Wednesday, March 31, 2021
शिव, फुले, शाहु,आंबेडकरांच्या विचारांवर महाराष्ट्राची भक्कम वाटचाल डॉ. विजय चोरमारे
नवी दिल्ली, दि. १९ : शिव, फुले, शाहु,आंबेडकरांच्या कार्यावर व विचारांवर महाराष्ट्र उभा आहे व पुढच्या काळातही आपल्याला याच विचारवर वाटचाल करावी लागेल असे प्रतिपादन डॉ. विजय चोरमारे यांनी आज महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या उद्घटनाच्या व्याख्यानात केले.
महाराष्ट्राचा उल्लेख करताना शिव, फुले, शाहु,आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतो तेव्हा या चार महापुरुषांच्या कार्यातून मुल्यमापन करावे लागेल. शिवाजी हे जगाच्या पाठीवर पहिले धर्मनिरपेक्ष राजे होते. अल्पसंख्यांकाना सुरक्षित वाटण हा आदर्श राज्याचा समाजाचा पहिला निकश आणि शिवाजी महाराजांनी आल्याला शिकवण देतात. महात्मा फुलेंनी घालून दिलेल्या वैचारिक पायातून आजचा महाराष्ट्र राजकीय व सामाजिकदृष्टया उभा आहे. शिवाजींनी राज्य कस कराव याचा वस्तूपाठ घालून दिला तर आदर्श राज्यात आपल्या चालीरिती कशा असायल्या हव्या, जुनी जळमट फेकुन देण्याची शिकवण फुलेंनी दिली.
राज्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेसाठी कशा रितीने कार्य करायला हवे ही शिकवणूक शाहुंनी दिली. आंबेडकरांनी शिवाजी फुले शाहु यांनी कार्यातून व विचारातून सांगितलेल्या गोष्टी आंबेडकरांनी राज्यघटनेत आणल्या. ज्या आधुनिक काळात आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत आहेत. वैचारिक कार्यावर उभ आहे पुढच्या काळातही आपल्याला याच विचारावर वाटचाल करावी लागेल.
महाराष्ट्र हा आधार भारताचा
सेनापती बापट यांनी देशपातळीवर महाराष्ट्राच स्थान अधोरेखित करताना म्हटले आहे. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले !
महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले,
खरावीर वैरी पराधिनतेचा,
महाराष्ट्र आधार हा भारताचा ! या ओळी भारताच्या जडणघडनीतील महाराष्ट्राच योगदान अधोरेखित करतात.
छत्रपती शाहु महाराजांनी संस्थानातील मागास व तळागाळातील जनतेसाठी २६ जुलै १९०२ रोजी आपल्या कोल्हापूर संस्थानात ५० टक्के आरक्षणाचा कायदा केला. प्रस्तापितांचा विरोध स्विकारून हे धोरण धैर्याने राबविले. स्वातंत्र्यानंतर देशाने हेच आरक्षणाचे सूत्र स्विकारले.
१९७२ मध्ये राज्यातील दुष्काळाचा सामना करताना कष्टकरी जनतेला जगता यावे म्हणून महाराष्ट्राने रोजगार हमी योजना राबविली थोर नेते वि.स.पागे या योजनेचे जनक. त्याआधी १८९६- ९७ नंतरच्या काळात कोल्हापूर संस्थानात पडलेल्या दुष्काळाच्या काळात छत्रपती शाहु महाराजांनी ही योजना राबविली होती. आता देशात ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नावाने राबविली जाते. ही महाराष्ट्राची देणगी आहे.
देशात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय व अंमलबजावणी महाराष्ट्राने केली. पुढे देश पातळीवर ३३ टक्के आरक्षण दिले. देशात पुढे ५० टक्के आरक्षणाच्या मागणीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली.
ज्येष्ठ नेते शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री असताना सैन्यदलात पहिल्यांदा महिलांना प्रवेश मिळाला
समाजकारण महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले त्यांच्या कल्पनेतील चित्र. त्यापूर्वीचे भाषण महाराष्ट्राच्या प्रश्नांचा आराखडा पुढे ठेवून त्याची उकल केली नाही तर हा आंधळा प्रवास ठरेल. मात्र आम्हाला डोळस प्रवास करायचा आहे व ध्येय ठरवून निश्चित गतीने हा प्रवास करायचा आहे. आज आमच्या समोरील प्रश्न राजकीय सामाजिक आर्थिक .
आर्थिकदृष्टया महाराष्ट्र भक्कम करण्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्रा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना . यशवंतरावांनी राज्यातील सहकाराला ताकद दिली व पुढे देशालाही सहकाराचे महत्व पटले.
