Monday, January 16, 2017

‘माझ्यातील शेफगिरी’ अशी ही आठवण

                                          
प्रसंग ऑफीसला जाण्याचा. घाईतच रामकृष्ण आश्रम मेट्रो स्टेशनवर आलो. सेक्युरीटी चेकसाठी मशीन मध्ये ऑफीसबॅग ठेवताच मागून आवाज आला अरे कैसे हो भाई , कहा ऑफीस निकले हो शायद, यार तुम्हारे हात की वह कटहल(फणस)की सब्जी आज भी याद आती है”.  हा एकेरी संवाद ऐकुण मी कुतुहलाने मागे पाहतो तोच ४ वर्षा पूर्वी एका ऑफीसमध्ये माझ्या सोबत काम करणारा माझा मित्र रामदिसला. अगदी ५ मिनटांच्या चालत्या -फिरत्या भेटीत आम्ही एक-मेकांची हाली खुशाली जाणून घेतली. मी ऑफीससाठी  मेट्रो घेतली तर राम त्याच्या आई आणि बहीणीला घेऊन मोतीनगरला गेला. आता मात्र ऑफीसला पोहचेपर्यंत मी फ्लॅश बॅक मध्ये गेलो. माझ्या शेफगिरीच्या मजेशीर गोष्टी आठवून मलाच माझ हसू आवरेणा आणि  माझा स्वाहभिमानही आपसूक दुनावला.
घरापासून  लांब असल्याने स्वयंपाक करण्याचे प्रसंग अनुभवने क्रमप्राप्त होते. अमरावतीला पत्रकारितेच शिक्षण घेण्यासाठी आलो तोच माझ्यातील शेफगिरीची परिक्षा सुरु झाली. रूम वर भांडयांची चण चण आणि त्यात पुरण पोळी करण्याची मला आलेली खुमखुमी हा प्रसंग मजेशीरचं. कुकर मध्ये हरब-याची डाळ शिजवली. पण, मिक्सर नसल्याने आता पुरण वाटावे(बारीक करणे) कसे ? हा प्रश्न पडला. मग काय  पातेल्यात शिजलेली हरब-याची डाळ घेतली आणि रवी घेऊन बारीक करण्याचा प्रयत्न केला.मात्र, अपयश आले काही केल्या डाळ बारिक होईना परिणामी पुरणाची पोळीच तयार होऊ शकली नाही. हे अपयश कमी होते तर काय नवीन प्रयोग म्हणून मित्रांना रोडगे(राज्याच्या काही भागात याला पानगे म्हणतात.) खाऊ घालण्याचा घाट रचला. रोडगे तयार करण्यासाठी जाडसर पिठाची आवश्यकता असते ते ही दळून आणले. आता गोव-या आणाव्या लागत होत्या , त्या पण आणून झाल्या. मात्र हे रोडगे शिजवताना जमीनीवर शिजवण्यासाठी आमच्या रूमच्या व्हरांडयात नुसती मातीदार जमीन नसल्याने (सर्वत्र फरसी पसरलेली) हा प्रयोगही अपयशी ठरला. पुढे  रोडग्यांना पर्याय म्हणून मी बिटटया हा प्रकार लिलया करायला लागलो आणि मित्रांना करून खाऊ घालू लागलो, आपसूकच त्यांच्याकडून शाबासकी मिळू लागली. पुढे पनीर नावाच्या प्रकारान माझ्या मनात गारुड घातल. मग काय प्रयोग सुरु. पालक पनीर करायला घेतले. पहीलाच प्रयोग अपयशी ठरला पण प्रयोगातून शिकलो आणि मी पालक पनीरकाजु करी या भाज्या बनवण्याच ब्रँड मिळवल. जवळच्या लोकांकडे गेलेा म्हणजे या भाज्या बनवण्याची फरमाईस मला यायला लागली. शिक्षण, स्ट्रगल आणि आवड जपण्याचा प्रांजळ प्रयत्न असा उत्तम ट्रँगल जुळून आला अमरावतीच्या वास्तव्यात.  
 पुढे  शिक्षणासाठी पुण्याला गेलो, इथे मात्र  मेसचं जेवण असल्यानं माझ्यातील शेफ पूर्णपणे शांत आणि निवांत होता. तेथून पुढे करीअरसाठी दिल्लीत आलो. इथे मेस प्रकार नव्हता आणि  दाल मखनी, दाल फ्राय, मटर पनीर, कढाई पनीर अशा भाज्या त्यात पडणारं बटर आणि भरीस भर म्हणून तंदूर रोटी (जी पचायला अवघड) त्यावर बटर यामुळे माझ्या जेवणाच तंत्रच बिघडून गेल होत. मग रूम शोधली आणि चांगल -चुंगल जेवण करण्यासाठी किचन सजवलं. पुन्हा माझ्यातील शेफगिरीला सुरुवात झाली. आता इथे टोमॅटोची चटणी,काजू करी, बैंगन भरता, सरसों का साग, अरबी  आणि  कटहल अशा भाज्या बनवण्यात मी मास्टरी मिळवली. ज्याला ज्याला जी भाजी आवडायची तो माझ्या भाज्यांचा फॅन होऊ लागला. लाडक्या वहीनीबाईंना करून खाऊ घातलेली सरसों का साग आणि मके की रोटी हा हिवाळयातील पंजाबींचा खास व्यंजन प्रकारही शाबाशी मिळवून गेला. ज्या ऑफीस मध्ये माझा मित्र राम होता तिथेच मुलींना मात्र माझ्या हातची टोमॅटोची चटणी आवडायची. त्या मुलींनी तर माझ्याकडून रेसिपी सुध्दा समजून घेतली होती. असा हा माझ्या शेफगिरीचा प्रवास लग्ना नंतर जवळपास थांबलाच. आता मी फार क्वचीत किचन मध्ये जातो , इनफॅक्ट माझी अर्धांगिनीच मला किचनमध्ये काही बनवण्याची परवानगी देत नाही. पण, तरीही तिला बर नसल किंवा मलाच काही बनवण्याच मुड झाल तर मी बनवतो काहीही आणि आता माझी अर्धांगिनीही मला शाबासकी देते. अशा रितीने माझ्या शेफगिरीच्या प्रवासात मी घडत गेलो आणि मला शाबसकी देणारे अस्सल खवय्ये व शेफची पारख असणारे बदलत गेले. But frankly speaking I still love preparing food for a change. आणि तुम्ही मनापासून जेवनं बनवलं तर ते उत्तमच बनते हा माझा अनुभव इथे नमूद करून थांबतो.
                                                        ******   

