Monday, March 15, 2021
वासुदेव विष्णु मिराशी
वासुदेव विष्णु मिराशी
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक
१३ मार्च १८९३ ला रत्नागिरी जिल्हयातील कुवळे येथे जन्म
कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूल व राजाराम महाविद्याल आणि पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात शिक्षण
मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापकाची नौकरी, याच काळात त्यांनी ‘अद्वैतब्रह्यसिद्धि’ या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले
नागपूर येथील मॉरिस कॉलेज व अमरावती येथील किंग एडवर्ड कॉलेज मध्ये प्राध्यापक व प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली
एपिग्राफिया इंडिका (खंड २१–१९३१) यात त्यांचा पुराभिलेखासंबंधीचा पहिला शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यानंतरच त्यांनी ‘कालिदास’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले.
‘सातवाहन’, ‘वाकाटक’, ‘कलचुरी-चेदी’, ‘शिलाहार’ इ. प्राचीन राजवंशांचे पुराभिलेख त्यांनी संकलित आणि संपादित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले
कोरीव लेखांच्या आधारे त्यांनी ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख’ , ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काल’ , ‘कलचुरी नृपति आणि त्यांचा काल’ , ‘शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख’ हे चार प्रमुख ग्रंथ लिहिले
संस्कृत साहित्याच्या संशोधनपूर्वक अभ्यासातून ‘कालिदास’, ‘मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक’ आणि ‘भवभूति’ ही तीन पुस्तके प्रसिद्ध केली
पुराभिलेखाइतकाच नाणकशास्त्राचा त्यांचा व्यासंग मोठा व सखोल होता. या विषयातील त्यांचे चाळीसहून अधिक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध आहेत.
१९४१ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही उपाधी दिली. १९५६ मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि १९६१ मध्ये राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना ताम्रपट देण्यात आले.
भारतीय मुद्राशास्त्र परिषद, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद व भारतीय इतिहास परिषद यांचे त्यां अध्यक्षपद भूषविले
सागर, मुंबई, नागपूर आणि संपूर्णानंद (वाराणसी) या विद्यापीठांनी डी.लिट्. ही सन्मान्य पदवी त्यांना बहाल
केली.
मिराशी यांनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले तर सुरुवातीचे त्यांचे लेखन मराठीत आहे.
त्यांच्या निवडक ग्रंथांची भारतातील प्रादेशिक भाषांतून– विशेषतः हिंदी, ओडिया, कन्नड – भाषांतरे झाली आहेत.
मिराशी यांचे जवळपास ३८ ग्रंथ व चारशेहून अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झाले
१९७५ मध्ये साहित्य अकादमीने प्रमाणपत्र व अधिछात्रवृत्ती देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला
१९७५ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण हा मानाचा नागरी सन्मान देवून गौरविले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment