Monday, November 23, 2015

घेई छंद मकरंद ………… सामाजिक जाणीव जपणारा व जगणारा कलंदर कलावंत मकरंद अनासपुरे


           

कलावंत म्हटला की चित्रपट, सिरीयल, विविध शोजच्या चित्रीकरणात अत्यंत व्यस्त असलेला माणूस. पण, या गोष्टीला फाटा देत ज्या समाजाने आपणास मोठ केल त्या समाजाच्या दु:खात सहभागी होऊन दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या मदतीला धाऊन जात समाजबांधवांना सावरण्यास पुढे येणारा सच्चा कलावंत अशी ओळख असणारा मराठीतील सुप्रसिध्द कलावंत मकरंद अनासपुरे. सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांच्या प्रकट मुलाखातीच्या निमित्ताने कार्यक्रमात त्यांना थेट प्रश्न विचारण्याचा आणि कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचा दुर्लभ योग जुडून आला.
  या कार्यक्रमात मकरंदला माझा थेट प्रश्न, मराठी चित्रपट क्षेत्रातून फक्त तूम्ही आणि नाना पाटेकर अन ज्या मुंबईत बालीवूड इंडष्ट्री असून सर्वांना या इंडष्ट्रीन मोठ केल तेथून फक्त अक्षय कुमार या नटानेच सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच दु:ख पुसण्याकरिता पुढाकार घेतला. इतरांनी मात्र हे औदार्य दाखवल नाही. आपण यास काय म्हणाल?
 यावर त्यांच उत्तर उपरोधिक अन अगदी सरळसोट म्हणूनच पटणार होत ते म्हणाले, नाना ,अक्षय आणि मी असे आम्ही तीघ वेडे आहोत. इतर वेडेही आम्हाला जुडतील याची वाट आम्ही बघतो आहे. आणि सामाजिक बांधिलकी हा व्यक्तिसापेक्ष भाग आहे त्यामुळ आपण इतरांना दोषी ठरवू शकत नाही.’ या उत्तरानंर मकरंद ने सर्वांसमक्ष माझयावरच गुगली टाकत मला प्रश्न केला, तूम्ही कोणता व्यवसाय करता? मी उत्तरलो पत्रकार आहे, शासकीय सेवेतत्यावर मकरंद म्हणाला तूम्ही किती योगदान दिल याकामी? मी म्हटल मी तर दिल नाही पण मी वेगळया पध्दतीने सामाजिक जबाबदारी जपतोय . ते  आणखी विस्ताराने सांगायची ती वेळ नव्हती म्हणून थांबलो. अन कार्यक्रम संपताच स्टेजवर मकरंदला गाठल. त्यांना सांगितल सर मी वयाच्या १८ व्या वर्षापासून रक्तदान करून सामाजिक जबाबदारी जपण्याच काम करतोय. रस्त्याच्याकडेला पाल बांधून जीवन जगणा-या परिवारातील लहान मुला मुलींना शिकविण्याच काम ,झोपडपटटीत जाऊन तेथील मुला मुलींना शिकविण्याच काम करत मी सामाजिकभान जपलय. मकरंद म्हणाले, वा छान’.  मी त्यांना म्हणालो सर, ‘ आपल्या समाजात खुप होतकरू तरूण आहेत त्यांनाही आपण मार्गदर्शन करण्याची गरज असल्याच मला सारख जाणवत अन ते कामही मी करीत असतोआता मात्र मकरंद यांना हे मत पटल नाहीते म्हणाले, ‘ प्रत्येकात सामाजिक जाणिवा असतात व त्याच्या त्यानेच त्या स्वत: जागवायच्या असतात अन आपण काही मार्गदर्शकाच्या भूमीकेत राहून काम करायची गरज नाही let do  them .
