३ दिवस आधिच ऑफीस जॉईन करण्याचा मधेच आलेला क्रायसीसही उल्लेखनीय. एरवी महाविद्यालयीन जीवनापासूनच क्रायसीसमधे योग्यरितेने जबाबदारया पार पाडणारा मी यावेळीही विचलीत न होता सर्व गोष्टींना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होतो. मात्र बायकोला तिच्या अन मला माझ्या आई वडिलांना पुरेसा वेळ न देण्याचं शल्य आहेच. पण नोकरी अन त्याला जोडून आलेल्या शक्य शक्यता सांभाळून आम्हा उभयतांच्या कुटुंबियांनी आम्हाला समजून घेण्याच दाखवलेल धाडसही आमचा आत्मविश्वास वाढवून गेला.

    सुंदर आयुष्य जगायला लागत तरी काय. सुंदर मन, एकमेकांना समजून घेण, अन एकमेकांचा आदर करण त्यातूनच आपल जीवन सुंदर होत जात अन आयुष्यातील लग्न हा टप्पाही सुरळीत पार पडून त्यानंतर येणार आयुष्य सुखर होत असा माझा समज यापुढे तो प्रत्यक्ष अनुभवताना काय होत ते बघुया तुर्तास येथे लिखानास विराम देतो.                           

Saturday, May 31, 2014

राजधानीत मी पाहिलेले गडकरी



राजधानी दिल्लीत आलो. राजकीय पत्रकारितेतील बर्‍याच बारिक सारिक गोष्टींचा गुंता आणि त्यातून जन्माला येणारी बातमी अस सर्व जाळ समजून घेत असतानाच दिल्लीत मराठी माणूस देशातील दुसर्‍या क्रमांकाचा राजकीय पक्ष असणार्‍या पक्षाचा अध्यक्ष होतो आणि नंतर केंद्रात मंत्री होतो. ती मराठी व्यक्ती आहे नितीन गडकरी. दिल्लीत त्यांनी दोन मोठया पदाचा पदभार स्वीकारतानाचा मी साक्षीदार आहे. आज मी पाहिलेल्या गडकरींबदृल लिहाव अस वाटल आणि हा लेखन प्रपंच.
      वर्ष 2009 सायंकाळची वेळ साधारणत: नोव्हेंबरचा महिना भाजपचे मुख्यालय 11, अशोक रोडलाच लागून असलेले अरूण जेटली यांचे 9 , अशोक रोड वरिल निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांसोबत भाजपच्या नेत्यांच्या खलबती सुरु होत्या. सर्वांना या बैठकीत काय चर्चा सुरु असेल याची चुणुक लागली होती. बराच वेळ लोटल्यानंतर सायंकाळच्या वेळेस रामलाल हे भाजपचे तत्कालीन खजीनदार आणि संघाचे विश्वासू बाहेर आले त्यांच्या पाठोपाठ एक व्यक्ति बाहेर आली. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली भाजपचे अध्यक्ष म्हणून तूमच नाव पुढे येत आहे त्यावर उत्तर होत मै पार्टी का एक मामुली कार्यकर्ता हू दिवारों पर पोस्टर चिपाकाने का काम करते करते पार्टी में आगे बडा महाराष्ट्र में pwd मंत्री के तौर पे काम करने का मौका मिला. नाही मै इस से पहले कभी ज्यादा दिल्ली में आया हू . तो मुझे दिल्ली की आदत नही है. ना मुझे यहा की राजनिती से ज्यादा ताल्लूक रहा. त्यांच्या या उत्तराने ते भाजपचे अध्यक्ष होतील आणि ते यशस्वीपणे आपला कार्यकाळ पार पाडून दिल्लीवर छाप सोडतील अस वाटलही नव्हत. पण बातमी लिहायची होती म्हणून दिसत्या परिस्थितीवर बातमी लिहीली.
      पुढे डिसेंबर 2009 मध्ये भाजपचे अध्यक्ष म्हणून नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यांनी 9, अशोक रोड वर पत्रकारांसमोर केलेले वक्तव्य सतत 3 वर्ष देशभरातील विविध भाषणातून ऐकायला मिळाले. पत्रकारांकडून त्यांच्यावर होत असलेली शेरेबाजी अण पक्ष मुख्यालयातील कर्मचारी नेत्यांचा आडमुठेपणाचे वागणे नी बोलणे मी स्वत: बघीतले होते, पण गडकरींनी आपल्या कतृत्वातून या सर्वांची तोंड बंद केली.  त्यांच्या कार्यकाळात भाजपात अनेक प्रकोष्ठ (सेल) सुरु केलेत त्यांनी पक्षातील तज्ज्ञ नेत्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घेत काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार विरोधात 2-जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोलगेट घोटाळा आदींसह विविध घोटाळयांची माहिती बाहेर काढून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी गतीमान केले. तर दुसरीकडे भाजप पक्षसंघटनेत नवी उर्जा निर्माण केली. त्याचे सुपरिणाम पक्षाला मिळालेच आणि देशानेही बघीतले त्यामुळे केवळ महाराष्ट्रात ओळख असणारे गडकरी हे खर्‍या अर्थाने राष्ट्रीय नेते झाले.
      गडकरींचे स्थान भाजपमध्ये कमालीचे वाढले पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतही ते आता महत्वाची भूमिका बजावू लागले. वर्ष 2014 मध्ये पक्षाने त्यांना नागपूर या गृह जिल्हयातून खासदारकीची उमेदवारी दिली आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ त्यांनी सर करत 2 लाख मताधिक्याने विजय मिळवला. आता केंद्रात भाजपला 282 च्या जादुयी आकडयाच्या मताधिक्याने भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निर्माण झालेल्या मंत्रिमंडळात गडकरी मंत्री झाले. खात मिळाल दळणवळण, नवनवन व राजमार्ग मंत्रालाय.

