Wednesday, October 21, 2015

Cashless Country



एक नवीन विषय मांडतो इथे
Cashless
देश (जिथे सर्व आर्थिक व्यवहार पैश्यांशिवाय नुसत्या कार्ड्स द्वारे होतात जसे क्रेडिट, डेबिट कार्ड आणि मोबाईल बैंकिंग)
तुम्हाला माहीत आहे का !,  जगातील Cashless देश कोणता ?
स्वीडन हा जगातला पहिल्या क्रमांकाचा Cashless देश आहे. इथे 97%लोक कार्ड व मोबाईल बैंकिंग द्वारे आर्थिक व्यवहार करतात. 
*
बेल्जियम हा 2 -या क्रमांकावर 
*
फ़्रांस 3 -या
*
कॅनडा 4 थ्या तर इंग्लंड 5 व्या क्रमांकावर आहे.
आता जरा भारतावर एक नजर टाकू !. भारतात अजूनही 86 % आर्थिक व्यवहार हे पैस्यांद्वारे वा चलनाद्वारे होतात.
               आता पाहू या Cashless होण्याचे फायदे.

1)
पैसे छपाईच्या प्रिंटिंग चा मोठा खर्च वाचतो.
2)
बँक लुटीच्या घटनांना आळा बसतो.
3)
काळया पैशाला आळा बसतो.
4)
सुरक्षित आर्थिक देवान-घेवाणीचे वातावर निर्माण होते पर्यायाने देशातील जनता आर्थिक व्यवहारांच्याबाबतील Tension Free राहते.
सद्य: परिस्थिती बघता आपल्या देशात हे वातावरण निर्माण व्हायला कित्येक वर्ष लागतील. यातून आपण अजून जगाच्या किती मागे आहोत हे लक्षात येईल.
आपल्या देशात किती लोकांचे Bank Account आहेत, इथून सुरुवात आहे. 
राजकारण बाजुला ठेवलं तरी आपणास 'जनधन' योजनेचं महत्व पटाव, ज्याद्वारे देशात जास्तीत-जास्त लोकांचे Bank Account उघडण्याचा स्तुत्य विचार मुळाशी आहे.
   भारत देश cashless होण्यासाठी आपली Communication System अधिक बळकट व्हावी लागेल ज्याद्वारे Hacking आणि Information decoding च्या प्रकारांना आळा बसेल.
*
मजेशीर गोष्ट तर पुढे आहे.
भारतात मॉलमधे अजूनही केवळ 10% व्यवहार डेबिट व क्रेडिट कार्ड ने होतो . याही पुढे असं की Online Purchasing करतांना भारतातील लोक  'Cash on Delivery' हा पर्याय निवडतात, गंमत तर पुढे आहे ! क्रेडिट,डेबिट कार्ड, मोबाईल बैंकिंग,माँल आणि Online Purchasing हे शब्द आपल्या किती देशबांधवांना माहीत आहे!. ( उपहासाने नव्हे चिंतेने म्हणावेसे वाटते)
आता मूळ मुद्दा, "आपल्याला ही स्थिती बदलविण्यासाठी काय योगदान देता येईल" प्रत्येकाने आपला वाटा उचलावा ही भावना आपल्यात जागावी याच अपेक्षेसह।
                   शुभ रात्री.
                         