मकरंद अनासपुरे यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरु झालेला नाटय क्षेत्रातील प्रवास उलगडताना ब-याच हीडन बाबी कळल्या. ते शिकत असलेल्या महाविद्यालयात कला शाखेतील मुलांचा नाटय स्पर्धांवर असलेला एकाधिकार मोडून काढण्यासाठी विज्ञान शाखेतील मुलांचे प्रतिनिधीत्व करून मोडीत काढलेली एकाधिकारशाही, त्यानंतर विद्यापीठांतर्गत व अन्य नाटय स्पर्धांमधे मिळविलेले विविध पुरस्कार, राष्ट्रीय युवा महोत्सवात मिळवेलेले सुवर्ण पदक असे विषय उलगडतानांच मकरंद यांनी नाटक आणि राजकारण हा विषयही सांगितला. अर्थात ते ज्या गृपमधे काम करायचे त्याचा प्रमुख हा गृप मधील कलाकारांना कामाचा मोबदला म्हणून पैसे देत नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. आणि येथूनच त्यांनी त्या गृप ला सोड चिठ्ठी दिली. मग मंगेश देसाई आणि मकरंद अनासपुरे असा दोघांचाच गृप तयार करून त्यांनी सादर केलेले धम्माल द्वीपात्री प्रयोग. या प्रयोत रंगमंच्च सज्जा, प्रकाश संयोजन नसल्याने त्यांच्यावर होत असलेली टिका. यातून त्यांनी प्रकाश व्यवस्था, रंगमंच सज्जा याबाबी सांभाळत स्वत: दिग्दर्शन केलेले मसन जोग्याच्या चित्तर कथेवरील नाटक त्यात ऐन वेळी माचिसची काळी न सापडल्याने चिताच न पेटल्याचा प्रसंग असे एकाहून एक किस्से उलगडले जात होते.
 मकरंद आणि नानांची भेट व येथूनच मकरंद यांची मुंबईत सुरु झालेली जगण्यासाठीची धडपड थक्क करून सोडणारी आहे. नानांनी एका नाटय स्पर्धेत कुणा मोठया दिग्गज कलाकाराच्या सांगण्याहून मकरंद अनासपुरे आणि मंगेश देसाई यांचे नाटय बघण्याचा प्रसंग, आमदार निवासातील मकरंद यांचे दिवस, मधेच ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांचा किस्सा ज्यात त्यांनी मकरंद अनासपुरे यांना आमदार निवासावर पडून राहण्यापेक्षा NCPA (National Council Performing Art) ला येऊन पुस्तक वाचण्याचा दिलेला सल्ला त्यातून आयुष्याला मिळालेली कलाटनी. १९९४ पासून सुरु असलेल्या स्ट्रगल ला २००६ मधे कायद्याच बोला या  चित्रपटातून मिळालेला ब्रेक व त्यानंतर ३ वर्षात ४४ चित्रपट करण्याचा मकरंद यांनी केलेला विक्रम हाही महत्वाचा टप्पा त्यांनी उलगडला. पत्नी शिल्पा, मुलगी इंद्रायणी आणि मुलगा इंद्रनील यांना त्यांचा वेळ देत कौंटुबिक जबाबदारी पार पाडत असलेला मकरंद आणि दुस-या बाजुला मराठवाडा व विदर्भातील आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीला नाना पाटेकरांच्या मदतीने  NAAM  या संस्थेच्या माध्यमातून सुरु केले काम म्हणजे मकरंद यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा आलेख.   
विनोदी आणि गंभीर भुमीका करत मराठवाडयाची आपली अस्सल भाषा जपणारा व तेवढाच कौंटुबिक– सामाजिकभान जपणारा कलंदर कलावंत मकरंद अनासपुरे यांची भेट अवस्मरणीय ठरली.        
                                                       *****


डॉक्टर शर्मा कुटुंबिय आणि त्यांची सामाजिक बांधिलकी






स्वत: गौरव शर्मा एमबीबीएस आणि पेडीयाट्रीक डॉक्टर तर त्यांची पत्नी डॉ. दिपीका शर्मा, एमबीबीएस आणि फॅमिली फिजीसियन, भाऊ डॉ. अनशुल शर्मा डेंटिस्ट आणि वडील डॉ. पुरन प्रकाश शर्मा सुध्दा एमबीबीएस आणि पेडीयाट्रीक डॉक्टर आणि प्रसिध्द सर्जन.कमीत कमी फी आकारून रूग्नांना बर करण्याचं काम अव्याहतपणे करणा-या या डॉक्टर कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी थक्क करून सोडणारी आणि तीतकीच कौतुकास्पद आहे.
