
आज आमच्या कार्यालयाला महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब
पुरंदरे यांनी भेट दिली, त्यांचा
सत्कार आणि अनौपचारीक गप्पा असा कार्यक्रम होता. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रख्यात
शाहीरासमोर पोवाडा गाण्याची , प्रश्न
विचारण्याची मिळालेली संधी आणि माझ्या गावी अचलपूरला आल्याची बाबासाहेबांनी
सांगितलेली आठवण सदैव स्मरणात राहून गेली. हा अनुपम्य आणि हृदय सोहळाच म्हणेन मी.
कार्यक्रम आटोपला, बाबासाहेबांना परत न्यायला
येणारी गाडी यायची होती , तेवढया वेळात ते आमच्या कार्यालय
प्रमुखांच्या कॅबीन मध्ये बसले. तिथे त्यांच्याशी आम्ही अनौपचारीक गप्पा मारताना
आप-आपल्या गावाचे नाव व ओळख दिली. मी सांगितले, ‘आदरणीय बाबासाहेब
मी, इलीचपूर अर्थात अचलपूरचा. आमच्या गावला भले मोठे परकोट
आहेत, चार मोठाले दरवाजे आहेत अस सर्व मी वर्णन करित असताना,
बाबासाहेबांना काही आठवल. ते म्हणाले, वर्ष
१९५५ मध्ये मी अचलपूरला व्याख्यानासाठी गेलो होतो कुठले तरी विठ्ठल मंदीर होते,
मी एकटाच. ज्यांनी माझ व्याख्यान आयोजित केल ते आयोजकही नाहीत आणि
श्रोतेही नाहित. तरीही, व्याख्यान सुरु केल. हा प्रसंग कसा अजूनही चटकन आठवला त्यांना वयाच्या ९६
व्या वर्षी एवढी स्मरणशक्ती पाहून शिवशाहीरापुढे नत झालो. याच महीन्यात बाबासाहेब
२९ जुलैला ९६ वर्ष पूर्ण करतात आहेत त्याआधी त्यांची ही भेट अविस्मरणीय तर आहेच
तसेच हा सोहळा अनुपम्य व हृदय असाच ठरला.
या कार्यक्रमाची मी लिहीलेली व कार्यालयाच्यावतीने
प्रसिध्द करण्यात आलेली बातमी
दैनिक प्रभात मध्ये प्रकाशित झाली लिंक वर उपलब्ध
http://www.dainikprabhat.com/%e0%a4%85%e0%a4%ad% 