Thursday, October 15, 2015

माझ्या नजरेतून लाल किल्ला








चला माझ दिल्ली पुराण सुरु करतो।
मी दिल्लीतील प्रमुख ऐतिहासीक वास्तुबद्दल तुम्हाला माझ्या नजरेतून समजावून सांगणार आहे. दील्लीत मी ज्या पहिल्या ऐतिहासीक वास्तुला भेट दिली ती 'लाल किल्ला'. 
शहराच्या मध्यवस्तीत चादंनी चौक भागात ही वास्तू आहे जिला, UNESCO ने जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत स्थान दिल आहे. दिल्लीतील 3 वास्तुंना हा बहुमान लाभला आहे त्याबद्द्ल मी नंतर सांगेनच.
लालकिल्याहून 15 August या स्वातंत्रदिनी पंतप्रधानाने देशाला उद्देशुन संबोधन करण्याची प्रथा पंडित नेहरुं पासून ते आता नरेंद्र मोदींपर्यंत चालत आलेली आहे.
एक लाल किल्ला आग्रा येथे ही आहे जो, मोगल बादशहा शहाजहाँच्या वडीलाने अर्थात जहाँगीराने बांधला होता( ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यात आले होते.) शहाजहाँ बादशहाने आपली राजधानी आग्राहून दिल्लीला आणली आणि इथे सन 1637 मधे लाल किल्ला बांधण्यास सुरुवात झाली. त्या अगोदर 1631 ला 'ताजमहल' बांधण्यास सुरुवात झाली होती. शहाजहाँ नेच दिल्लीतील लाल किल्या समोरील ऐतिहासीक जामा मस्जिद(भारतातील सर्वात मोठी मस्जिद) बांधली जिचे निर्माण कार्य 1646 ला सुरु झाले.
शहाजहाँ हा शुरवीर तसेच कलेचा भोक्ता आणि कलेची कदरकरणारा मुस्लिम शासक होता. वयाच्या 16 व्या वर्षीच शहाँजहाँ ने लाल किल्ला(आग्रा) येथे किल्याच्या आत स्वतः काही वास्तू तयार केल्या होत्या. तेंव्हाच जहाँगिराने आपल्या मुलातील कलाकार ओळखला व त्यास प्रोत्साहन दिले म्हणूनच आज (वर उल्लेख केलेल्या वास्तू)जागतिक दर्जाच्या वारसा वास्तू ठरल्या आहेत(जामा मस्जिद सोडून). 
शहाजहाँ ने सैन्य बळावर राज्य विस्तार तर केलाच पण भारताला या ऐतिहासीक वास्तुंची अनोखी भेट दिली. 
           लाल किल्ला(दिल्ली)
* किल्ला जवळपास 3 ते 4 एकरात पसरला आहे .
* धौलपुरी लाल दगडांनी याचं बांधकाम करण्यात आलं आहे जे अजूनही ताज तवान दिसतं.
* किल्यात प्रवेश करताच चौक लागतो (जिथून प्रधानमंत्री लाल किल्याच्या कमानीवर भाषण देण्यास चढ़तात तो भाग.).
* पुढे मीना बाजार आहे. त्याकालात राण्यांसह किल्यातील अन्य महिला वर्गासाठी काही वस्तू खरेदी करण्याची व्यवस्था होती.
*किल्यातील पहीला दरवाजा. दरवाज्याच्या वर जीना आहे त्यात एक संग्रहालय तयार करण्यात आल असून युध्दात वापरण्यात येणा-या शस्त्रांचं प्रदर्शन इथे बघायला मिळते.
* याच दरवाज्यापासून डाव्या हातावर दीड कि.मी. अंतरावर इंग्रजांच्याकाळात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पकड़ण्यात आलेल्या देश भक्तांना बंदी बनवण्यात येत असे त्या बरॅक आहेत(हे बहुतेक पर्यटकांना माहीत नाही - पण मी बघितलय). 
* किल्यात 'दिवाने आम' आणि 'दिवाने ख़ास' असे दोन वेगवेगळे सभामंडप आहेत. 'दिवाने आम' आर्थात जिथे राजा हा सामान्य जनतेच्या समस्या ऐकत असे, तर 'दिवाने ख़ास' म्हणजे जिथे राजा विशिष्ट लोकांशी बैठक करत असे.
* किल्यात नमाज पढ़ण्यासाठी शहाजहाँ ने मस्जिदही उभारली आहे जी ' मोती मस्जिद' म्हणून प्रसिद्ध आहे. 
* लाल किल्याच्या मागील बाजूस 'राज घाट', 'शक्ति स्थल'आदी स्मारक आणि त्या पलिकडे यमुना नदी आहे.
ईति वृतांत ( लाल किल्ला -माझ्या नजरेतून)
           रितेश मोतीरामजी भुयार, 
                  नवी दिल्ली