Wednesday, June 6, 2018

लोकराज्य गुजराती



केंद्र शासनाला मे २०१८ मध्ये ४ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विशेषांक प्रकाशित झाला. या अंकात केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला विविध योजना व कार्यक्रमांमध्ये झालेला लाभ या विषयावरील लेख प्रसिध्द झाला. 







लोकराज्य उर्दु




केंद्र शासनाला मे २०१८ मध्ये ४ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विशेषांक प्रकाशित झाला. या अंकात केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला विविध योजना व कार्यक्रमांमध्ये झालेला लाभ या विषयावरील लेख प्रसिध्द झाला. 










लोकराज्य मराठी





       केंद्र शासनाला मे २०१८ मध्ये ४ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विशेषांक प्रकाशित झाला. या अंकात केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला विविध योजना व कार्यक्रमांमध्ये झालेला लाभ या विषयावरील लेख प्रसिध्द झाला. 







Wednesday, May 30, 2018

व्हर्च्युअल होतोय आम्ही


माणसाच्या विकासाप्रमाणे त्याच्या संपर्क साधणांचा विकास झाला. राजा’ आपला संदेश दुसऱ्या राज्यात लखोटयावर लिहून दुताच्या माध्यमातून वा कबुत्तराच्या माध्यमातून पोचवत असे. हा काळनंतर पत्र व्यवहाराचा काळ, पुढे तंत्रज्ञानाचा विकास होत आज मोबाईल व अन्य डिजीटल गॅजेट्सच्या माध्यमातून क्षणात होणारा ये हृदयी चे ते हृदयी हा संवाद. काळानुसार तंत्रज्ञान बदललं वास्तव जीवन सोडून व्हर्च्युअल अर्थात आभासी जगात वावरणा-या प्रत्येकाला माणसासाठी तंत्रज्ञान की तंत्रज्ञानासाठी माणूस हे समजून घ्यायची आता वेळ आली आहे .
             
         प्रियकर आपल्या प्रेयसीला लपून -छपून पत्र लिहायचा,मग हे पत्र लपूनच मिळवायच ते वाचत आपल्या वेगळया भावविश्वात रमायचा असा तो काळ. त्यामुळे एकमेकांमध्ये प्रेमाचा ओलावा कायम असायचा आप-आपसात संयम राखून सर्व व्यवहार व्हायचे.आता मात्र, पहिल्याच भेटीत मोबाईलनंबर एक्सचेंज होतात भेटी नंतर मुलगा -मुलगी घरी जाईस्तोवर व्हाटसॲप किंवा फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून त्यांच्यात हाय-हॅलो होत व मग संवादाला सुरुवात. घरापासून दूर राहणारा मुलगा -मुलगीही  व्हीडीओ कॉलच्या माध्यमातून आपल्या आई-वडिलांशी थेट लाईव्ह संवाद साधू शकतो. या प्रातिनिधीक उदाहरणांतून एक बाब तर लक्षात आली की तंत्रज्ञानाने आपण वास्तव जीवनापेक्षा व्हर्च्युअल अर्थात आभासी जगात जास्त रमायला लागलो आणि माणसां-माणसांतील भावनिक नात्यातील ओलावा तर कोरडा ठाक होत नाहीये ना?  याबाबत अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.



