Friday, July 9, 2021
गणपतराव बोडस
गणपतराव बोडस .
मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट .
२ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्हयातील शेवगाव येथे त्यांचा जन्म झाला.
पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले, शाळेत शिकत असतापासूनच ते हौशी नाटयमंडळातून अभिनय करू लागले.
१८९५ मध्ये त्यांनी ‘किर्लोस्कर संगीत मंडळी’त प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी स्त्रीभूमिका वठविल्या त्यानंतर ‘सौभद्र’ नाटकात कृष्ण, ‘शारदा’ नाटकात कांचनभट, ‘मूकनायक’ मध्ये विक्रांत व ‘मानापमान’ मध्ये लक्ष्मीधर अशा महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या.
१९९३ मध्ये ‘किर्लोस्कर मंडळी’ सोडून बालगंधर्व आणि गोविंद टेंबे यांच्या सहकार्याने ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली.
‘एकच प्याला’ नाटकातील सुधाकर, ‘मृच्छकटिक’ नाटकातील शकार, ‘विद्याहरण’ नाटकातील शिष्यवर या गणपतरावांच्या भूमिका विशेष गाजल्या.
१९३० नंतर ते नाटयव्यवसायातून निवृत्त झाले यानंतर त्यांनी एक-दोन चित्रपटात भूमिका केल्या पण येथे त्यांचे मन रमले नाही. नंतरच्या काळात त्यांनी होतकरु नटांना मार्गदर्शन करण्याचे कार्य केले.
१९४० मध्ये नाशिक येथे भरलेल्या ३१व्या नाटयसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला.
त्यांनी १९५६ मध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठवाडा नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले.
१९५६ मध्ये त्यांना नाटयक्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आल.
गणपतराव बोडसांनी ४० वर्षे मराठी रंगभूमी गाजविली व नाटयसृष्टीतील अनेक बहुमान मिळविले .
‘माझी भूमिका’ हे त्यांचे आत्मचरि९ १९४० मध्ये प्रकाशित झाले .
हरितक्रांती व रोजगार हमी योजनेचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक.
हरितक्रांती व रोजगार हमी योजनेचे प्रणेते.
१ जुलै १९१३ रोजी यवतमाळ जिल्हयातील गहुली येथे त्यांचा जन्म झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण विविध खेडयांमध्ये झाले तर विठोली आणि अमरावती येथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधून बीएची पदवी व नंतर एलएलबी पदवी मिळविली.
विद्यार्थी दशेत त्यांच्यावर ‘महात्मा ज्योतिबा फुले’ आणि ‘डेल कार्नेगी’ यांच्या विचारांचा प्रभाव पडला.
कायद्याची पदवी घेवून पुसद येथे त्यांनी वकिलीस सुरुवात केली .
१९४३ -४७ कालावधित त्यांची पुसद कृषिमंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली याशिवाय हरिजन वसतीगृह आणि राष्ट्रीय वसतीगृहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य पाहिले .
१९५१-५२ मध्ये त्यांची मध्यप्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली .
१९४६ ते १९५२ दरम्यान ते पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले .
१९५२ ते १९५६ दरम्यान पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले .
१९५७ राज्य पुनर्रचनेनंतर ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले .
१९६० मध्ये वसंतराव नाईक हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले महसूल मंत्री झाले .
१९६३ मध्ये वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व त्यांनी या पदावर तब्बल १२ वर्षे काम केले .
त्यांनी कृषी विषयक समस्या हाताळून महाराष्ट्राला धान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण कार्य केले .
गोरगरिबांच्या व गरजुंच्या हाताला काम देणारी ‘रोजगार हमी योजना’ वसंतराव नाईक यांच्याच काळात सुरु झाली. त्यांच्या काळात या योजनेतून असंख्य विहिरी , तलाव खोदले गेले.
महाराष्ट्राला त्यांनी दुग्ध उत्पादनात अग्रेसर केले. शिक्षण आणि शेती विषयात विशेष लक्ष घालून त्यांनी महाराष्ट्रात मोठया सुधारणा घडवून आणल्या .
