Thursday, December 3, 2015

राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची दिल्लीत छाप


सरकारचे कायदे, नियम व योजनांची चोख अंमलबजावणी करून कल्याणकारी समाजव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासन व्यवस्थेची असते. या व्यवस्थेत राहून उत्तम व इतरांसाठी पथदर्शी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव दिल्लीतील ‘जी फाईल्स’ ही संस्था करते. संस्थेने 2015 च्या वार्षिक पुरस्कारासाठी देशभरातील १० प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड केली, त्यात महाराष्ट्रातील 3 अधिकाऱ्यांचा समावेश असणं ही गौरवाची बाब आहे. पुरस्कार वितरणसमारंभात महाराष्ट्राचा गौरव आणखी वाढविणारा क्षण ठरला तो, या संस्थेने राज्याचे सुपूत्र ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचा. 

नुकतेच ‘जी फाईल्स’संस्थेच्यावतीने येथील नागरी सेवा अधिकारी संस्थेत केंद्रीय खान व स्टील मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जालना येथील आंतरराष्ट्रीय उपग्रह देखरेख कक्षाचे प्रभारी अभियंता अजय सिंघल यांना ‘असाधारण योगदान पुरस्कार’, जलसंपदा आणि रोजगार हमी योजना विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आणि विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांना ‘उत्कृष्ट योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, हरियाणा राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यावेळी उपस्थित होते. प्रशासकीय सेवेत कार्यरत देशातील विविध राज्यात उत्तम कार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना गौरविण्याचे कार्य ‘जी फाईल्स’ ही संस्था करीत आहे. केंद्र सरकारचे माजी कॅबीनेट सचिव प्रभात कुमार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधे केंद्रीय ऊर्जा विभागाचे सचिव अनील राझदान, हरियाणाचे माजी मुख्य सचिव विष्णू भगवान आणि केंद्र सरकारच्या आंतरिक सुरक्षा विभागाचे माजी सचिव एम.बी.कौशल यांचा समावेश होता. 

डॉ.अनिल काकोडकर यांनी भारतीय विज्ञान क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या महत्वाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या केंद्र सरकारच्या अणु उर्जा विभागांतर्गत कार्यरत भूवनेश्वर येथील विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ.काकोडकर कार्य करीत आहेत. डॉ. काकोडकर यांनी भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात आणि विशेषत: आण्वीक संशोधन कार्यात दिलेल्या योगदानासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अजय सिंघल यांनी जालना येथील आंतरराष्ट्रीय उपग्रह देखरेख कक्षाच्या प्रभारी अभियंता पदाची जबाबदारी नेटक्या पद्धतीने सांभाळली. इंडियन रेडिओ रेग्युलेटरी सर्विसेस (आयआरआरएस) च्या १९९८ च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या अजय सिंघल यांना उत्तम स्पेक्ट्रम नियंत्रण आणि परवान्यांसाठी पारदर्शी पद्धतीचा अवलंब करून नियमांचे उल्लंघन न करता राबविलेल्या उपग्रह स्पेक्ट्रम यंत्रणेसाठी गौरविण्यात आले. 

‘शेती पीक कीटक नियंत्रण’ यंत्रणेचा प्रभावीपणे अवलंब करून ‘शेती व ई- प्रशासन’ व्यवस्थेत दिलेल्या अमुल्य योगदानासाठी प्रभाकर देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. २०११ साली राज्याचे कृषि आयुक्त असतांना सोयाबीनवरील किडीवर सर्वेक्षण व उपाययोजना (Cropsap) यासाठी देशपातळीवर ई-गव्हर्नन्स मधील सुवर्ण पदक देवून त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले आहे. एप्रिल, २०१५ साली या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पंतप्रधान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. 