Friday, October 28, 2016

मातीशी जुळलेली भूमिका करण्याची इच्छा : वृषाली हटाळकर

                                                                  
नवी दिल्ली दि. 21 : ग्रामीण माती-संस्कृतीशी जुळलेली भूमिका करण्याची भावना अभिनेत्री वृषाली हटाळकर यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केली .   
         केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सादरीकरणासाठी आलेल्या वृषाली हटाळकर यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत त्यांनी या भावना व्यक्त केल्या. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी वृषाली हटाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच, नृत्यांगना रोशनी उर्फ सविता म्हात्रे, लावणी सम्राट ग्रुपचे प्रमुख प्रमोद कोंदळकर यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार, दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी, वरिष्ठ पत्रकार विनीत वाही  यावेळी उपस्थित होते.   
              वृषाली हटाळकर यांनी दूरशर्नच्या सहयाद्री वाहीनीवरील दामीनी या नाटकातून अभिनयाला सुरुवात झाली. त्यानंतर मी माझ्या मुलांचा, वाटा-पळवाटा आणि बरसात या नाटकात प्रमुख भूमिका केल्या. तो येतो, अब्राहम, लग्नाची वरात लंडणच्या घरात, डम-डम डिगा डिगा अशा नऊ मराठी चित्रपटात काम केले असून सहा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शिवाय तेलगू, पंजाबी, भोजपूरीसह दक्षिणेतील  चित्रपटांमध्ये भूमिका केल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडीयो अल्बम आणि जाहीरातीही केल्या. ग्रामीण भागातून संघर्ष करून आपण अभिनय क्षेत्रात पुढे आलो असल्याने ग्रामीण माती-संस्कृती यांच्याशी जुळलेली भूमिका करण्याची इच्छा असल्याचे वृषाली हटाळकर म्हणाल्या. 
            जीवन हेच एक पुस्तक असून माणस वाचनातून मी घडत गेल्याचे हटाळकर सांगतात.  हाच, अनुभव गाठीशी घेऊन अभिनयालाही धार आली. लग्नानंतर आपली कारकीर्द बहरल्याचे त्या अभिमानाने सांगतात.  लग्नानंतर तेलगू, पंजाबी, भोजपुरी, शिंदी आणि मराठी अशा भाषांमधे नामवंत कलाकारांसोबत अभिनय करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नृत्य आणि गायनातही हटाळकर प्रवीण आहेत. अभिनयाच्या विविध प्रातांमध्ये अजून मोठी भरारी घ्यायची आहे त्यासाठी नवनवीन गोष्टी शिकतेय असेही वृषाली हटाळकर म्हणाल्या.  

                                                   0000000 

आदिवासी भागांच्या विकासासाठी‘श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रूर्बन मिशन’


देशातील आदिवासी भागांमध्ये उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध  करून देत आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाअंतर्गत श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रूर्बन मिशनही योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशात येत्या तीन वर्षात ३०० क्लस्टर उभारण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे पैकी  विविध राज्यांमध्ये १०० क्लस्टर उभारण्यात येणार आहे.योजनेच्या पहिल्या टप्यात विविध चाचण्यांनंतर  ८ राज्यातील १२ आदिवासी क्लस्टर विकसीत करण्याची अंमलबजावणी सूरू झाली आहे. महाराष्ट्रातून जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगरची निवड या क्लस्टरसाठी करण्यात आली आहे. 
आदिवासीबांधव हे मुळात उत्तम कलागुणी असतात त्यांच्यातील कला विकसीत करण्यासाठी कौशल्य वृध्दी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, प्रत्येक घरात स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देणे, २४ तास स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रत्येक घरात स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, शाळांच्या उत्तम इमारतींचे बांधकाम करणे, आदिवासी गावांमध्ये दुग्धव्यवसायांप्रमाणे अन्य शेतीपूरक व्यवसाय विकसीत करणे, या भागात मोबाईल आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आदिवासी भागांतील गावांना एकमेकांशी जोडण्यासाठी सडकांचे जाळे उभारणे , आदिवासी गांवाना शासन व जगाशी जोडण्यासाठी येथे ई ग्राम केंद्र उभारणे आदिंची अंमलबजावणी या कार्यक्रमांतर्गंत करण्यात येणार आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगढ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रूरर्बन मिशनची सुरुवात झाली.
  २०११ च्या जनगनणेनुसार देशात एकूण ६६१ जिल्हे असून या योजनेसाठी यातील आदिवासीबहूल लोकसंख्येच्या १०० जिल्हयांची निवड करण्यात आली. आदिवासी बहूल १६ राज्यांतील या १०० जिल्हयांमधे उप विभाग करण्यात आले असून आदिवासी गावांची निवड करण्यासाठीएकात्मीक क्लस्टर कृती आराखडाआखण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी तीन स्तरांवर मुल्यांकन करण्यात येऊन आदिवासी गावांची निवड करण्यात येते. थोडयाफार फरकाने इतर आदिवासीगावांपेक्षा पुढारलेल्या आदिवासी गावांची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी राज्यांचे मुख्य सचिव हे संबंधित राज्यातील मुख्य  निरीक्षक आहेत. जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्यावतीने  २ वरिष्ठ अधिका-यांच्या देखरेखीत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी १५ कोटींचा निधी देण्यात येत आहे. एकुणातील ७० टक्के निधी हा केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यक्रमांतून उभारण्यात येत आहे.तर उर्वरित ३० टक्के निधी हा केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या क्रिटीकल गॅप फंडींगमधून देण्यात येत आहेत. आतापर्यंत केंद्राने या योजनेसाठी २०६ कोटींचा निधी वितरीत केला आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्या-त्या राज्यांनी निधी उभारण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी केंद्र शासनाने राज्यांकडे आग्रह केला आहे. तसेच विविध उद्योग समुहांनीही सीएसआरच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
(दिल्ली येथील प्रगती मैदानमध्ये केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने दिनांक २६ते२८ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत आयोजित राष्ट्रीय आदिवासी कार्निव्हलमध्ये वार्तांकनासाठी गेलो असता, नॅशनल रुर्बन मिशन आणि आदिवासी विकास या विषयावर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या उपसचिव रेखा चौहान यांचे सादरीकरण आवडले त्यातील काही मुद्दे टिपले होते त्यावर आधारीत हा लेख.)