‘पाझर तलाव’ आणि ‘वसंत बंधाऱ्या’चे श्रेय वसंतराव नाईक यांना जाते. शेती,महसूल, राज्यभाषा, सरकारी यंत्रणेला कार्यप्रवण करणे यासोबतच अवर्षण-दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी त्यांनी कठोर प्ररिश्रम केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म दिन महाराष्ट्रशासनाच्यावतीने ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो .
Wednesday, March 31, 2021
शिव, फुले, शाहु,आंबेडकरांच्या विचारांवर महाराष्ट्राची भक्कम वाटचाल डॉ. विजय चोरमारे
नवी दिल्ली, दि. १९ : शिव, फुले, शाहु,आंबेडकरांच्या कार्यावर व विचारांवर महाराष्ट्र उभा आहे व पुढच्या काळातही आपल्याला याच विचारवर वाटचाल करावी लागेल असे प्रतिपादन डॉ. विजय चोरमारे यांनी आज महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या उद्घटनाच्या व्याख्यानात केले.
महाराष्ट्राचा उल्लेख करताना शिव, फुले, शाहु,आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतो तेव्हा या चार महापुरुषांच्या कार्यातून मुल्यमापन करावे लागेल. शिवाजी हे जगाच्या पाठीवर पहिले धर्मनिरपेक्ष राजे होते. अल्पसंख्यांकाना सुरक्षित वाटण हा आदर्श राज्याचा समाजाचा पहिला निकश आणि शिवाजी महाराजांनी आल्याला शिकवण देतात. महात्मा फुलेंनी घालून दिलेल्या वैचारिक पायातून आजचा महाराष्ट्र राजकीय व सामाजिकदृष्टया उभा आहे. शिवाजींनी राज्य कस कराव याचा वस्तूपाठ घालून दिला तर आदर्श राज्यात आपल्या चालीरिती कशा असायल्या हव्या, जुनी जळमट फेकुन देण्याची शिकवण फुलेंनी दिली.
राज्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेसाठी कशा रितीने कार्य करायला हवे ही शिकवणूक शाहुंनी दिली. आंबेडकरांनी शिवाजी फुले शाहु यांनी कार्यातून व विचारातून सांगितलेल्या गोष्टी आंबेडकरांनी राज्यघटनेत आणल्या. ज्या आधुनिक काळात आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत आहेत. वैचारिक कार्यावर उभ आहे पुढच्या काळातही आपल्याला याच विचारावर वाटचाल करावी लागेल.
महाराष्ट्र हा आधार भारताचा
सेनापती बापट यांनी देशपातळीवर महाराष्ट्राच स्थान अधोरेखित करताना म्हटले आहे. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले !
महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले,
खरावीर वैरी पराधिनतेचा,
महाराष्ट्र आधार हा भारताचा ! या ओळी भारताच्या जडणघडनीतील महाराष्ट्राच योगदान अधोरेखित करतात.
छत्रपती शाहु महाराजांनी संस्थानातील मागास व तळागाळातील जनतेसाठी २६ जुलै १९०२ रोजी आपल्या कोल्हापूर संस्थानात ५० टक्के आरक्षणाचा कायदा केला. प्रस्तापितांचा विरोध स्विकारून हे धोरण धैर्याने राबविले. स्वातंत्र्यानंतर देशाने हेच आरक्षणाचे सूत्र स्विकारले.
१९७२ मध्ये राज्यातील दुष्काळाचा सामना करताना कष्टकरी जनतेला जगता यावे म्हणून महाराष्ट्राने रोजगार हमी योजना राबविली थोर नेते वि.स.पागे या योजनेचे जनक. त्याआधी १८९६- ९७ नंतरच्या काळात कोल्हापूर संस्थानात पडलेल्या दुष्काळाच्या काळात छत्रपती शाहु महाराजांनी ही योजना राबविली होती. आता देशात ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नावाने राबविली जाते. ही महाराष्ट्राची देणगी आहे.
देशात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय व अंमलबजावणी महाराष्ट्राने केली. पुढे देश पातळीवर ३३ टक्के आरक्षण दिले. देशात पुढे ५० टक्के आरक्षणाच्या मागणीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली.