मुंबई शहरातून अंडरवर्ल्डच्या कारवायांना चाप बसविणे आणि या शहरातील स्कँडल उघड करण्याच्या महत्वपूर्ण योगदानासाठी मीरा बोरवणकर यांना जी फाईल्स पुरस्काराने गौरविण्यात आले. १९८४ मधे नाशिकच्या सहायक पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात कामाला सुरुवात केली. राज्याच्या कारागृह विभागाच्या अपर पोलिस महासंचालक आणि आता विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक हा त्यांचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. त्यांनी शिक्षणाचा ध्यासही सोडला नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी २००९ मध्ये ‘पीएच.डी.’ पूर्ण केली. 

विज्ञान, उपग्रह सेवा, प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रात मोलाचं योगदान देऊन महाराष्ट्राच नाव मोठं करणाऱ्या या दिग्गजांना मानवंदना. 

-रितेश मोतीरामजी भुयार 
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

Monday, November 23, 2015

घेई छंद मकरंद ………… सामाजिक जाणीव जपणारा व जगणारा कलंदर कलावंत मकरंद अनासपुरे


           

कलावंत म्हटला की चित्रपट, सिरीयल, विविध शोजच्या चित्रीकरणात अत्यंत व्यस्त असलेला माणूस. पण, या गोष्टीला फाटा देत ज्या समाजाने आपणास मोठ केल त्या समाजाच्या दु:खात सहभागी होऊन दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या मदतीला धाऊन जात समाजबांधवांना सावरण्यास पुढे येणारा सच्चा कलावंत अशी ओळख असणारा मराठीतील सुप्रसिध्द कलावंत मकरंद अनासपुरे. सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांच्या प्रकट मुलाखातीच्या निमित्ताने कार्यक्रमात त्यांना थेट प्रश्न विचारण्याचा आणि कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचा दुर्लभ योग जुडून आला.
  या कार्यक्रमात मकरंदला माझा थेट प्रश्न, मराठी चित्रपट क्षेत्रातून फक्त तूम्ही आणि नाना पाटेकर अन ज्या मुंबईत बालीवूड इंडष्ट्री असून सर्वांना या इंडष्ट्रीन मोठ केल तेथून फक्त अक्षय कुमार या नटानेच सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच दु:ख पुसण्याकरिता पुढाकार घेतला. इतरांनी मात्र हे औदार्य दाखवल नाही. आपण यास काय म्हणाल?
 यावर त्यांच उत्तर उपरोधिक अन अगदी सरळसोट म्हणूनच पटणार होत ते म्हणाले, नाना ,अक्षय आणि मी असे आम्ही तीघ वेडे आहोत. इतर वेडेही आम्हाला जुडतील याची वाट आम्ही बघतो आहे. आणि सामाजिक बांधिलकी हा व्यक्तिसापेक्ष भाग आहे त्यामुळ आपण इतरांना दोषी ठरवू शकत नाही.’ या उत्तरानंर मकरंद ने सर्वांसमक्ष माझयावरच गुगली टाकत मला प्रश्न केला, तूम्ही कोणता व्यवसाय करता? मी उत्तरलो पत्रकार आहे, शासकीय सेवेतत्यावर मकरंद म्हणाला तूम्ही किती योगदान दिल याकामी? मी म्हटल मी तर दिल नाही पण मी वेगळया पध्दतीने सामाजिक जबाबदारी जपतोय . ते  आणखी विस्ताराने सांगायची ती वेळ नव्हती म्हणून थांबलो. अन कार्यक्रम संपताच स्टेजवर मकरंदला गाठल. त्यांना सांगितल सर मी वयाच्या १८ व्या वर्षापासून रक्तदान करून सामाजिक जबाबदारी जपण्याच काम करतोय. रस्त्याच्याकडेला पाल बांधून जीवन जगणा-या परिवारातील लहान मुला मुलींना शिकविण्याच काम ,झोपडपटटीत जाऊन तेथील मुला मुलींना शिकविण्याच काम करत मी सामाजिकभान जपलय. मकरंद म्हणाले, वा छान’.  मी त्यांना म्हणालो सर, ‘ आपल्या समाजात खुप होतकरू तरूण आहेत त्यांनाही आपण मार्गदर्शन करण्याची गरज असल्याच मला सारख जाणवत अन ते कामही मी करीत असतोआता मात्र मकरंद यांना हे मत पटल नाहीते म्हणाले, ‘ प्रत्येकात सामाजिक जाणिवा असतात व त्याच्या त्यानेच त्या स्वत: जागवायच्या असतात अन आपण काही मार्गदर्शकाच्या भूमीकेत राहून काम करायची गरज नाही let do  them .