      त्यांनी भाजपच्या अध्यक्षपदाचा आणि आता केंद्रीय मंत्री पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा एक साम्य मी अनुभवले. ते म्हणजे गडकरींची अर्धांगिणी कांचनताई गडकरी आणि मुलगी केतकी हया यावेळी आवर्जून उपस्थित असणं, नी, गडकरींच मीशन ईगव्हर्नन्स राबवू आणि पारदर्शी कारभार करू हे ठाम व तितकचं आत्मविश्वासानं प्रसार माध्यमां समोर प्रतिपादन करणं Hats up गडकरी जी.

Tuesday, March 4, 2014

शासकीय नोकरीतील एक वर्ष : ‘एक सिंहावलोकन’



शासकीय नोकरीतील एक वर्ष : एक सिंहावलोकन
(माझ्या लॅपटॉपवर काही शब्द उमटत नसल्याने या पोस्टमधे व्याकरणीक चुका झाल्याचे आपणास जाणवेल त्यासाठी क्षमस्व, पण कधी-मधी वेळ मिळताच त्या चुका दुरुस्त करेल.)
आज दिनांक 27 फेब्रुवारी 2014 ला आम्ही कार्यालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. राष्ट्रीय नाटय विद्यालयाचे संचालक प्रा. वामन केंद्रे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून होते. रात्री मस्त पु.लं. चे नाटक अंतु बर्वाअण नारायण बघीतले. उद्या सकाळीच ऑफीस असल्यानं झोपण्याकडे मोर्चा वळवला. आज झोप येईना. वीजांचा कळकळाट होतोय, पाऊस सुध्दा सुरु झालाय अण झोपायचा प्रयत्न करतोय. पण, कसली मेली झोप यायच नाव नाही. मग मला आठवल मी माझ्या ब्लॉगवर लिहीलेली पहिली पोस्ट(माझ्या आठवणीतील पाऊस) सुध्दा अशाच 2009 च्या एका मध्यरात्री दिल्लीत कोसळलेल्या पावसाच्या वातावरणात लिहीली होती.  आज नेमकं तसच वातावरण आहे पण, वर्ष 2014 अण दिल्लीत पत्रकारिता व नोकरी करण्यासाठी सुरु झालेल्या तत्कालीन प्रवासाला आता योग्य वळण लागलय.‍ या शहरात 5 वर्ष पत्रकारितेच्या विविध प्रांतात मुक्त संचार केल्यानंतर मी महाराष्ट्र शासनाच्या नोकरीत माझ्या आवडत्या व्यवसायात स्थीर झालो. मी शासकीय नोकरीत येवून 18 फेब्रुवारी 2014 रोजी बरोबर एक वर्ष पूर्ण झाल. तेव्हा या कालावधीचे सींहावलोकन हा विषय निवडलाय मी. Sorry , बर का ! थोड अपडेट करतो तुम्हाला. घडयाळीत रात्रीचे 1 वाजले आहेत. आता पावासाचा अण वारयाचाही जोर वाढलाय, वीजांचा कळकळाट अण गारपीटही होत आहे भोवताली.  
       या एक वर्षात यापूर्वी सरकारवर सतत ओरखडे ओढणारा मी, सरकारी पध्दतीची बातमी लिहायला शीकलो. बातमी लिहीताना बातमीतील अचूक आकडेवारी, वक्त्यांचे कोट असणे गरजेचे असते. बातमी उशीरा गेली तरी चालेल पण, ती अचूक असावी कारण आपण देत असलेली माहिती ही शासनाचा भरवशाचा स्त्रोत म्हणून ओळखली जाते याच महत्व प्रकर्षाने पटल. बातमी संदर्भात या एक वर्षाच्या काळात घडलेल्या 2 चुका अण त्यासाठी झालेली ‍शीक्षा हे आधी प्रांजळपणे कबुल करतो. पण त्यात पूर्णपणे मी दोषी नसल्याच वास्तवही कथन करतो. उत्तराखंडमध्ये 2013 च्या जून महिन्यात आलेली नैसर्गीक आपत्ती अण आमच्या कार्यालयाने यावेळी उत्तराखंडतून परतलेल्या अण महाराष्ट्रातील आपल्या स्वगृही जाण्यासाठी आतुर असणारया भावीकांसाठी दिल्लीत सुरु केलेल्या मदत समन्वय कक्षातील कामाचा वेगळा अनुभव. त्यातही प्रसारमाध्यमांना अचूक माहिती पुरवणे अण मदत समन्वय कक्षाच्या कार्याच्या प्रसिध्दीची धुरा सांभाळण्याचा अनुभव वेगळाच. तसेच, आमच्या कार्यालयातर्फे महाराष्ट्राच्या पश्चीम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खांदेश, मराठवाडा या भागातील पत्रकारांसाठी आयोजित दिल्ली अभ्यास दौरयात समन्वयक अण प्रसीध्दीची धुरा सांभाळण्याचा अनुभव उल्लेखनीय ठरला. हित शत्रुंच्याही नव्याने ओळख्या झाल्या. पण, या नोकरीमुळे स्वत:च वेगळ स्थान निर्माण केल्याचा क्षण व त्यामुळे जन्मदात्या आई –वडिलांच्या चेहरयावर झळकत असलेल्या आंनदातून डोळे सूखावून जातात.   (घडयाळीत मध्यरात्रीचे अडिच वाजलेत. पाऊस पूर्णपणे थांबलाय. अण जोराची झोप येतीय मला. उर्वरीत भाग पूर्ण करेल वेळ मिळताच)