                   भारतात ८० च्या दशकात संगणक युगाची हाक देऊन तंत्रज्ञान सुलभ वातावरण निर्माण करण्यास सुरुवात झाली. या प्रवासात आज २०१८ मध्ये मोबाईल कंपन्यांचा देशभर सुळसुळाट झाला, त्यांच्यातील परस्पर स्पर्धेमुळे मोबाईल स्वस्त झाला व प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला, पर्यायाने प्रत्येकाच्या हातात जग आल. तंत्रज्ञानाने जग जवळ आल पण माणूस- माणसापासून लांब गेला हे वास्तवही जड अंत:करणाने सहन कराव लागत. जगाच्या पाठीवर घडणारी घटना क्षणात व्हॉटसपच्या माध्यमातून आपल्याला माहिती होते, हा झाला फायदा. आता यातील तोटा असा की, ती माहिती खरी असेलच याची शाश्वती नसते अन व्हाटसअपवर ही माहिती नियंत्रीत करणारी यंत्रणाही नाही त्यामुळे माहितीचा एकतर्फी मारा होत राहतो ज्यातील ९० टक्के माहिती चुकीची असते हा निष्कर्षही तज्ज्ञांकडून काढण्यात आला आहे. आता एका व्यक्तीकडे आलेली माहिती सहज चार जणांना फॉरवर्ड होते मग हे चार जण प्रत्येकी चार अशा सोळा जणांना पुढे पाठवतात. चुकीची माहिती वाचण्यात येवढे सर्व डोके विणाकारण एंगेज होतात. काही वेळा हेतुपुरस्सर माथे भडकविणारी व समाजात तेढ निमार्ण करणारी माहिती ही प्रसुत होते. हे अगदीच पायाभूत निरीक्षण आहे याशिवाय मोठया प्रमाणात बनावट कागदपत्रे तयार करणे, नौकरीचे आमीश दाखवून पैसा ट्रान्सफर करून घेणे असे सायबर गुन्हे मोठया प्रमाणात घडायला लागले.

घरातच आपल एकमेकांशी बोलण कमी झाल आणि तंत्रज्ञानाने आपल्या हातात आणून ठेवलेला मोबाईल वेळोवेळी बघत राहण हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक होऊन बसला. नुकतेच सरकारची चार वर्ष पूर्तीतील उपलब्धी वर्णन करताना केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांनी माहिती दिलह त्यानुसार १३० कोटी भारतीय जनतेपैकी १२० कोटी जनतेजवळ मोबाईल पोचला आहे हे ही येथे नमुद केले पाहिजे.  



                   


                              ‘डीजीटल डिटॉक्स कँप माहितीये तुम्हाला ?
                 जगतिक महासत्ता अर्थात अमेरिकेत या व्हर्च्युअल जगाच्या दुष्परीणामाची लागन झालीय. अमेरिकेतील २५ टक्के लोक हे दिवसांतून ५० वेळा मोबाईल बघतात तर ५० टक्के लोक १०० वेळा मोबाईल बघतात असा निष्कर्ष एका शोधात काढण्यात आला आहे. म्हणूनच मोबाईल सदृष्य डिजीटल साधणांमुळे या देशात माणसा-माणसांत निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी व त्यांच्यात परस्पर संवाद घडवून आणण्यासाठी, त्याला पूर्ववत आपल्या आनंदी जगण्याची अनुभूती करून देण्यासाठी येथे डीजीटल डिटॉक्स कँप आयोजित करण्यात येतात. या कँप मध्ये सहभागी होणा-या प्रत्येकाने सुरुवातीलाच आपल्याकडील मोबाईल व अन्य डिजीटल गॅजेटस जमा करावे लागतात. मग कँप सुरु झाला की एकमेकांचे नावही सांगायचे नाहीत हा दंडक पाळून प्रत्येकजण टोपण नावाने वागतो हे टोपण नावही नदी, ऋतू आदिंचे असते. वेगवेगळे खेळ, योगा, निसर्गाच्या सानिध्यात राहून माणसांनी माणसांसोबत बोलाव गप्पा माराव्या व डिजीटल युगात हरवलेला माणूस पुन्हा परत आणण्याचा खटाटोप म्हणजे हा कँप . अन्य देशांप्रमाणे भारतातही अशा कँपच्या आयोजनाची शक्यता नाकारता येणार नाही.

