नागपूर आणि माझी घोर निराशा
गाव , आपला परिसर सोडून दिल्लीला कार्यक्षेत्र निवडण तस थोड अवघडच होत पण, भविष्यातील ध्येयांचा अचूक वेध घेण्यासाठी तो निर्णय योग्यच होता हे कळायला आज रोजी(४ ऑगस्ट २०१२) महाराष्ट्राची उप राजधानी नागपुरात लोकांचा आलेला अनुभव पुरे ठरावा असाच आहे . उभ्या आयुष्यात बाईक , पाई आणि स्थानिक वाहतूक व्यवस्थेने नागपूर फिरण्याची पहिलीच वेळ पण फार त्रासदायक आणि घोर निराशा करणारी होती.
आमचे परममित्र विकास झाडे यांनी नागपुरात सुरु केलेल्या गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राला भेट देण्यासाठी म्हणून नागपूरला आलो होतो. दाभ्याहून नागपूर कडे निघताना ट्राफिक पोलीस महाशय आमच्या बाईकचा पाठलाग करत आले आणि माझ्याकडे असलेल्या जाड पिशवीत काय आहे ते तपासू लागले त्यांना सांगितल अहो साहेब यात ओहन आहे आणि ते मित्राकडे घेवून जातोय तो पैसे मागायला लागला तोच प्रेस कार्ड दाखवताच तो निघून गेला आणि पुढच्या एका गाडीवानाला गाठून त्याने माझ्यावरील राग काढत त्याच्याकडून चांगलेच पैसे वसूल केले. यावर मी माझ्या सोबत बाईक वर असणाऱ्या मित्राला विचारणा केली तर तो म्हणाला हा नुसता ट्रेलर आहे आगे आगे देखो . . . आणि झालही तसच दिवस भरात रस्त्यावर ट्राफिक पोलिसांची मनमानी आणि जणू खंडणी वसूल करावी तसे वाहन चालकांकडून पैसे वसूल करण्याचे दृष्य बघून मन विषन्न झाले. त्यात भर पडली ती रस्त्यावर सर्रास नियम तोडून होत असलेली वाहतूक. तुलनेने दिल्लीत मात्र या दोन्ही बाबत खूप बरे चित्र आहे. दिल्लीत वाहतूक नियमाच उलंघन केल्यास घरपोच मेमो येतो आणि म्हणूनच वाहतुकीला सिस्थ पण आहे. इथलेही ट्राफिक पोलीस पैसे खातात पण नियमाने ३०० रुपय घेवून २०० ची पावती फडत १०० खिश्यात टाकतात पण नागपुरात तर भर रस्त्यावर गाडी बाजूला घेऊन ट्राफिक पोलीस जणू खंडणीच वसूल करत आहेत असे चित्र होते. त्यामुळे थोड वाईट वाटले पण निराशा तर तेंव्हा झाली की, जनरल स्टोर मध्ये गेलो तेंव्हा त्याने एका लीफाप्यासाठी(ये ४ साईज) माझ्याकडून तब्बल २० रुपये घेतले, २ किमी अंतरासाठी ऑटोवाल्याने ४० रुपये घेतले आणि नेम प्लेट बनवणार्याने ३० रुपये किमतीची नेम प्लेट चक्क ६० रुपयालाच मिळेल या खाली किमतीला विकणार नाही नसेल हवी तर पुढे जा असा उद्धटपण करणारा दुकानदार बघून तळपायाची आग मस्तकात गेली . दिल्लीत जिथे १०० रुपये किंमत सांगितल्यावर त्या दुकानदाराशी भाव करून ७० रुपयापर्यंत वस्तू मिळवणारा मी , मीटर नुसार ऑटो वाणाला पैसे देणारा आणि चिल्लरवस्तू अगदी वाजविदरात वीकत घेणारा मी, मात्र नागपुरातील या महान विदुशिंसमोर नतमस्तक झालो. कळस तर असा की कोणी नीट पत्ता पण सांगत नाहीत आणि चुकीचा पत्ता तर जणू आपल्याला हा पत्ता माहित आहे या अविर्भावात सांगतात . इथले लोकही फार व्यावहारिक आहेत दिलेली वेळ न पाळणे आणि आपल्या कडे आलेला व्यक्ती जणू मूर्ख आहे असे समजून मुख कमलावर नकली हास्य मिरवणाऱ्या व्यक्तींची तर इथे पदोपदी भेट झाली. तेंव्हा वाटले की आपण महाराष्ट्रातून बाहेर आलो तेंव्हा दिल्लीतील लोकच असे नकली आणि बेगडी वागतात असे वाटत होते . पण, नाही नागपूरकर मात्र या बाबतीत पुणेकर आणि मुंबैकरांपेक्षाही काकणभर सरस असल्याची प्रचीती आज आली.
आणि खर संगु तर खूप चीड आली नागपुरातील लोकांची. आतापर्यंत देशातील भरपूर शहरांमध्ये फिरलो पण, नागपुरातील हे असले अनुभव जरा पचवायला अवघडच वाटले.