                                                ००००००



Friday, October 7, 2016

यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि संयम या त्रिसुत्रीवर भर द्या- कलावंत मनोज जोशी

नाट्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्याचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे हस्ते राष्ट्रपती भवनात नुकतेच एका देखण्या सोहळ्यात वितरण झाले. रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील गोरेगाव येथे जन्मलेले आणि मराठी, गुजराती व हिंदी रंगभूमीवर अभिनय, दिग्दर्शन व लेखनाने आपली अमीट छाप सोडून नाट्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारावर नाव कोरणारे प्रसिद्ध कलावंत मनोज जोशी यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मनोज जोशी यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतलेला नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांवरील प्रवास. खास नेट भेटच्या वाचकांसाठी. 

प्रश्न : नाट्य क्षेत्रातील देशात सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन ! त्याला जोडूनच प्रश्न, हा पुरस्कार मिळाल्यावर आपल्या काय भावना आहेत?उत्तर : मी ज्या क्षेत्रात कामाचा पाया घातला त्याच क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याचा अतीव आनंद आहे. हा पुरस्कार रंगदेवतेचा प्रसाद असून मी यास रंगभूमीवरील माझ्या कामाची खऱ्या अर्थाने सुरुवात मानतो. नाटक ही साधना आहे, त्याला अंत नाही. मला अजून रंगभूमीवर खूप काम करायचे आहे. मला नाट्य क्षेत्रातील कामासाठी सदैव प्रोत्साहन देणारे माझे आई–वडिल आणि अगदी पहिल्या नाटका पासून आतापर्यंत मला साथ देणारे बॅक स्टेज आर्टीस्ट, सहकलाकार, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ कलाकार आणि माझ्यावर प्रेम करणारे दर्शक अशा सर्वांचा हा पुरस्कार असल्याचे मला वाटते त्यांच्या सहकार्याने आणि माझ्या प्रामाणीक प्रयत्नांमुळेच मी हे यश संपादन करू शकलो.

प्रश्न : आपण अभिनयाकडे कसे वळलात? आणि आपल्या पहिल्या नाटका विषयी जाणून घ्यायला आवडेल ! 
उत्तर : माझे कला क्षेत्रातील शिक्षण कोठे झाले हा तुमच्याकडून प्रश्न येण्याआधीच सांगतो की, मी NSD अर्थात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ चा विद्यार्थी आहे. म्हणजे मी नैसर्गीक रित्या अभिनय शिकलो. नाट्य क्षेत्रात देशातील सर्वोच्च प्रशिक्षण संस्था म्हणून ख्याती असणारी दिल्लीतील एनएसडी म्हणजेच राष्ट्रीय नाट्य विद्यालयात मी प्रशिक्षण घेतलेले नाही. माझे वडील ह.भ.प. नवनीत महाराज जोशी हे प्रसिद्ध राष्ट्रीय किर्तनकार आहेत. नारदीय किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांत सांस्कृतिक पूल बांधण्याचे काम केले. वडीलांच्या किर्तनाला जायचो. किर्तन म्हणजे अभिनय, गायन आणि वक्तृत्व यांचा संगम. वडीलांच्या किर्तन सादरीकरणातूनच मला अभिनयाचे धडे मिळाले. वयाच्या ५ व्या वर्षी मी सर्वप्रथम शाळेत अभिनय केला तोच अभिनयाचा श्री गणेशा. गुजराती नाटक ‘ताक धिना धिन’(१९८६) हे माझ पहीलं नाटक. तर विवेक लागू दिग्दर्शीत ‘सर्वस्वी तूझीच’ (१९९५) हे माझ मराठीतील पहिल नाटक.

प्रश्न : ‘चाणक्य’ ही चरित्रभूमिका तुमच्या नावाला जुडली आहे. चाणक्य आणि मनोज जोशी हे रंगभूमीवरील समीकरण या विषयी काय सांगाल ?उत्तर : ‘चाणक्य’ या नाटकाची मध्यवर्ती भूमिका चाणक्याची असून मी ही भूमिका साकारली आहे. दर्शक, समीक्षक यांनी या भूमिकेसाठी माझे तोंडभरून कौतुक केले. वर्ष १९८६ मध्ये चाणक्य नाटक लिहायला घेतलं. त्यातील विविध साजेशे बदल त्याला जोडून अन्य बाबी अशी सर्व तयारी करून १९९० मध्ये ‘चाणक्य’ हे नाटक आम्ही गुजरातीत सुरु केलं. १९९६ पासून या नाटकांचे हिंदीत प्रयोग सुरु झाले. नाटकाचे दिग्दर्शन मी स्वत: केले आहे. आजपर्यंत या नाटकाचे ९९६ प्रयोग झाले आहेत. संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानंतर अकादमीच्यावतीने ललीत कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते व पुरस्कार प्राप्त कलाकार यात आपले सादरीकरण करतात. दिनांक ७ ऑक्टोबर २०१६ रोजी दिल्लीतील राष्ट्रीय नाटय विद्यालयात या नाटकाचा ९९७ वा प्रयोग असणार आहे. लवकरच आम्ही या नाटकाचा हजारावा प्रयोग करणार आहोत याचा अत्यंत आनंद आहे. 