देशांचे प्रमुख व त्यांच्याकडील मोबाईल

            देश दुनीयेत आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजविणारे विविध देशांचे नेते आता या व्हर्च्युअल जगाचा भाग झाले आहेत, त्यांचेही विविध सोशल मीडिया अकाऊंट आले आहेत. सुरुवात करूया भारताच्या प्रधानमंत्र्यापासून श्री मोदी हे खूप मीडिया शॅवी आहेत विविध प्रसंगी त्यांनी घेतलेले सेल्फी आपण पाहिले आहेत. श्री. मोदी यांच्याकडे सुरुवातीला सॅमसंग कंपनीचा अँड्राइड मोबाईल होता आता आयफोन हा महागडा फोन ते वापरतात. इंग्लडच्या पंतप्रधान तेरेसा मे यांच्याकडे २०१७ पर्यंत अँड्राईड मोबाईल होता आता त्याही आयफोन वापरतात. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या मोबाईलवर कोणतेही अप्लीकेशन डाऊनलोड करण्यात आलेले नाही. श्रीमंत म्हणून गणला जाणा-या अरबचे सुल्तान मात्र, एक बेसिक नोकिया फोन आणि एक अँड्राईड फोन वापरतात. सतत अणुचाचण्या घेऊन जगाला धडकी भरविणारा उत्तर कोरियाचा प्रमुख किम जोंग याला २०११ मध्ये शेवटचे मोबाईल वापरताना बघितले होते. जगातील दुसरी महासत्ता रशीया व या देशाचे सलग ४ थ्यांदा  राष्ट्रपती बनून विक्रम करणारे  राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे कोणताही मोबाईल वापरत नाहीत व त्यांचे कोणतेही  सोशल मीडीया अकाउंट नाही.
            एकंदरीत मोबाईल व अन्य डिजीटल तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात गती आली ,बरेच सकारात्मक बदल झाले. मात्र,तंत्रज्ञानाच्या या व्हर्च्युअल अर्थात आभासी जगात माणूस-माणसांपासून दूर होणार नाही व अमेरीकेतील डीटॉक्स कँप भरविण्याची वेळ भारतात येणार नाही हीच अपेक्षा बाळगूण लेखनीला पूर्ण विराम.
                                                                         *****