ज्येष्ठ नेते शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री असताना सैन्यदलात पहिल्यांदा महिलांना प्रवेश मिळाला
समाजकारण महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले त्यांच्या कल्पनेतील चित्र. त्यापूर्वीचे भाषण महाराष्ट्राच्या प्रश्नांचा आराखडा पुढे ठेवून त्याची उकल केली नाही तर हा आंधळा प्रवास ठरेल. मात्र आम्हाला डोळस प्रवास करायचा आहे व ध्येय ठरवून निश्चित गतीने हा प्रवास करायचा आहे. आज आमच्या समोरील प्रश्न राजकीय सामाजिक आर्थिक .
आर्थिकदृष्टया महाराष्ट्र भक्कम करण्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्रा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना . यशवंतरावांनी राज्यातील सहकाराला ताकद दिली व पुढे देशालाही सहकाराचे महत्व पटले.
सामाजिक प्रश्नांची चर्चा करताना यशवंतरावांन भाषणात म्हटले होते विचारवंतांनी महाराष्ट्राच वर्णन भंगलेल मन अस केल होत. वस्तूनिष्ट पायावर समाजकारण राजकाारण कराणर
भंगलेले मन आम्हाला सांधायचे आहे. जातीवादी विषारी विचार समूळ नष्ट केले पाहिजे असा विचार मांडले होते . गेल्या ६० वर्षांत त्यातून काय साध्य केल तर निराशा समोर येते. राजकारणाच्या पातळीवर जातीयता सौम्य होण्या ऐवजी तिष्ण होत आहे. जातीयवादी विचारापासून दूर जाण्याचा विचार सोयीनुसार पाळतो.
महा राष्ट्राच्या समाजसुधाराच्या चळवळीचे दाखले दिले जातात. सामाजिक सुधारकांची मोठी परंपरा येथे निर्माण झाली यास जातीय राजकारण शोभा देत नाही.
महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत आंबेडकरी चळवळीचा उल्लेख करावा लागेल वेदना, नकार , विद्रोह या सूत्राच्या आधारे आंबेडकर फुलेंच्या विचारांच्या प्रकाशात चळवळ उभी केली ही सामाजिक व सांस्कृतिक पातळीवरची चळवळ होती. या चळवळीने दलीत उपेक्षित समाजाला आत्मभान दिले.
यशवंतराव, वसंतदादा पाटील, बाळासाहेब, पाटील ह ४० टक्के राजकारण व ६० टक्के समाजकारण या सूत्रावर राजकारणाची मांडणी केली म्हणजे राजकारणाला समाजकारणाची जोड दिली. कार्यकर्त्यााचया . अलीकडच्या राजकारणात हे सूत्र दिसत नाही . राजकारणाने समाजकारणापासून फारकत घेतल्याचे दिसते.
समाजकारणाने सांस्कृतिककरणापासून फारकत घेतली आहे. सांस्कृतिक जोड असल्या शिवाय समाजकारणास भक्कम अधिष्टान प्राप्त होत नाही. समाजकारणाची जोड असेल तर महाराष्ट्राचे राजकारण अधिक चांगल्यारितेने चालेत तर सांस्कृतिक बाबा आढवांनी सुरु केलेली एकगाव एक पानवठा चळवळ समृध्द सामाजिक चळवळ, दाभोळकरांची अंधश्रध्दा निर्मुलनाची चळवळ महाराष्ट्रातील महत्वाची चळवळ जादुटोना विरोधी विधेयक. कर्नाटकाने एक विधेयक मंजूर केल.