प्रश्न : मराठी, गुजराती आणि हिंदी रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणी वरील मालिकांमधील आपल्या योगदानाबद्दल जाणून घ्यायला आवडेल !उत्तर : मराठी, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर मी १७ नाटकांमध्ये भूमीका साकारल्या आहेत. मराठी नाटकांमध्ये ‘सर्वस्वी तूझी’, गुजरातीमध्ये ‘सुर्यवंशी’, ‘गांधी विरूध्द गांधी’ आणि हिंदी मध्ये ‘गोल माल प्यार’, ‘रंगीला’ ही नाटक सांगता येतील. माझ्या चित्रपट कारकिर्दीला १९९० पासून सुरूवात झाली असून हिंदी, मराठी, गुजराती आणि पंजाबी अशा एकूण १०२ चित्रपटांमध्ये मी भूमीका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये ‘सरफरोश’, ‘देवदास’, ‘हंगामा’, ‘गोलमाल’, ‘भागमभाग’ ‘‘फिर हेरा फेरी’, ‘चूप चूपके’ तर मराठीमध्ये ‘बालगंधर्व’ , ‘नारबाची वाडी’, ‘यलो’ असे चित्रपट सांगता येतील. माझी पहिली दूरचित्रवाणीवरील मालिका ही मराठी आहे. ‘राऊ’ या मालीकेतून माझे पदार्पण झाले. त्यानंतर ‘आभाळमाया’, ‘बंदीनी’, ‘दामीनी’, ‘आकाश पेलताना’, ‘झुंज’, ‘होणार सून मी या घरची’ अशा मराठी मालींकामध्ये काम केले. ‘माँ’, ‘एक महल हो संपनों का’, ‘जानेमन जानेमन’ आदी हिंदी दूरचित्रवाणीवरील मालीका सांगता येतील. 

प्रश्न: हल्ली सारखी एक ओरड असते की, नाटकाला वाईट दिवस आलेत. यावर आपलं मत काय ?
उत्तर : नाही, मी याच्याशी पूर्णपणे असहमत आहे. भारतातील जनतेच्या धमण्यांमध्ये कला भिनली आहे. त्यांना उत्तम नाटक हवे आहेत. नाटक करण्याची प्रवृत्ती आणि ती स्वीकारण्याची वृत्ती वाढण्याची गरज असल्याचे मला प्राणाणीकपणे वाटते. भारताच्या कोणत्याही राज्यात गेलात तर तेथील मंदीरांमध्ये चितारण्यात आलेल्या चित्रांमध्ये आपल्याला कलेचा उत्तम नमूना सापडतो. तर माणसाच्या दैनंदिन जगण्यात नाटक असते त्यामुळे नाटकाला मरण नाही. नाटकाचे प्रयोग सादर करण्याची प्रवृत्ती मात्र वाढली पाहीजे त्याने हे क्षेत्र आणखी विकसीत होईल. यापुढे जावून मी सांगेन की, प्रत्येक राज्यांनी आपल्या शालेय अभ्यासक्रमात नाटक हा विषय समाविष्ट करावा.प्रत्येक राज्याची लोककला जीवंत राहण्यास याची मदत होईल. काही प्रसंगी शालेय अभ्यासक्रमातील इतिहासासारखा विषय नाटकाच्या आधारे शिकवल्यास विद्यार्थ्यांना हा विषय रोचक वाटेल आणि चटकन समजेल. 

प्रश्न : भारतीय रंगभूमीवर गाजलेले स्वर्गीय विजय तेंडूलकर लिखीत ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आपण हिंदीत अनुवादीत करून गुजराती रंगभूमीवर आणलं. या प्रयोगाबद्दल काय सांगाल ?उत्तर : स्वर्गीय विजय तेंडूलकर यांच्या लेखनीतून साकारलेले आणि श्रध्देय भास्कर चंदावरकर यांच्या दिग्दर्शनाने मराठीसह भारतीय रंगभूमीवर गाजलेलं घाशीराम केातवाल हे नाटक गुजराती रंगभूमीवर आणण्याचा अवघड प्रयोग मी यशस्वीपणे करू शकलो. याचं सर्वस्तरातून कौतुक झाल. मी स्वत: या नाटकाचा गुजराती अनुवाद केला. हे नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करताना मराठी कलाकार आणि त्यांच्या तोंडी गुजराती संवाद असल्याने नाटक उत्तम झाले. भास्कर चंदावरकरांनी या नाटकासाठी वापरलेले मीटर मी गुजरातीमध्येही तंतोतंत वापरले त्यामुळे ही उत्तम कलाकृती ठरली. 

प्रश्न : ‘राऊ’ ही मराठीतील मालीका, दूरचित्रवाणीवरील तूमची पहिली मालिका ठरली त्या विषयी काय आठवणी आहेत?
उत्तर : त्यावेळी मी रंगभूमीवर नाटकांमध्ये काम करायचो. एक दिवस अचानक स्मिता तळवलकर आणि संजय सुरकर हे दिग्दर्शक निर्माते द्वय माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की या नाटकातील बाजीराव पेशवेंच्या मुख्य पात्रसाठी आम्ही तुझी निवड केली आहे. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. या दोघांनी मला ‘राऊ’ कांदबरीचे लेखक ना.स.इनामदार यांच्याकडे नेलं. ते म्हणाले अरे हा तर हुबेहूब बाजीराव शोभतो. आणि इथूनच नाटकाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. या नाटकाच्या माध्यमातून मी पहील्यांदा कॅमेरा फेस केला. सतत २६ दिवस चित्रीकरण चाललं या दरम्यान संजय सुरकर मला सारखे सीन समजून सांगत असत. मी अभिमानाने सांगतो की, स्मीता तळवलकर आणि संजय सूरकर यांच्या मुळेच दूरचित्रवाणी वरील मालीका आणि चित्रपटाचां माझा पाया रचला गेला.