मकरंद अनासपुरे यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरु झालेला नाटय क्षेत्रातील प्रवास उलगडताना ब-याच हीडन बाबी कळल्या. ते शिकत असलेल्या महाविद्यालयात कला शाखेतील मुलांचा नाटय स्पर्धांवर असलेला एकाधिकार मोडून काढण्यासाठी विज्ञान शाखेतील मुलांचे प्रतिनिधीत्व करून मोडीत काढलेली एकाधिकारशाही, त्यानंतर विद्यापीठांतर्गत व अन्य नाटय स्पर्धांमधे मिळविलेले विविध पुरस्कार, राष्ट्रीय युवा महोत्सवात मिळवेलेले सुवर्ण पदक असे विषय उलगडतानांच मकरंद यांनी नाटक आणि राजकारण हा विषयही सांगितला. अर्थात ते ज्या गृपमधे काम करायचे त्याचा प्रमुख हा गृप मधील कलाकारांना कामाचा मोबदला म्हणून पैसे देत नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. आणि येथूनच त्यांनी त्या गृप ला सोड चिठ्ठी दिली. मग मंगेश देसाई आणि मकरंद अनासपुरे असा दोघांचाच गृप तयार करून त्यांनी सादर केलेले धम्माल द्वीपात्री प्रयोग. या प्रयोत रंगमंच्च सज्जा, प्रकाश संयोजन नसल्याने त्यांच्यावर होत असलेली टिका. यातून त्यांनी प्रकाश व्यवस्था, रंगमंच सज्जा याबाबी सांभाळत स्वत: दिग्दर्शन केलेले मसन जोग्याच्या चित्तर कथेवरील नाटक त्यात ऐन वेळी माचिसची काळी न सापडल्याने चिताच न पेटल्याचा प्रसंग असे एकाहून एक किस्से उलगडले जात होते.
 मकरंद आणि नानांची भेट व येथूनच मकरंद यांची मुंबईत सुरु झालेली जगण्यासाठीची धडपड थक्क करून सोडणारी आहे. नानांनी एका नाटय स्पर्धेत कुणा मोठया दिग्गज कलाकाराच्या सांगण्याहून मकरंद अनासपुरे आणि मंगेश देसाई यांचे नाटय बघण्याचा प्रसंग, आमदार निवासातील मकरंद यांचे दिवस, मधेच ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांचा किस्सा ज्यात त्यांनी मकरंद अनासपुरे यांना आमदार निवासावर पडून राहण्यापेक्षा NCPA (National Council Performing Art) ला येऊन पुस्तक वाचण्याचा दिलेला सल्ला त्यातून आयुष्याला मिळालेली कलाटनी. १९९४ पासून सुरु असलेल्या स्ट्रगल ला २००६ मधे कायद्याच बोला या  चित्रपटातून मिळालेला ब्रेक व त्यानंतर ३ वर्षात ४४ चित्रपट करण्याचा मकरंद यांनी केलेला विक्रम हाही महत्वाचा टप्पा त्यांनी उलगडला. पत्नी शिल्पा, मुलगी इंद्रायणी आणि मुलगा इंद्रनील यांना त्यांचा वेळ देत कौंटुबिक जबाबदारी पार पाडत असलेला मकरंद आणि दुस-या बाजुला मराठवाडा व विदर्भातील आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीला नाना पाटेकरांच्या मदतीने  NAAM  या संस्थेच्या माध्यमातून सुरु केले काम म्हणजे मकरंद यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा आलेख.   
विनोदी आणि गंभीर भुमीका करत मराठवाडयाची आपली अस्सल भाषा जपणारा व तेवढाच कौंटुबिक– सामाजिकभान जपणारा कलंदर कलावंत मकरंद अनासपुरे यांची भेट अवस्मरणीय ठरली.        
                                                       *****