सामाजिक पातळीवरी चळवळ देशाला मार्गदर्शक. शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील, बापुजी साळुंखे पंजावबराव देशमुख आदींनी शिक्षणाची गंगा तळागाळात पोचवली. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील समाजकारण प्रगल्भ कारण शिक्षण. वसंतदादा पाटील यांच्या काळात शिक्षणाचे धोरण १९८३ नंतर चार दशकानंतर बघतो. डी वाय पाटील, आदींनी दर्जेदार शिक्षण देणा-या संस्था. काळाच्या पातळीवर योग्य. शिक्षण क्षेत्रातील पुढारलेले राज्य. खाजगीकरणच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण संस्थाचे महाराष्ट्रात मोठे योगदान.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महत्वाची सी डी देशमुख यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील स्त्रियांचे लढे प्र कल्प ग्रस्त विस्तापितांसाठीचे मेधा पाटकर यांचे आंदोलन देशपातळीवर कार्य. आदिवासींच्या कल्याणासाठी भागात नंदूरबार येथे प्रतिभा शिंदेचे आंदोलन. विदर्भात पारामिता गोस्वामी काम .
यशवंतरावांपासून गडकरींपासून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अशा अनेक नेत्यांनी योगदान दिले आहे.
सामाजिक क्षेत्रात बाबा आमटे नानाजी देशमुख यांच काम दिसत. अन्ना हजारे यांनी उभे केलेले आंदोलन मोठे होते.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बघता काँग्रेस केंद्रीत राजकारण, शेतकरी कामगार पक्षाच राजकारण, जनता पक्ष, शिवसेना, भाजप, महानिर्माण सेना रिपब्लीकन राजकारणाच्या स्थित्यंतरात . नोंद करावी अशी बाब डावे व समाजवादी यांचा झालेला –हास चिंतेची बाब आहे.
काळाची पावले ओळखू शकले नाहीत राजकारण समाजकारणाचा दिर्घ पट
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४९/दिनांक १९.०३.२०२१
परिचय केंद्राची ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ डॉ. विजय चोरमारे गुंफणार पहिले पुष्प
नवी दिल्ली, दि. १७ : थोर योध्दयांची ,संतांची व समाजसुधारकांची परंपरा असणा-या व विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणा-या महाराष्ट्र राज्य निर्मितीचे पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष हा सुवर्णयोग साधत परिचय केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमालेची’ १९ मार्च २०२१ रोजी सुरुवात होत आहे. कवी, लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमोरे हे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत.
‘गेल्या ६० वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण’ या विषयावरील व्याख्यानाने डॉ. वियज चेारमारे हे १९ मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजता पहिले पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत ६० वर्षांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने १९ मार्च ते १ मे २०२१ दरम्यान ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यान मालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होवून महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रगतीबाबत आपले विचार मांडणार आहेत.
महाराष्ट्र परिचय केंद्राचाही हीरक महोत्सव
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये १९६१ मध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करण्यात आली. राजधानीत महाराष्ट्राचे सांस्कृतिक दूतावास म्हणून हे कार्यालय ओळखले जाते . केंद्र व राज्य शासनातील दुवा म्हणून या कार्यालयाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या कार्यालयाने गेल्या ६० वर्षात यशस्वी वाटचाल केली आहे. राज्याचे व परिचय केंद्राचे स्थापना वर्षे असे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. विजय चोरमारे यांच्या विषयी
डॉ. चोरमारे हे गेल्या ३३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दै.सकाळ (कोल्हापूर), दै. लोकमत ( कोल्हापूर आणि मुंबई) आणि दै.प्रहार (मुंबई), दै.महाराष्ट्र टाइम्स (कोल्हापूर आणि मुंबई) या वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. कोल्हापूर येथे सुरु झालेल्या दै.महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक म्हणून त्यांनी प्रारंभापासून जबाबदारी सांभाळली. 'बाबूराव पेंटर यांचे भारतीय चित्रपटांच्या विकासातील योगदान' या विषयावरील संशोधनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने त्यांना पीएचडी प्रदान केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारस्कारासह विविध पुरस्कार व फेलोशिफ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात आणि आतबाहेर सर्वत्र आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिध्द झाले आहेत. देवाशपथ खरं लिहीन आणि मुजरा या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लिखाण केले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे संपादन व अनुवाद केले आहे.