प्रश्न : सध्या कोणकोणती नाटक, चित्रपट व मालिकांवर काम सुरु आहे ?
उत्तर : मी सध्या रंगभूमीवर चाणक्य या नाटकांच्या प्रयोगात व्यस्त आहे. ‘१५ ऑगस्ट भागीले २६ जानेवारी’ आणि आणखी एका मराठी चित्रपटात मी भूमिका करीत आहे त्याच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यासोबतच एका हिंदी आणि गुजराती चित्रपटाचेही चित्रीकरण सुरु आहे, येत्या डिसेंबर महिन्याअखेर या सर्व प्रकल्पांवरील काम संपेल अशी अपेक्षा आहे. 

प्रश्न : नाट्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदितांना आपण काय संदेश द्याल?
उत्तर : सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि संयम या त्रिसुत्रीवर मी या क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवू शकलो. नवोदितांनीही याचं त्रिसुत्रीचा अवलंब करून पुढे जावे असा सल्ला देईन व या कामी त्यांना मनापासून शुभेच्छा देईन. 

आपण अतिशय व्यग्रतेतून बहुमोल वेळ दिला त्यासाठी धन्यवाद ! आपल्याकडून रंगभूमीची अशीच सेवा घडत राहो व या क्षेत्रात आपण आणखी उत्तमोत्तम काम करीत राहोत या सदिच्छा. 

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, 
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

Saturday, September 17, 2016

पंतप्रधान मोदी वक्ता सहस्त्रेषु आणि अजूनही : त्यांच्या ६७व्या वाढदिवसा निमीत्त



         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६७ वा वाढदिवस. या देशाचा सामान्य नागरीक म्हणून माझ्या नजरेतून त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडायचा मोह आवरला नाही म्हणून हा लेख प्रपंच. मी, व्यक्तीपूजक नाही आणि कोणत्या राजकीय पक्षाचा फॉलोअरही नाही हे मी आधिच स्पष्ट करतो.
         मोदी यांच्या व्यक्तीमत्वाचा मला भावलेला पैलू म्हणजे त्यांचे अमोघ वक्तृत्च. बहुतेक नेते मंडळी ही त्यांच्या वक्तृत्चामुळे ओळखले जातात. मोदी ही त्याला अपवाद नाहीत उलट ते एक सरस वक्ते आहेत असच म्हणाव लागेल. पंतप्रधान होण्या आधी मी त्यांचे एकही भाषण ऐकले नाही ही विशेषत्वाने नमूद करतो. मात्र, विविध कार्यक्रमांमध्ये(ज्यातील काही कार्यक्रमांचे मी स्वत: कव्हरेज केले.), परदेश दौ-यांमधे आणि मन की बात या रेडीओ कार्यक्रमातील त्यांच्या भाषण शैलीचा मी बारकाईने अभ्यास केला. मनाला भिडणारे शब्द, शब्द फेक, उच्चारणातील चढ-उतार आणि उत्तम हाव भाव हे त्यांच्या वक्तृत्वातील ठळक वैशिष्टे.  प्रत्येक भाषणात नावीन्यपूर्ण संकल्पना असतात त्यांच्या. २०१४ च्या निवडणूक प्रचारातील भाषणांमध्ये दिवसाला ४ प्रचार सभा असतील तर तेथील त्यांचा पेहराव आणि भाषणातील मुद्दे एकदम वेगळे मात्र स्थानिक प्रश्नांची पूर्ण माहिती घेऊन स्थानिक प्रश्नांना साद घालणारे वक्तव्य ते आपल्या शैलीने लिलया पेरतात हा माझा अनुभव. सरकारी कार्यक्रम वा योजनांच्या उदघाटन प्रसंगीचं भाषण त्याहून वेगळ त्यात आव्हान करणारे वक्तव्य मनाला भीडतात. सामन्य जनतेला संबोधून करण्यात येणार  लाल किल्ल्यावरील स्वातंत्र दिनाचं भाषण हे राजकीय सामाजिक आणि आर्थिक अशा विविध छटा असणारं. आता हे भाषण मोदी साहेब स्वत: तर तयार करीत नसतील अर्थात त्यांच्याकडे वेळ नसतो.मात्र, भाषणाचे मुद्दे मिळाल्या नंतर ते फुलवण्याच त्यांच कौशल्य भारी आहे.
           संसद भवनातील ग्रंथालयात ज्ञानपीठ पुरस्कार वितरण कार्यक्रमातील भाषण, १५ ऑगस्ट २०१५ रोजीचे लाल किल्यावरील भाषण, सेतू भारतम या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या योजनेच्या शुभारंभातील भाषण,ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील त्यांचे भाषण आणि २८ जानेवारी २०१६ रोजी एनसीसी कॅडेट्सला पंतप्रधान बॅनर वितरण कार्यक्रमातील भाषणाचे वार्तांकण करण्याची मला संधी मिळाली हे इथे आवर्जून नमूद करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पंतप्रधानांना काही अंतराहून बघण्याची संधी मिळाली. यात बहूतेक वेळा माझी पत्नीही सोबत होती त्यामुळे तिलाही मोंदीच दर्शन घडल.
         पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या वहील्या गणतंत्र दिनी २६ जानेवारी २०१५ रोजी अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे असताना मोदींना सर्व नियम व सुरक्षा बाजुला ठेवून वर हात करून उपस्थितांना केलेले अभिवादन म्हणजे आम्ही दोघांनी त्यांना १० ते १५ फुट अंतराहून बघण्याचा सुखद प्रसंग. त्यानंतर ऑफीसचा कॅमेरामन नसल्यानं स्वत: कॅमेरा चालवत महाराष्ट्र सदनात आयोजित मुख्यमंत्री परिषदेच्या समारोपाचे वक्ते म्हणून संबोधीत करण्याकरीता आलेले मोदी हे मला पुन्हा एकदा १० ते १५ फुटांहून पाहण्याची मिळालेली संधी.            
        आता थोड कामाबद्दल . पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशात स्वच्छतेला प्राधान्य देत सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान’, पायाभूत सुविधांनी सज्ज अशा शहरांची संकल्पना असलेले स्मार्ट सिटी’  प्रकल्प, आर्थिक सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकत सुरु झालेली पंतप्रधान जनधन योजना’, मुलींचा  घटत जाणारा जन्मदर रोखण्यासाठी सुरु झालेली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान,  बेरोजगरांना काम आणि उद्योगांना कुशल कामगार देणारी स्कील इंडिया ही योजना,  कृषी क्षेत्रात मोलाची ठरणारी पंतप्रधान पिक विमा योजनाअशा महत्वाच्या योजना वैशिष्ट पूर्ण म्हणता येईल त्याच्या प्रत्यक्ष व चोख अंमलबजावणीमुळे मोठा देशात मोठा व सकारात्मक बदल घडण्यास मोठी मदत होईल हे निश्चित.
           काही दुर्देवी घटनाही घडल्या. मुस्लीम व दलीत बांधवांवर झालेले अत्याचार, महिलांवर झालेले अत्याचारही आपल्याला दृष्टी आड करून चालत नाहीत. जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवादी आणि फुटीरतावादयांच्या कारावयांमुळे गालबोट लागले.उत्तराखंड आणि अरूणाचल प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा केंद्र सरकारकडून झालेला प्रयत्न आणि या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र  सरकारला लगावलेली चपराक सुध्दा चर्चेचा विषय झाला.
     याच काळात शिक्षक दिनी पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत स्वत: उपस्थित राहून संशोधकांना दिलेले प्रोत्साहन, रीओ ऑल्म्पिक मधे भाग घेण्यासाठी जाणा-या खेळाडूंना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या शुभेच्छा आदी बाबी उल्लेखनीय वाटल्या.                                       
         योजना आयोगाचे नाव बदलून निती आयोग करणे, कृषी मंत्रालयाला जोडून शेतकरी कल्याण नामकरण करणे या बाबींचा विचारही महत्वाचा ठरतो. मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून दर महिन्याला थेट जनतेशी संवाद करण्याची त्यांची शैलीही उत्तम ठरते. विविध राज्यांतील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान स्वत: व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून त्या-त्या राज्यांच्या मुख्य सचिवांशी दर महिन्याला  घेत असलेली बैठक याचाही उल्लेख महत्वाचा ठरेल.
        विदेश नितीचा विचार करता सकारात्मक बाबी दिसून येतात. ज्या अमेरीकेने मोदींना व्हिजा नाकारला होता त्याच अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांशी त्यांचे जुडलेले टयुनींग संपूर्ण जगाने पाहीले त्यामुळे आशिया खंडात भारताची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली. अमेरीकेने भारताला संयुक्त राष्ट्र संघात स्थायी सदस्यत्वासाठी जाहीर केलेला पाठींबा आणि अमेरीकी संसदे संबोधित करण्यासाठी मोदींना देण्यात आलेले निमंत्रण हे जागतिक राजकारणात महत्वाचे ठरते. जपान, चिन, अमेरिका, इंग्लड सासख्या बलाढय देशांसह आखाती देशांसोबतची मैत्री  जागतिक राजकारणात महत्वाची ठरते. परदेश दौ-यात भारतीयांना संबोधन म्हणजे कुटनितीक दृष्टया महत्वाचे ठरले. प्रत्येक देशांशी भारताचे व्यापारीक व नैसर्गीक संबंध सुधारण्याच्या दिशेने ते महत्वाचे पाऊले ठरतात. पंतप्रधानपदाची शपथ घेतानाच सार्क देशाच्या प्रमुखांना मोदींनी निमंत्रित करून नवा पायंडा पाडला हे ही इथे उल्लेखनीय.
      दर वाढदिवासाला आपल्या आईचे आशिर्वाद घेण्यासाठी जाणारे मोदी  आणि पक्ष व देशा प्रती  त्यांची असलेली श्रध्दा एका सच्या मानसाची ओळख करून देते.
    