डॉक्टर शर्मा कुटुंबिय आणि त्यांची सामाजिक बांधिलकी






स्वत: गौरव शर्मा एमबीबीएस आणि पेडीयाट्रीक डॉक्टर तर त्यांची पत्नी डॉ. दिपीका शर्मा, एमबीबीएस आणि फॅमिली फिजीसियन, भाऊ डॉ. अनशुल शर्मा डेंटिस्ट आणि वडील डॉ. पुरन प्रकाश शर्मा सुध्दा एमबीबीएस आणि पेडीयाट्रीक डॉक्टर आणि प्रसिध्द सर्जन.कमीत कमी फी आकारून रूग्नांना बर करण्याचं काम अव्याहतपणे करणा-या या डॉक्टर कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी थक्क करून सोडणारी आणि तीतकीच कौतुकास्पद आहे.
क्लीनीक म्हटल की भला मोठा हॉल वा इमारत.इथे प्रवेश करताच तुम्हाला दिसेल रिशेप्शन. मग तासन तास बसाव लागणार (रूग्ण यातच अर्ध मेला होणार) अस सर्व वातावरण असत. पण शर्मा यांच्या क्लीनीक मधे अस काहीच नाही. फक्क १०x१० ची एक रूम. पण सर्वच सुविधांनी सज्ज. एसी, टीव्हीसह उपचारासाठी लागणारी आधुनिक उपकरण इथे बघायला मिळतात. एवढच काय क्लीनीक मधे येणा-या रूग्णांसाठी टाकण्यात आलेल्या सोपेवजा आसणाखाली औषधांचे बौक्स आहेत. अर्थात कमी जागेत उत्तम व्यवस्थापन करून त्यांनी हे क्लिनीक नीट नेटक ठेवलय. या क्लीनीकच वैशिष्टय अस की रूग्णाला सुई टोचली जात नाही. औषध स्वत: डॉक्टरकडचीच. तपासणी आणि औषधांची(चार टका) फी फक्त १०० रूपयें. (जी आत्तापर्यंत फक्त ५० रूपयेच होती.). त्यात जमेची बाब ही की रूग्णांना शंभर टक्के आराम मिळणार. त्यात हे डॉक्टर कुटुंबिय रूग्णांची आस्थेन आणि नम्रपणे चौकशी करतात. रूग्णाला त्याच्या आजाराबददल नीट समजावून सांगतात आवश्यक तेव्हाच बाहेरून तपासणी वा औषधांचा सल्ला देतात. हे सगळ मी कस सांगू शकतो हा प्रश्न पडला असेल तुम्हाला कदाचित तर त्याच उत्तर ही देवून टाकतो. ते अस की डॉक्टर जेव्हा रूग्णाला तपासतात तेव्हा ते सर्वांसमोरच तपासतात त्यामुळे वेटींगवर असलेले रूग्ण आणि प्रत्यक्ष तपासणी सुरु असलेले रूग्ण एकमेंकाना पाहू ऐकू शकतात आणि मी ही रूग्ण म्हणून या क्लिनीक मधे गेल्यानंतरच्या माझया निरीक्षणाहूनच हे सांगतोय.
आजचाच ताजा किस्सा सांगतो. मला ताप असल्यान मी क्लीनीक मधे गेलो तर इथे असलेल्या बाकांवर सर्व रूग्ण बसून होते त्यात बालरुग्णच जास्त होते. मी ही अशात क्लीनीक मधे शिरलो अन मोकळी जागा दिसताच तिथे बसलो. यावेळी पश्चिम बंगालहून दिल्ली भ्रमंतीसाठी आलेल्या एका दांपत्याच्या लहान मुलाला डॉक्टर तपासत होते त्यानंतरचा रूग्ण अर्थातच इथे उपस्थित दुस-या दांपत्याच छोट बाळ होत. बाळाला भूक लागल्यान ते आईला ओढतान करत होत आईनेही क्लीनीकमधली कमी जागा लक्षात घेता पाठ मोरी होऊन मुलाला पाजण्यास सुरुवात केली.तोच डॉक्टरच साहेबांच लक्ष गेल त्यांनी लगेच बाळाच्या वडीलाला क्लीनीक मधील पडदा पाडण्यास सांगितल तस करताच आईने आपल्या मुलाला वीना तक्रार जेवू घातल.तितक्यात वेटींग लिस्टमधे असलेल्या म्हाता-या आंटी डॉक्टरांपुडे जावून बसल्या अन सांगत्या झाल्या, मुझे ना कल से कुछ खातेही उल्टीया होने लगी है बहुत तप्लीक है. त्यावर डॉक्टरांनी थोडा विचार करत आपल्या पुढयात असलेल्या गोळयांतील ४ गोळयांची स्ट्रीप्स देत त्या कशा घ्याव्या हे समजावून सांगितल. त्यावर हिरमुसला चेहरा करत आंटी म्हणाल्या बस इतनीशी दवाई. मग डॉ. गौरव शार्मा म्हटले कोई घबराने वाली बात नही आपको जो शिकायत है उसीके वजह से आपको यह तकलीफ हुई है ये दवाई या खाने से ठिक होजाएगा चिंता करने की कोई बात नही. मग आंटीने लगेच पैसे काढण्यासाठी आपल्या जवळची पैस्यांचा मळकट बटवा काढला त्यावर डॉक्टर म्हणाले इसकी कोई जरूरत नही आंटीजी. अस म्हणताच त्या आंटीने कोणताही विचार न करता डॉक्टरांच्या डोक्यावर हात ठेवत जितेरहो बेटे असा आशिर्वाद दिला आणि डॉक्टरांनी आपली दोन्ही हात जोडत या आशिर्वादास नम्र प्रतिसाद दिला.