Friday, May 25, 2018

तरुणाई तरूणाई




        आज ऑफिसला येताना तरूणाईचे तीन प्रातिनिधीक उदाहरण बघितले अन इथे खरडायला घेतल.
पहिलं उदाहरण.
आज नेहमी प्रमाणे ऑफिसला लगबगीने निघालो, मेट्रो स्टेशनवर ओळखीतला मराठी चेहरा दिसनं तस दुर्लभ. मात्र, आज तस घडलं. समोर वल्लभ पाटील(इंजिनीअरींगच्या तिस-या वर्षाला शिकतोय) दिसला हाय-हॅलो झाला. चालता चालताच मी त्याला विचारलं,आटोपली का परीक्षा?’ तो उत्तरला, हो जस्ट आटोपली!’ लगेच माझा दुसरा प्रश्न, कुठे निघालास? त्यावर वल्लभचं उत्तर, कॉलेजला जाऊन येतो जरा!’ काही पुस्तकं परत करायची होती लायब्ररीची अस म्हणून त्याने काढता पाय घेतला. मला ज्या रूटने जायचे होते त्याचं दिशेनं तो झपा- झपा पाय-या चढत मेट्रो प्लॅट फॉर्मवर उभ्या असलेल्या मेट्रोत शिरला. मी पाय-यांवरच होतो ते पाहून एव्हाना मेट्रोच्या दारात उभा राहून वल्लभ मलापण हाताने खुनावत होता ये की मेट्रोत. नेमकी मेट्रो सुटायची वेळ असताना मेट्रोत शिरण्याचा उपदव्याप मी बहुतेक वेळा टाळतो पण वल्लभच्या हाकेमुळे मी धाडसाने मेट्रोत प्रवेश केला.
दारात उभा राहिलो वर मेट्रो स्टेशनच्या नावाकडे कटाक्ष टाकला त्यात एका स्टेशनचं नाव होतं दुर्गाबाई देशमुख नगर कुतुहलाने मी वल्लभला म्हटलं, यार हे तर मराठी नाव वाटत !’. त्याने लगेच सांगितल हो, त्या बाई  मुळच्या आंध्रप्रदेशातील आहेत मात्र ,मराठी व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला ज्यांच्याशी विवाह झाला ते होते  रिजर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी.डी.देशमुख. या तरुणाकडे असलेली इंस्टंट माहिती पाहून मी अवाक झालो. मी म्हटल मान्य, त्यांचा विवाह मराठी  व्यक्तीशी झाला पण त्यांच योगदान? त्यावर वल्लभ म्हणाला, त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मला आश्चर्य वाटल म्हटल कमाल आहे तुझी, तू बरे माहिती मिळवली ! वल्लभ म्हटला दिल्लीतील एका भागास हे मराठी नाव असल्याचे बघून मलाही जिज्ञासा निर्माण झाली अन म्हणून मी शोधून काढली माहिती बस. आता स्टेशन आलं  होतं वल्लभ त्याच्या मार्गाने व मी माझ्या ऑफीसच्या दिशेने निघालो.
 Moral of the Discussion पहिली बाजु तरूण जिज्ञासू व अभ्यासू असतात दुसरी बाजू पण असे जिज्ञासू व त्यात सातत्य राखणारे तरूण किती?  
दुसर उदाहरण
    एव्हाना मेन मेट्रोस्टेशनहून(राजीव चौक) ऑफिसकडे जाण्यासाठी मला वोव्हर फुट ब्रीज पार करून जाव लागणार होत. त्यात एक मुलगी (जेमतेम २० वर्ष वय अंदाजे) शरीर यष्टी अतीशय जाड अगदी माझ्या आजुबाजुलाच होती ती ही मला ज्या दिशेने जायचे होते त्याच दिशेने मार्गक्रमन करीत होती.  मेट्रोस्टेशनहून बाहेर पळताना तीन पर्याय होते  १ पाय-या चढून जाणे, २ एस्केलेटर(फिरत्या पाय-या ज्यावर नुसत उभ रहाव लागत) आणि ३ लिफ्ट.  त्या मुलीने यातील पहिला पर्याय निवडावा असे तिच्या पकृतीहून वाटले होते मात्र तिच्या सोबतच्या मैत्रिणीला ती सांगते, चल ना यार एस्केलेटर और सिडीयोंसे बेहतर तो लिफ्ट है.
Moral of the Discussion – दिसती बाजु : तरूण आळशी व आरोग्याच्याबाबतीत उदासीन असतात दुसरी बाजू  शरीराला झेपत नसेल तिथे त्रास करून घेण्याचा अट्टाहस तरूण टाळतात it mean they are Smart.
        तिसरं उदाहरण
          मी एस्कलेटरहून बाहेर पडताना मुद्दाम शेजारच्या सेंटर पार्ककडे कटाक्ष टाकतो, आजही हा शिरस्ता कायम ठेवला तर समोर दोन तरुण जोडपे. एक जोडपं पूर्णपणे एकमेकांच्या बाहुपाशात तर दुस-या जोडप्यांची त्या दिशेने तयारी. महत्वाच म्हणजे सकाळी ११ ची वेळ प्रत्येकाला कामावर ऑफिसला जायची घाई, त्यात मरणाचं उन्ह आणि त्यात तरूणाईचे प्रयोग. ही  मंडळी  विसी -पंचविसीच्या वयाची.
Moral of the Observation – तरूण म्हटल तर बेफिकीर असतात  दुसरी बाजू त्यांनाही भाव-भावना आहेत त्यांना व्यक्त व्हायच आहे. 
                                           ******

Wednesday, April 4, 2018

मोठी उपलब्धी




 

           मोठी उपलब्धी : माननीय राष्ट्रपतींच्या ट्विटर हँडलसाठी मराठी अनुवादाची संधी व तीच सोनं.