Wednesday, August 31, 2016

कल्पक व भावनाशिल चित्रकार श्री. चक्रधर हिवसे




              श्री. चक्रधर हिवसे यांच्या चित्तवेधक चित्रांनी उभी केली पंढरीची वारी
आलीया संसारा उठा वेग करा ! शरण जा उदारा पांडुरंगाया संतोक्तीनुसार सर्वांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा निर्देश केलेला आपणास जाणवतो. देश व राज्याच्या कानाकोप-यातून पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात भक्त सध्या मोठया प्रमाणात उपस्थित आहेत. आषाढीवारी निमित्त महाराष्ट्रातील तमाम विठ्ठल भक्त लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी आसूसले आहेत. हाच धागा धरुन मानवी मनाचा भाव आपल्या चित्रांमधून नेमकेपणाने मांडणारे प्रसिध्द चित्रकार चक्रधर हिवसे यांनी पांडुरंगाचे व त्याच्या लाडक्या भक्तांचे भाव आपल्या चित्रांतून नेमकेपणाने मांडले आहेत.
वारक-यांचा शूभ्र वेष परिधान केलेला, भाळी चंदनाचा टिळा, गळयात तूळशीची माळ आणि हाती चिपळया- विणा असणारा चित्रातील वारकरी आणि त्याच्या मागोमाग पताका, टाळ मृदंगासह हरिनामाचा गजर व डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जात नामजप करणा-या महिला वारक-यांचा जथ्था यासर्वांच्या मनोभावे भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना प्रेरणा देणारा चित्रातील पांडुरंग. अशी अप्रतिम कलाकृती श्री. हिवसे यांच्या चित्रातून कला रसीकांना भेटते.  
            श्री. हिवसे यांनी या चित्रांमधे केलेला रेषा, प्रकाश आणि रंगसंगतीचा अचूक व नेमका वापर यामुळे पंढरपूरच्या वारीचे चित्र ठळकपणे आपल्या डोळयांसमोर उभे राहते. एका चित्रात त्यांनी पांडुरंगाची भलीमोठी प्रतिमा उभारली असून त्यात पांडुरंगाच्या भावमुद्रेला नेमकेपणाने टिपताना मस्तकावरील मळवट, कानातील मत्स्य कुंडले, शिरावरील मुकुट बघून कस्तूरी मळवट श्रीमुख शोभले सूखाचे ओतले सकळहीअसे संतानी पांडुरंगाच्या रूपाचे केलेले वर्णन आपणास अनुभवास येते. 
पंढरिच्यावारीचा अनुभव करून देणारे  प्रसिध्द चित्रकार व 
माझे गुरु श्री. चक्रधर हिवसे यांच्या चित्रांना मानाचा मुजरा.