हे चित्र माझया प्रमाणेच क्लिनीक मधे बसलेले अन्य रूग्ण बघत होते. संक्षिप्तपणे सांगायचे झाल्यास मोठाल्या तामझामच्या आजच्या दुनियेत देखाव्याला महत्व आलय आणि डॉक्टर व रूग्ण यांच्यात अवास्तव अंतर वाढत चालल आहे. त्यात सामाजिक बांधिलकी तर कोसो दूर आहे. पण शर्मा  डॉक्टर कुटुंबिय याला मोठा अपवाद आहेत आणि ते सामाजिक बांधिलकी जपत रूग्ण सेवा करीत आहेत.         
आम्ही ज्या पहाडगंज भागात राहतो तिथेच या शर्मा डाक्टर कुटुंबियांनी आपली कर्मभूमी निश्चित केली आहे. या भागात सर्वच आर्थिक स्तरातील लोक आहेत गरीब, मध्यमवर्गीय तर श्रीमंत असे सर्वच. मग पहाडगंज भागातच दोन ठिकाणी हे कुटुंबिय रूग्ण तपासणी करतात. मोतीया खान भाग जिथे श्रीमंत लोक आहेत आणि दुसरा म्हणजे मुलतानीढांडा हा भाग जिथे मध्यमवर्गीय व गरीब आणि बहुतांश वेळा दिल्ली फिरायला आलेल्या पर्यटक रूग्णांचा राबता असतो(कारण इथे मोठया प्रमाणात हौटेल्स आहेत). डॉ. गौरव आणि दिपीका या दांपत्यांनी सर गंगाराम व तत्सम नावाजलेल्या इस्पितळात काम केल आहे त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याच्या भरवशावर त्यांना पैसा कमविणे सहज साध्य होते पण त्यांनी धन सेवे पेक्षा जन सेवेला जास्त महत्व देण्याचा निर्णय घेतला. ते सकाळी ९ ते ११ मुलतानी ढांडा भागात आपली सेवा देतात तर यानंतर ११ ते १ या वेळेत वडील डॉ. पुरनप्रकाश शर्मा हे रूग्ण सेवा करतात. याच क्लिनीक मधे सायंकाळी ५ ते ७ वेळेत पुन्हा हे दांपत्य आपली सेवा देतात तर वडील डॉ. पुरनप्रकाश शर्मा हे ७ ते ९ अशी सेवा देतात. हे दांपत्य सकाळी ११ते १ आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मोतीयाखान येथील क्लिनीक मधे रूग्णसेवा करतात. जिथे डॉ. अनशुल शर्मा सुध्दा सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ अशी रूग्ण्‍ा सेवा करतात.
            आजार झाला अन व्यक्ती डॉक्टरकडे गेलाच नाही अस चित्र आज-काल फारच विरळा बघायला मिळत. पण, रूग्ण मिळतात म्हणून त्यांना विविध चाचण्या आणि भल्या मोठया औषधांची यादी लिहून देणा-या डॉक्टर्सचा मोठा सूळसुळाट आहे.मोठया शहरात तर एक मोठ इस्पितळ त्यात विविध विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स त्यात इस्पितळाची नॉर्मल फी मग विशेष फीज तिथेच विविध चाचण्यांची सोय असा बाजार सदृष्य प्रकार बघायला मिळतो.दुसरीकडे सरकारी नोकरदारांसाठी पॅनलवरील ठरलेले डॉक्टर्स अन त्यांच्याकडून नुसते मेडीकल बील वर सहयाकरून आपले बील काढण्याचे प्रकार तर सरकारी केंद्रीय कर्मचा-यांसाठी असलेल्या सीजीएचएस कार्डचा होत असलेला दूरूपयोग दिसून येतो.यात देवानंतर महत्वाचा दर्जा ज्या डॉक्टरला दिला जातो त्याची सामाजिक जबाबदारी कुठे आहे ? असा प्रश्न पडणे सहाजीक आहे.
           प्रत्येक जन या समाजाचा घटक म्हणून आपआपली भूमिका अदा करत असतो मग तो राजकारनी, नोकरदार, डॉक्टर, इजिनीअर, शिक्षक, पत्रकार, रिक्शा  वा बस चालक, मोलकरीन  किंवा शेतमजूर असो. या प्रत्येकानी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून आपली जबाबदारी पार पाडली तर हा समाज ख-या अर्थाने समृध्द होईल. डॉ. शर्मा कुटुंबिय यासाठी मार्गदर्शक ठरतील हीच आशा. अशाच सकारात्मक स्टोरीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार.
                                                       ****