क्लीनीक म्हटल की भला मोठा हॉल वा इमारत.इथे प्रवेश करताच तुम्हाला दिसेल रिशेप्शन. मग तासन तास बसाव लागणार (रूग्ण यातच अर्ध मेला होणार) अस सर्व वातावरण असत. पण शर्मा यांच्या क्लीनीक मधे अस काहीच नाही. फक्क १०x१० ची एक रूम. पण सर्वच सुविधांनी सज्ज. एसी, टीव्हीसह उपचारासाठी लागणारी आधुनिक उपकरण इथे बघायला मिळतात. एवढच काय क्लीनीक मधे येणा-या रूग्णांसाठी टाकण्यात आलेल्या सोपेवजा आसणाखाली औषधांचे बौक्स आहेत. अर्थात कमी जागेत उत्तम व्यवस्थापन करून त्यांनी हे क्लिनीक नीट नेटक ठेवलय. या क्लीनीकच वैशिष्टय अस की रूग्णाला सुई टोचली जात नाही. औषध स्वत: डॉक्टरकडचीच. तपासणी आणि औषधांची(चार टका) फी फक्त १०० रूपयें. (जी आत्तापर्यंत फक्त ५० रूपयेच होती.). त्यात जमेची बाब ही की रूग्णांना शंभर टक्के आराम मिळणार. त्यात हे डॉक्टर कुटुंबिय रूग्णांची आस्थेन आणि नम्रपणे चौकशी करतात. रूग्णाला त्याच्या आजाराबददल नीट समजावून सांगतात आवश्यक तेव्हाच बाहेरून तपासणी वा औषधांचा सल्ला देतात. हे सगळ मी कस सांगू शकतो हा प्रश्न पडला असेल तुम्हाला कदाचित तर त्याच उत्तर ही देवून टाकतो. ते अस की डॉक्टर जेव्हा रूग्णाला तपासतात तेव्हा ते सर्वांसमोरच तपासतात त्यामुळे वेटींगवर असलेले रूग्ण आणि प्रत्यक्ष तपासणी सुरु असलेले रूग्ण एकमेंकाना पाहू ऐकू शकतात आणि मी ही रूग्ण म्हणून या क्लिनीक मधे गेल्यानंतरच्या माझया निरीक्षणाहूनच हे सांगतोय.
आजचाच ताजा किस्सा सांगतो. मला ताप असल्यान मी क्लीनीक मधे गेलो तर इथे असलेल्या बाकांवर सर्व रूग्ण बसून होते त्यात बालरुग्णच जास्त होते. मी ही अशात क्लीनीक मधे शिरलो अन मोकळी जागा दिसताच तिथे बसलो. यावेळी पश्चिम बंगालहून दिल्ली भ्रमंतीसाठी आलेल्या एका दांपत्याच्या लहान मुलाला डॉक्टर तपासत होते त्यानंतरचा रूग्ण अर्थातच इथे उपस्थित दुस-या दांपत्याच छोट बाळ होत. बाळाला भूक लागल्यान ते आईला ओढतान करत होत आईनेही क्लीनीकमधली कमी जागा लक्षात घेता पाठ मोरी होऊन मुलाला पाजण्यास सुरुवात केली.तोच डॉक्टरच साहेबांच लक्ष गेल त्यांनी लगेच बाळाच्या वडीलाला क्लीनीक मधील पडदा पाडण्यास सांगितल तस करताच आईने आपल्या मुलाला वीना तक्रार जेवू घातल.तितक्यात वेटींग लिस्टमधे असलेल्या म्हाता-या आंटी डॉक्टरांपुडे जावून बसल्या अन सांगत्या झाल्या, मुझे ना कल से कुछ खातेही उल्टीया होने लगी है बहुत तप्लीक है. त्यावर डॉक्टरांनी थोडा विचार करत आपल्या पुढयात असलेल्या गोळयांतील ४ गोळयांची स्ट्रीप्स देत त्या कशा घ्याव्या हे समजावून सांगितल. त्यावर हिरमुसला चेहरा करत आंटी म्हणाल्या बस इतनीशी दवाई. मग डॉ. गौरव शार्मा म्हटले कोई घबराने वाली बात नही आपको जो शिकायत है उसीके वजह से आपको यह तकलीफ हुई है ये दवाई या खाने से ठिक होजाएगा चिंता करने की कोई बात नही. मग आंटीने लगेच पैसे काढण्यासाठी आपल्या जवळची पैस्यांचा मळकट बटवा काढला त्यावर डॉक्टर म्हणाले इसकी कोई जरूरत नही आंटीजी. अस म्हणताच त्या आंटीने कोणताही विचार न करता डॉक्टरांच्या डोक्यावर हात ठेवत जितेरहो बेटे असा आशिर्वाद दिला आणि डॉक्टरांनी आपली दोन्ही हात जोडत या आशिर्वादास नम्र प्रतिसाद दिला.हे चित्र माझया प्रमाणेच क्लिनीक मधे बसलेले अन्य रूग्ण बघत होते. संक्षिप्तपणे सांगायचे झाल्यास मोठाल्या तामझामच्या आजच्या दुनियेत देखाव्याला महत्व आलय आणि डॉक्टर व रूग्ण यांच्यात अवास्तव अंतर वाढत चालल आहे. त्यात सामाजिक बांधिलकी तर कोसो दूर आहे. पण शर्मा  डॉक्टर कुटुंबिय याला मोठा अपवाद आहेत आणि ते सामाजिक बांधिलकी जपत रूग्ण सेवा करीत आहेत.         