दुपारी 12 वाजता समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण होणार
शुक्रवार 19 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वरून तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi या युटयुब चॅनेल वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४७/दिनांक १७.०३.२०२१
Monday, March 15, 2021
वासुदेव विष्णु मिराशी
वासुदेव विष्णु मिराशी
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक
१३ मार्च १८९३ ला रत्नागिरी जिल्हयातील कुवळे येथे जन्म
कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूल व राजाराम महाविद्याल आणि पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात शिक्षण
मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापकाची नौकरी, याच काळात त्यांनी ‘अद्वैतब्रह्यसिद्धि’ या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले
नागपूर येथील मॉरिस कॉलेज व अमरावती येथील किंग एडवर्ड कॉलेज मध्ये प्राध्यापक व प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली
एपिग्राफिया इंडिका (खंड २१–१९३१) यात त्यांचा पुराभिलेखासंबंधीचा पहिला शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यानंतरच त्यांनी ‘कालिदास’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले.
‘सातवाहन’, ‘वाकाटक’, ‘कलचुरी-चेदी’, ‘शिलाहार’ इ. प्राचीन राजवंशांचे पुराभिलेख त्यांनी संकलित आणि संपादित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले
कोरीव लेखांच्या आधारे त्यांनी ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख’ , ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काल’ , ‘कलचुरी नृपति आणि त्यांचा काल’ , ‘शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख’ हे चार प्रमुख ग्रंथ लिहिले
संस्कृत साहित्याच्या संशोधनपूर्वक अभ्यासातून ‘कालिदास’, ‘मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक’ आणि ‘भवभूति’ ही तीन पुस्तके प्रसिद्ध केली
पुराभिलेखाइतकाच नाणकशास्त्राचा त्यांचा व्यासंग मोठा व सखोल होता. या विषयातील त्यांचे चाळीसहून अधिक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध आहेत.
१९४१ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही उपाधी दिली. १९५६ मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि १९६१ मध्ये राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना ताम्रपट देण्यात आले.
भारतीय मुद्राशास्त्र परिषद, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद व भारतीय इतिहास परिषद यांचे त्यां अध्यक्षपद भूषविले
सागर, मुंबई, नागपूर आणि संपूर्णानंद (वाराणसी) या विद्यापीठांनी डी.लिट्. ही सन्मान्य पदवी त्यांना बहाल
केली.
मिराशी यांनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले तर सुरुवातीचे त्यांचे लेखन मराठीत आहे.
त्यांच्या निवडक ग्रंथांची भारतातील प्रादेशिक भाषांतून– विशेषतः हिंदी, ओडिया, कन्नड – भाषांतरे झाली आहेत.
मिराशी यांचे जवळपास ३८ ग्रंथ व चारशेहून अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झाले
१९७५ मध्ये साहित्य अकादमीने प्रमाणपत्र व अधिछात्रवृत्ती देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला
१९७५ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण हा मानाचा नागरी सन्मान देवून गौरविले
अभिनेते शाहू मोडक
अभिनेते शाहू मोडक
मराठी चित्रपटसृष्टीतील अद्वितीय व्यक्तिमत्व
२५ एप्रिल १९१८ रोजी त्यांचा जन्म
‘श्यामसुंदर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला.
‘श्यामसुंदर’ हा भारतातला पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.
शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात.
शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया साकारल्या .
त्यांनी २९ चित्रपटांत श्रीकृष्णाची भूमिका साकारली.
त्यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत.
‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत शांता हुबळीकर होत्या.
माणूस, औट घटकेचा राजा, संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी भगत, झाला महार पंढरीनाथ आदी मराठी-हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या.
अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत.
अभिनेते शाहू मोडक
अभिनेते शाहू मोडक
मराठी चित्रपटसृष्टीतील अद्वितीय व्यक्तिमत्व
२५ एप्रिल १९१८ रोजी त्यांचा जन्म
‘श्यामसुंदर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला.
‘श्यामसुंदर’ हा भारतातला पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.
शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात.
शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया साकारल्या .
त्यांनी २९ चित्रपटांत श्रीकृष्णाची भूमिका साकारली.
त्यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत.
‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत शांता हुबळीकर होत्या.
माणूस, औट घटकेचा राजा, संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी भगत, झाला महार पंढरीनाथ आदी मराठी-हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या.
अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत.
Subscribe to:
Posts (Atom)