दिनांक २० मार्च २०१८ रोजी राष्ट्रपती भवनातील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विशेष कार्य अधिकारी अंकीत जैन यांचा दूरध्वनी आला तो मीच उचलला. त्यांनी विचारले आपले साहेब आहेत का? मी, लगेच त्यांना आमच्या कार्यालय प्रमुखांना दूरध्वनी जोडून दिला. थोडयात वेळात कार्यालय प्रमुखांनी मला बोलवून घेतले व सांगितले, राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात पद्मपुरस्कार प्रदान करण्यात येत असून त्यांनी महाराष्ट्रातील महोदयांसंदर्भात इंग्रजी ट्विट तयार केले आहेत. तेव्हा आपल्या कार्यालयास ते ट्विट मराठी भाषेत अनुवाद करावयास सांगितले आहेत, हे काम तू व्यवस्थितपणे कर. मग काय मराठी ट्टीट तयार आणि साहेबांच्या OK शे-यानंतर राष्ट्रपती भवनास पाठविले ट्वीट आणि त्या दिवशी राष्ट्रपती महोदयांच्या ट्विटर हँडलहून ते  ट्विट प्रसारीत झाले. दिनांक २ एप्रिल २०१८ रोजीही दुस-या टप्प्यातील पद्मपुरस्कार वितरणाच्यावेळी राष्ट्रपती भवनातून अशाच सूचना प्राप्त झाल्या व ठरल्या प्रमाणे मला कार्यालय प्रमुखांचा आदेश झाला व मिशन फत्ते. याठिकाणी राष्ट्रपती भवनातून प्राप्त इंग्रजी ट्विट व त्याचा अनुवाद आणि प्रत्यक्ष राष्ट्रपती महोदयांच्या  ट्विटर हँडलहून प्रसारीत झालेले ट्विट देत आहे.
 20 March 2018

Dear Sir,

As discussed, request you to kindly translate the tweets below into Marathi. Also check that the translated tweet does not exceed the 280 character limit. 

President Kovind presents Padma Vibushan to Ustad Ghulam Mustafa Khan in the field of music. Doyen of the Rampur-Sahaswan Gharana, he is a Hindustani classical singer, music director, scholar and teacher to a long list of notable singers
संगीत  क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  #राष्ट्रपतीकोविंद यांनी  रामपूर साहसवान घराण्याचे गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना  #पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. हिंदुस्तानी शास्रीय गायक,संगीत दिग्दर्शक, संगीत तज्ज्ञ  व अनेक नामवंत गायकांचे गुरु म्हणून ते‍ विख्यात आहेत.
  
#PresidentKovind presents Padma Bhushan to Pandit Arvind Parikh in the field of Art (Music). A sitarist and cultural ambassador of Hindustani classical music, Pandit Parikh is former Vice President of UNESCO's International Music Council
#राष्ट्रपतीकोविंद यांनी संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंडित अरविंद पारिख यांना #पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.  सतारवादक व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे राजदूत अशी ओळख असणारे पंडित पारिख  यांनी युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
#PresidentKovind presents Padma Shri to Dr Abhay Gang and Dr Rani Bang in Medicine. The duo transformed healthcare in Gadchiroli, Maharashtra, over 30 years. Their home-based newborn care model significantly reduced infant mortality and was adopted for pan-India roll out 
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी #राष्ट्रपतीकोविंद यांनी डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ३०वर्षांहून अधिक काळ बंग दाम्पत्यांनी #गडचिरोली जिल्हयात आरोग्यसेवा प्रदान केली. नवजात शिशु संगोपणाचे त्यांचे मॉडेल बालमृत्यू रोखण्यात प्रभावी ठरले आहे.

                                                    2 April 2018
President Kovind presents Padma Shri to Shri Rameshwarlal Kabra Trade & Industry. An industrialist known for his work in rural and especially tribal India, he is part of ‘Friends of Tribal Society’ which has set up 30,000 Ekal Vidyalayas providing free education to 8 lakh children 

व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी श्री रामेश्वरलाल काबरा यांना #राष्ट्रपतीकोविंद यांनी #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी च्या माध्यमातून त्यांनी तीस हजार एकल विद्यालये स्थापित करून आठ लाख विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले आहे.
 