सामाजिक प्रश्नांची चर्चा करताना यशवंतरावांन भाषणात म्हटले होते विचारवंतांनी महाराष्ट्राच वर्णन भंगलेल मन अस केल होत. वस्तूनिष्ट पायावर समाजकारण राजकाारण कराणर
भंगलेले मन आम्हाला सांधायचे आहे. जातीवादी विषारी विचार समूळ नष्ट केले पाहिजे असा विचार मांडले होते . गेल्या ६० वर्षांत त्यातून काय साध्य केल तर निराशा समोर येते. राजकारणाच्या पातळीवर जातीयता सौम्य होण्या ऐवजी तिष्ण होत आहे. जातीयवादी विचारापासून दूर जाण्याचा विचार सोयीनुसार पाळतो.
महा राष्ट्राच्या समाजसुधाराच्या चळवळीचे दाखले दिले जातात. सामाजिक सुधारकांची मोठी परंपरा येथे निर्माण झाली यास जातीय राजकारण शोभा देत नाही.
महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत आंबेडकरी चळवळीचा उल्लेख करावा लागेल वेदना, नकार , विद्रोह या सूत्राच्या आधारे आंबेडकर फुलेंच्या विचारांच्या प्रकाशात चळवळ उभी केली ही सामाजिक व सांस्कृतिक पातळीवरची चळवळ होती. या चळवळीने दलीत उपेक्षित समाजाला आत्मभान दिले.
यशवंतराव, वसंतदादा पाटील, बाळासाहेब, पाटील ह ४० टक्के राजकारण व ६० टक्के समाजकारण या सूत्रावर राजकारणाची मांडणी केली म्हणजे राजकारणाला समाजकारणाची जोड दिली. कार्यकर्त्यााचया . अलीकडच्या राजकारणात हे सूत्र दिसत नाही . राजकारणाने समाजकारणापासून फारकत घेतल्याचे दिसते.
समाजकारणाने सांस्कृतिककरणापासून फारकत घेतली आहे. सांस्कृतिक जोड असल्या शिवाय समाजकारणास भक्कम अधिष्टान प्राप्त होत नाही. समाजकारणाची जोड असेल तर महाराष्ट्राचे राजकारण अधिक चांगल्यारितेने चालेत तर सांस्कृतिक बाबा आढवांनी सुरु केलेली एकगाव एक पानवठा चळवळ समृध्द सामाजिक चळवळ, दाभोळकरांची अंधश्रध्दा निर्मुलनाची चळवळ महाराष्ट्रातील महत्वाची चळवळ जादुटोना विरोधी विधेयक. कर्नाटकाने एक विधेयक मंजूर केल.
सामाजिक पातळीवरी चळवळ देशाला मार्गदर्शक. शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील, बापुजी साळुंखे पंजावबराव देशमुख आदींनी शिक्षणाची गंगा तळागाळात पोचवली. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील समाजकारण प्रगल्भ कारण शिक्षण. वसंतदादा पाटील यांच्या काळात शिक्षणाचे धोरण १९८३ नंतर चार दशकानंतर बघतो. डी वाय पाटील, आदींनी दर्जेदार शिक्षण देणा-या संस्था. काळाच्या पातळीवर योग्य. शिक्षण क्षेत्रातील पुढारलेले राज्य. खाजगीकरणच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण संस्थाचे महाराष्ट्रात मोठे योगदान.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महत्वाची सी डी देशमुख यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील स्त्रियांचे लढे प्र कल्प ग्रस्त विस्तापितांसाठीचे मेधा पाटकर यांचे आंदोलन देशपातळीवर कार्य. आदिवासींच्या कल्याणासाठी भागात नंदूरबार येथे प्रतिभा शिंदेचे आंदोलन. विदर्भात पारामिता गोस्वामी काम .
यशवंतरावांपासून गडकरींपासून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अशा अनेक नेत्यांनी योगदान दिले आहे.
सामाजिक क्षेत्रात बाबा आमटे नानाजी देशमुख यांच काम दिसत. अन्ना हजारे यांनी उभे केलेले आंदोलन मोठे होते.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बघता काँग्रेस केंद्रीत राजकारण, शेतकरी कामगार पक्षाच राजकारण, जनता पक्ष, शिवसेना, भाजप, महानिर्माण सेना रिपब्लीकन राजकारणाच्या स्थित्यंतरात . नोंद करावी अशी बाब डावे व समाजवादी यांचा झालेला –हास चिंतेची बाब आहे.
काळाची पावले ओळखू शकले नाहीत राजकारण समाजकारणाचा दिर्घ पट
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४९/दिनांक १९.०३.२०२१
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment