२००५
नंतर २०१७ मध्ये आषाढी एकादशी काळात पहिल्यांदा गावी केलेले कीर्तन आणि त्याचे
फेसबुकहून लाईव्ह प्रसारण केल्याने खूप जणांना माझ्या या गुणांचा परिचय झाला
त्यावेळी शुभेच्छांचा अक्षरष: पाऊस पडला. याच फेसबुक लाईव्ह मुळे दिल्लीतील
बृहनमहाराष्ट्र भवनाचे सरचिटणीस विलास कानतुटे यांनी माझ्याशी स्वत: संपर्क साधून
आपण तुमचे कीर्तन ठेवू असा शब्द दिला होता, मी ही तेव्हा होकार भरला होता.
त्यानंतर तब्बल २ महिन्यांनी मराठी स्नेह संवर्धक समाजाचे सी.एस. वामोरकर यांचा साधारणत: २० जानेवारीला
फोन आला की, ४ फेब्रुवारीला कीर्तन आयोजित करायच तुमच. मला एकदम आश्चर्य वाटल पण
मी थोडा वेळ घेतला आमचे स्नेही आदरणीय उत्तमकुमार जुळे काका व त्यांचा मुलगा आमचा
दादा आशिष जुळे यांच्याशी चर्चाकेली हार्मोनियम व तबल्याच्या साथीसाठी आणि कीर्तनास
होकार दिला. फक्त एकदा जुळे काकांकडे गेलो त्यांना कीर्तनाची धाटणी समजावून
सांगीतली आणि मग थेट ४ फेब्रुवारी २०१८
रोजी दासनवमी निमीत्त बृहन्महाराष्ट्र भवनात ह.भ.प. रितेश भुयार कीर्तनकार म्हणून
सेवा दिली. चांगला प्रतिसाद दिला उपस्थितांनी आणि मलाही समाधान वाटल कीर्तनाचे.
धांदल खूप उडाली ऑफीस घर सांभाळत कीर्तनाची तयारी करताना पण उत्तम कीर्तन करू
शकलो.
यासंदर्भात दैनिक लोकमतच्या दिल्ली आवृत्तीत प्रकाशित
झालेल्या वृत्ताने तर त्या दिवशी वॉटसॲपवर कमाल केली ब-याच गृप सह आमच्या
विभागाच्या ग्रुप वर सर्व वरिष्ठांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. याचा कळस
म्हणजे आमचे संचालक श्री. अजय अंबेकर यांनी स्वत: एसएमएस करून कौतुक केले व
शुभेच्छा दिल्या. यासर्वांचा एकत्रीत गोषवारा.
हे कीर्तन पाहण्यासाठी कृपया खालील लींक ला भेट द्या
https://www.youtube.com/watch?v=Av6_BWl3K5I&t=40s
https://www.youtube.com/watch?v=eK4UnDYc6kY
https://www.youtube.com/watch?v=9-dhuRKHQdk
https://www.youtube.com/watch?v=cKyDkLnVmUs