President Kovind presents Padma Shri  to  Dr Gangadhar V. Panatawane for Literature & Education. A Marathi writer and pioneer of the Dalit Literary Movement, he is the founder of journal 'Asmitadarsh' among the first literary and cultural platforms of Dalit expression 
साहित्य व शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी डॉ. गंगाधर पानतावणे (मरणोत्तर) यांना #राष्ट्रपतीकोविंद यांनी #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. मराठीतील नामवंत साहित्यिक व दलित साहित्य चळवळीचे ते अग्रणी होते, त्यांनी अस्मितादर्श  नियतकालिक सुरु करून दलितांचा आवाज बुलंद केला.   

President Kovind presents Padma Shri to Shri Manoj Joshi. A versatile theatre, TV and film actor in Gujarati, Marathi & Hindi. He is famous for essaying the role of Chanakya on TV

बहुआयामी कलावंत श्री मनोज जोशी यांना कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी #राष्ट्रपतीकोविंद यांनी #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. श्री.जोशी हे गुजराती,मराठी व हिंदी रंगभूमी,टीव्ही व चित्रपट क्षेत्रातील प्रसिध्द कलावंत असून टिव्ही वरील चाणक्य च्या भूमिकेसाठी ते प्रसिध्द आहेत.

Warm regards,
Ankit Jain
OSD (Communication)
President's Secretariat
Rashtrapati Bhavan
New Delhi-110004
+91-9711275197 | ankit.jain@rb.nic.in
                    
                                                                          ********






















Friday, March 16, 2018

राजधानीतील शिवजयंती : अनुपम्य व ऐतिहासिक सोहळा
































सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८ 

जाणता राजा, लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह समस्त जगासाठी एक मानबिंदू. आदर्श राजा म्हणून छत्रपतींनी घालून दिलेले मानदंड आजही संपूर्ण देशालाच नव्हे तर जगालाही मार्गदर्शक ठरावे असेच आहेत. छत्रपतींच्या कार्याला उजाळा देण्यासाठी व त्यांच्या शौर्यातून बोध घेण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीत शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम साजरा होतो. मात्र राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीत व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत यावर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने १९ व २० फेब्रुवारी २०१८ दरम्यान दिल्लीत आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे अनुपम्य व ऐतिहासिक सोहळा ठरला.

संसद भवन व महाराष्ट्र सदनाच्या आवारातील छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन, छत्रपतींचा पाळणा, पालखी, भव्य शोभायात्रा, राष्ट्रपती महोदयांची मुख्य कार्यक्रमात उपस्थिती व ‘शिवगर्जना’ महानाट्याचा प्रयोग हे या ऐतिहासिक सोहळ्याचे खास वैशिष्ट्य.
संसद भवनाच्या आवारात छत्रपतींना अभिवादन
शिवजयंतीची पहाट संसद भवनासाठीही ऐतिहासिक ठरली. सन २००३ मध्ये तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत संसदेच्या अवारामध्ये २८ फुटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, गेल्या १५ वर्षात शिवजयंतीदिनी येथील छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रमच झाला नव्हता. त्यामुळेच यावर्षी येथील छत्रपतींच्या पुतळ्यास छत्रपतींचे १३ वे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुष्पहार घालून मानवंदना दिली. सोबत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही छत्रपतींना अभिवादन केले आणि हा ऐतिहासिक क्षण ठरला. 

शिवभक्तीमय महाराष्ट्र सदनाचे देखणे रूपडे 
कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाचा परिसर शिवभक्तांच्या गर्दीने ओसंडून निघाला होता. हजारोंच्या संख्येने केसरी फेटा, कुर्ता आणि पायजमा परिधान केलेले तरुण व वयस्क आणि नऊवारी, नथनी, अंबाडा व केसरी फेटाधारी तरूणी-महिला. सोबतीला ‘जय भवानी जय शिवाजी’ या गर्जनेने निनादून गेलेला अवघा आसमंत. महाराष्ट्र सदनाचा परिसर पूर्णपणे शिवभक्तीमय झाला होता. सदनाच्या सभागृहात शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन पाळणा केला. यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार हेमंत गोडसे यांनीही शिवाजी महाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

भव्य शोभा यात्रा
महाराष्ट्र सदनातून यावेळी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. टाळ-मृदंग, ढोल- ताशे, हलगी, लेझीम, हत्ती- घोडे, मावळे, नऊवारी साडी व फेटेधारी खास मराठी पेहरावातील मंडळी अशा सर्व लवाजम्यानिशी ‘जय भवानी जय शिवाजी’अशा गर्जनेने राजधानी दिल्लीचा आसमंत दुमदुमून गेला. या शोभा यात्रेत हत्तीवर आसनस्थ असलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आकर्षण ठरत होते. महाराजांच्या हत्तीवरील स्वारीसमोर वेषभूषेतील अष्‍टप्रधान मंडळ आणि सांप्रदायिक भजन मंडळीचा सहभाग शोभून दिसत होता. ज्ञानोबा-तुकाराम या गजराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निनादून गेले होते. ढोल-ताशे व झांज पथकात सहभागी झालेल्या मुली व तरूण मुले यांचा उत्साह शोभून दिसत होता. याच शोभा यात्रेत दोरखंडावर विविध आसने सादर करणाऱ्या नऊवारीतील मुली आणि मल्लखांबाचे सादरीकरण करणारी मुले, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करणारे तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दिल्लीतील स्थानिक मराठी शाळांचे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. खास मराठी पेहरावातील या विद्यार्थ्यांनी लेझीमवर सर्वांना ठेका धरायला लावला. महाराष्ट्र सदनापासून निघालेल्या शोभायात्रेचा येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रांगणावर समारोप झाला.

शोभा यात्रेतील शिवभक्तांचा उत्साह इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातही कायम होता. दुपारी शोभा यात्रेच्या समारोपानंतर येथे रक्तदान शिबीर व त्यात तरूणांचा सहभाग तसेच ढोल व झांज पथकांचे प्रात्यक्षिके, वासुदेव, गोंधळ-वारकरी- दिंडी-लेझीम या लोककलांच्या सादरीकरणाने येथील वातावरण महाराष्ट्रीय संस्कृतीत न्हाहून गेले होते.

राष्ट्रपती महोदयांची उपस्थिती
राजधानीतील शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती म्हणजे या सोहळ्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करणारे ठरले. राष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले व उपस्थितांना संबोधित करताना छत्रपतींचे वैविध्यपूर्ण कार्य अधोरेखीत केले. राजधानीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे भव्य आयोजन व या सोहळ्यात खास पेहराव जणू दिल्लीत मिनी कोल्हापूर अवतरल्याचा अनुभव देत आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी उपस्थितांचे कौतुक केले. या कार्यक्रमात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रपतींना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. यासंदर्भात आपल्या भाषणात विशेष उल्लेख करत राष्ट्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमुळे आता राष्ट्रपती भवनातील उणीव भरून निघाली. यावेळी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा, श्री शाहू छत्रपती महाराज आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मंचावर विशेष उपस्थिती होती. तर प्रेक्षकांमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईट इन्फेट्री पी.जे.एस.पन्नु उपस्थित होते.

दिनांक १९ व २० फेब्रुवारी २०१८ दरम्यान येथे ३०० कलाकारांचा समावेश असलेल्या शिवगर्जना या महानाट्याचे सादरीकरणही झाले. एकंदरीतच राजधानी दिल्लीतील हा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्यदिव्य सोहळा व त्यातून दिल्ली व परिसरातील मराठी माणसांचा दिसून आलेला एकोपा छत्रपतींच्या दिव्य व्यक्तीमत्वातून सर्वांना स्फूर्ती देऊन गेला, म्हणूनच हा सोहळा अनुपम्य व ऐतिहासिक ठरला.

-रितेश मोतीरामजी भुयार,उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.