Tuesday, August 30, 2016

माणसान ‘चांगलं दिसाव की चांगल असावं’

 या ग्रुपमध्ये मध्यभागी चसमा परिधान केलेली मुलगी प्रतिभा सेठ

तब्बल १७ वर्ष जुनी आठवण. उन्हाळयात शाळेला सुटी लागल्यानंतर मे महिन्यात मी, संर्वांगीन विकास शिबीरात जायचो. तिथे मला शिकविणा-या शिक्षकांनी, प्रश्न विचारला होता. रितेश मला सांग, माणसाने चांगलं दिसावं की चांगलं असावं. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी १ महिन्याचा कालावधी घेतला होता. दरम्यान, माझ्या निरीक्षणाच्या आधारावर मी या प्रश्नाच उत्तर दिल होत माणसाने चांगलं असावं’. या गोष्टीला तब्बल दीड तप(पंधरा वर्षांहून अधिक काळ) लोटून गेल आहे आणि आज परत त्या प्रश्नाचं ठोस उत्तर माझ्या जवळ आहे जे मी अनुभवातून सांगू शकतो की, माणासाने चांगलं असणंच श्रेष्ठ आहे.
मेट्रो रेल्वे स्थानकावर उभी असलेली सुंदर निटनेटकी मुलगी ही मांजाने कबुत्तराचा जीव जाणार हे पाहून विव्हळते व त्याला वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न करते. मराठीतील एफआयआर हिंदीत अनुवादीत करण्यासाठी आलेल्या गरीब इसमाचे काम विनामुल्य करून दिल्याबद्दल त्याने गहीवरून जाऊन उपकारादाखल माझे धरलेले पाय आणि काल चक्क आपल्या मित्र मैत्रिनींसमोर मला हस्तांदोलन करत एका सुंदर तरूणीने म्हटलेलं वाक्य, ‘आप बडे अच्छे हो. मला तब्बल दीड तपाने त्या प्रश्नाच उत्तर देऊन गेलं.
            १५ ऑगस्टचा दिवस. दिल्लीत या दिवशी पंतग उडवून आनंद व्यक्त करण्याची पध्दत आहे. मात्र, आता याला विभस्त रूप आलं आहे. घराच्या छतावर कर्णकर्षक आवाजात डिजे लाऊन बीअरच्या बाटल्या रिचवत पतंगबाजी करण्याचा नवीन ट्रेंड येथील तरूणाईत बघायला मिळतो. याच्या अगदी विपरीत चित्रही आहे , भाऊक आणि भूतदया माणणारी पिढीही इथे बघायला मिळते. एकमेकांच्या पतंगा कापन्यासाठी त-हे- त-हेचे मांजे वापरले जातात आणि यामुळे आकाशात उडणारे पक्षी मांजाने चखमी होतात कधी-कधी तर त्यांचा नाहक बळी जातो. आता अनुभव सांगतो. १५ ऑगस्ट रोजी माझी डयुटी असल्याने मी लगभगीत मेट्रोने जायला निघालो. मेट्रो स्टेशनवर एक सुंदर मुलगी माझ्या शेजारी उभी होती. आम्ही मेट्रोची वाट बघत होतो. एकदमच ही मुलगी मागे वळली आणि पाय-या उतरत असल्याचे बघून मी अवाक झालो नेमक काय झाल म्हणून मी कुतुहलाने बघायला गेलो तर, मांजात वाईट पध्दतीने टिनाच्या शेडला अडकलेल्या कबुत्तराला सोडविण्याचा प्रयत्न ती मुलगी करीत होती. मी तिथे गेलो आणि तिला म्हटल, मांजा ओढून कबुत्तराला सोडविण्यात त्याला इजा होईल तर मी मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाला बोलवितो आणि त्याच्या मदतीने आपण कबुत्तराला वाचवू. तेवढयात तिथे आलेल्या ३५ शीतल्या तरूणाने आपला जीव धोक्यात घालवून त्या कबुत्तराला वाचविण्याचा प्रयत्न केला. बघता –बघता तिथून जाणा-या मेट्रो प्रवाशांची गर्दी जमली. कबुत्तराचा प्राण वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु झाले. मी तिथून निसटलो आणि मेट्रो कंट्रोल रूममधे जाऊन सुरक्षा रक्षकाला घेऊन आलो. तर काय कबुत्तराची सुटका झाली होती आणि गर्दी पांगली होती. हा अनुभव म्हणजे त्या मुलीचं चांगल असण अधोरेखित करून गेला. ती दिसायला सुंदर होतीच पण मनान आणखीही सुंदर होती  म्हणूनच मुक्या प्राण्याचा जीव वाचविण्यासाठी तीने पुढाकार घेतला आणि बघता बघता तिच्या कार्याला जनतेचाही पाठींबा मिळाला.
            अनुभव क्र. २. कामात असताना माझ्या कॅबीन मध्ये एक गृहस्थ अगदी साध्या वेशात पण चिंताग्रस्त चेहरा अशा अवस्थेत शिरले. आणि त्यांनी मला काही एफआयआरची कागद दाखवत विचारणा केली ,साहब इसका हिंदी में ट्रान्सलेशन करना है कितना खर्चा आएगा और क्या आप कर सकतो हो?. मी उत्तरलो हिंदी में काम है तो एक पेज का १५० रूपये(त्यांनी ६ पेज आणले होते). मग ते म्हणाले कुछ कम करों न साहब पैसे. मी म्हटल ८ साल से एकही रेट ले रहा हॅुं मै काम का. और मराठी से हिंदी , अंग्रेजी में ट्रान्सलेशन करके जरूरत मंदो को मदद करना ही हेतु है मेरा. यदी आपको कही और से कराना है तो मै आपको उनके भी मोबाईल नंबर देता हुं. हे ऐकूण त्यांनी निरागसपणे सांगित आपही करदो साहब मै किसे किसे और कहा कहा ढुंडता