आम्ही ज्या पहाडगंज भागात राहतो तिथेच या शर्मा डाक्टर कुटुंबियांनी आपली कर्मभूमी निश्चित केली आहे. या भागात सर्वच आर्थिक स्तरातील लोक आहेत गरीब, मध्यमवर्गीय तर श्रीमंत असे सर्वच. मग पहाडगंज भागातच दोन ठिकाणी हे कुटुंबिय रूग्ण तपासणी करतात. मोतीया खान भाग जिथे श्रीमंत लोक आहेत आणि दुसरा म्हणजे मुलतानीढांडा हा भाग जिथे मध्यमवर्गीय व गरीब आणि बहुतांश वेळा दिल्ली फिरायला आलेल्या पर्यटक रूग्णांचा राबता असतो(कारण इथे मोठया प्रमाणात हौटेल्स आहेत). डॉ. गौरव आणि दिपीका या दांपत्यांनी सर गंगाराम व तत्सम नावाजलेल्या इस्पितळात काम केल आहे त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याच्या भरवशावर त्यांना पैसा कमविणे सहज साध्य होते पण त्यांनी धन सेवे पेक्षा जन सेवेला जास्त महत्व देण्याचा निर्णय घेतला. ते सकाळी ९ ते ११ मुलतानी ढांडा भागात आपली सेवा देतात तर यानंतर ११ ते १ या वेळेत वडील डॉ. पुरनप्रकाश शर्मा हे रूग्ण सेवा करतात. याच क्लिनीक मधे सायंकाळी ५ ते ७ वेळेत पुन्हा हे दांपत्य आपली सेवा देतात तर वडील डॉ. पुरनप्रकाश शर्मा हे ७ ते ९ अशी सेवा देतात. हे दांपत्य सकाळी ११ते १ आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मोतीयाखान येथील क्लिनीक मधे रूग्णसेवा करतात. जिथे डॉ. अनशुल शर्मा सुध्दा सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ अशी रूग्ण्‍ा सेवा करतात.
            आजार झाला अन व्यक्ती डॉक्टरकडे गेलाच नाही अस चित्र आज-काल फारच विरळा बघायला मिळत. पण, रूग्ण मिळतात म्हणून त्यांना विविध चाचण्या आणि भल्या मोठया औषधांची यादी लिहून देणा-या डॉक्टर्सचा मोठा सूळसुळाट आहे.मोठया शहरात तर एक मोठ इस्पितळ त्यात विविध विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स त्यात इस्पितळाची नॉर्मल फी मग विशेष फीज तिथेच विविध चाचण्यांची सोय असा बाजार सदृष्य प्रकार बघायला मिळतो.दुसरीकडे सरकारी नोकरदारांसाठी पॅनलवरील ठरलेले डॉक्टर्स अन त्यांच्याकडून नुसते मेडीकल बील वर सहयाकरून आपले बील काढण्याचे प्रकार तर सरकारी केंद्रीय कर्मचा-यांसाठी असलेल्या सीजीएचएस कार्डचा होत असलेला दूरूपयोग दिसून येतो.यात देवानंतर महत्वाचा दर्जा ज्या डॉक्टरला दिला जातो त्याची सामाजिक जबाबदारी कुठे आहे ? असा प्रश्न पडणे सहाजीक आहे.
           प्रत्येक जन या समाजाचा घटक म्हणून आपआपली भूमिका अदा करत असतो मग तो राजकारनी, नोकरदार, डॉक्टर, इजिनीअर, शिक्षक, पत्रकार, रिक्शा  वा बस चालक, मोलकरीन  किंवा शेतमजूर असो. या प्रत्येकानी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून आपली जबाबदारी पार पाडली तर हा समाज ख-या अर्थाने समृध्द होईल. डॉ. शर्मा कुटुंबिय यासाठी मार्गदर्शक ठरतील हीच आशा. अशाच सकारात्मक स्टोरीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार.
                                                       ****