                शासकीय नोकरीच्या पहिल्याच दिवशी वरिष्ठ पत्रकार अण कथाकार अशोक थोरात यांना 19 फेब्रुवारी 2013 ला मराठीतील साहितयिक योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळणार होता. लगेच त्यांना गाठल अण मुलाखत केली, नी झाली सुरुवात नोकरी नी कामाला.‍ दिल्लीतच पत्रकारिता केली असल्यानं पत्रकारांच मन, त्यांचे बलस्थान, त्यांच्या अडचणी-मागण्या अण पत्रकारितेचा ground चा असलेला अभ्यास अण ज्या कार्यालयात नोकरी करतोय तेथील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी अण वातावरणाशी familiar असल्यान सुरुवात जोरात झाली. पण, माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना आलेल्या फळामुळे पत्रकारितेतील काही हीत शत्रूंच्या अण संपर्कातील सभ्यतेचा मुखवटा घालून मीरवणारया हीत शत्रूंचाही जवळून परिचय झाला. त्याचा एक किस्सा मुददाम सांगतो. माझं selection ही व्हायच होतं तेव्हा, एकाने मी दिल्लीत येईल अण त्याच महत्व कमी होईल या विचाराने घाबरून मला सल्ला दिला तू कामासाठी मुंबईच कार्यक्षेत्र माग, त्याचा तूला फायदा होईलत्यावर संबंधीताला मी उत्तर दिल, अजून selection प्रक्रीयेतील टप्पे बाकी आहेत. मी लेखी परिक्षाच उत्तीर्ण झालोय. बघू पुढच पुढे, अण राहिला प्रश्न कुठे काम करायचा? तर मी कुठेही काम करू शकतो तेवढा आत्मविश्वास आहे मला. मग काय सर्व हीत शत्रूंचे चेहरे समोर येत गेले पण त्याचा अंदाज घेत त्यास कस सामोर जायच याची रणनिती करण्याच कसब हळू हळू  शिकतोय त्यात मनस्वी अण हीत चिंतकांची खूप मदत होतीये.      
 उपलब्धी :
1)      आई वडिलांच्या चेहर्‍यावर आनंद. दिर्घ काळाच्या मेहनतीला आलेल फळ.
2)      महाराष्ट्र सदनात स्थापीत उत्तराखंड मदत समन्वय कक्षात 24x7 काम करण्याच्या अनुभवातून सरकारी नोकरीत मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात रमून समाजाची उत्तम सेवा करू शकता हा ‍विश्वास आला. कार्यालयातील अधिकारी-कर्मचारयांचा मेहनतीचा अण कौशल्याचा जवळून परिचय झाला.
3)      दिल्ली अभ्यास दौरयासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागातून येणार्‍या पत्रकारांकडून तेथील सामाजिक, राजकिय, ‍आर्थीक व संस्कृतीक  स्थीती त्यांच्य नजरेतून समजता आली. त्यांच्याशी मैत्री झाली अण नवा जनसंपर्क वाढला. दौरयाचा समन्वयक अण प्रसिध्दीची जबाबदारी मीळाल्याने स्वत:ला सीध्द करण्याची संधी मिळाली.
4)      फण-फणत्या तापात अण विपरीत वातावरणात स्वत: फिल्ड वर जावून दिवसाला 3-3 बातम्या करण्याचा अनुभव स्वत:तील मेहनतीचा टेम्पो कायम असल्याचा आत्मविश्वास दूनावून गेला.
5)      कार्यालयातर्फे आयोजित विविध कार्यक्रमात सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन या व्यतिरीक्त गावाकडे गेल्यावर विविध शाळा, महाविद्यालये, धार्मिक आयोजन,सामाजिक संस्थांमध्ये भाषण, डॉक्युमेंटरी, व्याख्यानाच्या माध्यमातून नोकरीतील 1 वर्षाच्या काळात आत्मविश्वासाने केलेल काम.