फिरू. आणि ते गृहस्थ निघून गेले. त्यांचा अगदी साधा मोबाईल ते माझ्या कॅबीन मधे विसरून गेले. मी तो मोबाईल सांभाळून ठेवला थोडया वेळाने ते मोबाईलच्या शोधात आले  सापडलेला मोबाई मी  त्यांना परत केला. दुस-या दिवशी ते ट्रांन्सलेशनच काम घ्यायला आले. पण मी बातमी कव्हरेज करण्यासाठी बाहेर गेलो होतो( राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान). त्यामुळे त्या गृहस्थांना २ तास ताटकळत बसाव लागल पण त्यांना त्याचा काहीही त्रागा झाला नाही नइफॅक्ट त्यांनी तो बोलवून दाखवलाही नाही. मग मी त्यांना हिंदी अनुवादीत पान प्रींट काढून दिली. त्यांनी ती बघीतली आणि खिशातील प्लॅस्टीकच्या पिशवीतून पिशवी करत एक एक शंभरची नोट ते काढत मोजून त्यांनी माझ्या हातात ९०० रूपये टेकवले. मी त्यांच्या निरागस व चिंताग्रस्त चेह-याकडे पाहत म्हटल, रहने दो अंकल मुझे पैसे नही चाहीए. इन पैसो को आप किसी अच्छे चिज के लिए इस्तेमाल करना. अस म्हणताच त्यांनी पैसे खिशात ठेवले आणि माझे पाय पकडले. मी  म्हटल ये क्या कर रहे हो आप. त्यावर ते म्हटले साहब बडी मेहरबानी हुई आपकी.  मुळात मी जेव्हा एफआयआर ट्रान्सलेशन करायला घेतली तेव्हा माझ्या लक्षात आल. की या गृहस्थाचे दोन मुल मुंबईत कामासाठी गेले. तिथे ट्रकवर क्लिनर म्हणून काम करून उत्तर प्रदेशातील आपल्या घरी ती दोघे पैसे पाठवत असत त्यावरच त्यांच घर चालत असे. या दोघा मुलांपैकी मोठया मुलाचा मध्यरात्री ट्रकच्या गॅलरीहून उतरताना पाय घरून पडून मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर विम्याचे पैसे मिळण्यासाठी त्या गृहस्थाला पुढील कारवाईसाठी विमा कंपनीत हा एफआयआर जमा करण्यासाठी हिंदीत अनुवादीत करून हवा होता. ही परिस्थिती एफआयआर करताना कळताच मला गहीवरून आल मग माणूसकीच्या नात जपतच मी त्या अनुवादाचे पैसे घेतले नाहीत. या अनुभवातून मलाच माझा अभिमान वाटला आण माझ्यातील चांगूल पण जिवंत ठेवण्याची उर्जा मिळाली.
            अनुभव क्र.३. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ७० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील इंडिया गेट समोरील राजपथावरील लॉन वर दिनांक १२ ते १८ ऑगस्ट २०१६ दरम्यान भारत पर्व नावाने महा प्रदर्शन भरविण्यात आले होते. भारत देशाची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि महान इतिहास दर्शविण्याचा तसेच विविध राज्यातील हस्तकला, खाद्य पदार्थ आणि त्या त्या राज्यांची उपलब्धीही दर्शविण्यात आली होती. महाराष्ट्राच्यावतीने या प्रदर्शनात ३ दालने उभारण्यात आली होती. आणि कार्यालयाने या कामाच्या प्रसिध्दीची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. दिनांक १६ ऑगस्ट रोजी मी नेहमी प्रमाणे महाराष्ट्र दालना गेलो तिथे भेट देणा-या लोकांना आपल्या दालना विषयी माहिती देत असतानाच मला दोन विदेशी मुल दिसले. अमेरिकेतील शिकागो शहरात राहणारा सॅम आणि स्पेन मधील त्याचा मित्र ॲलेक्स मी त्यांना या दालना विषयी आणि महाराष्ट्रा विषयी माहिती दिली त्यांची इन कॅमेरा मुलाखातही घेतली. यानंतर लगेचच आमच्या दालनात मुला मुलींचा घोळका शिरला. ही सर्व मुल मुली दिल्ली विद्यापीठाच्या  राज्यशास्त्र विभागात पदव्युत्तर  शिक्षण घेत असल्याचे कळले. मी त्या सर्वांना आमच्या डिजीटल दालनाची सैर घडवली त्यांना महाराष्ट्रा विषयी दालनात मांडण्यात आलेली माहिती दिली. त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिली ती त्यांना फारच आवडली. याचा कळस म्हणजे दिसायला सुरेख आणि हुशार असणारी,राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली प्रतिभा सेठ नावाची मुलगी या सर्व मुला मुलींच्या घोळक्यातून माझ्या समोर आली. आणि तीने चक्क सर्वांसमोर मला हस्तांदोलन केल आणि म्हणाली,‘सर आप बडे अच्छे हो. हे ऐकूण माझ्यासह माझ्या कार्यालयाचे आणि दालनात उपस्थित कर्मचारी यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, मला माझ्या कामाची पावती मिळाली. आपण चांगल आणि मनापासून काम केल की त्याची पावती आपल्याला नक्की मिळते. मग मला आठवल की याच खर गुपीत दडलय ते माणूस चांगला दिसण्या पेक्षा चांगला असण्यात दडलयं.
                              ००००००००००