Wednesday, October 21, 2015

Cashless Country



एक नवीन विषय मांडतो इथे
Cashless
देश (जिथे सर्व आर्थिक व्यवहार पैश्यांशिवाय नुसत्या कार्ड्स द्वारे होतात जसे क्रेडिट, डेबिट कार्ड आणि मोबाईल बैंकिंग)
तुम्हाला माहीत आहे का !,  जगातील Cashless देश कोणता ?
स्वीडन हा जगातला पहिल्या क्रमांकाचा Cashless देश आहे. इथे 97%लोक कार्ड व मोबाईल बैंकिंग द्वारे आर्थिक व्यवहार करतात. 
*
बेल्जियम हा 2 -या क्रमांकावर 
*
फ़्रांस 3 -या
*
कॅनडा 4 थ्या तर इंग्लंड 5 व्या क्रमांकावर आहे.
आता जरा भारतावर एक नजर टाकू !. भारतात अजूनही 86 % आर्थिक व्यवहार हे पैस्यांद्वारे वा चलनाद्वारे होतात.
               आता पाहू या Cashless होण्याचे फायदे.

1)
पैसे छपाईच्या प्रिंटिंग चा मोठा खर्च वाचतो.
2)
बँक लुटीच्या घटनांना आळा बसतो.
3)
काळया पैशाला आळा बसतो.
4)
सुरक्षित आर्थिक देवान-घेवाणीचे वातावर निर्माण होते पर्यायाने देशातील जनता आर्थिक व्यवहारांच्याबाबतील Tension Free राहते.
सद्य: परिस्थिती बघता आपल्या देशात हे वातावरण निर्माण व्हायला कित्येक वर्ष लागतील. यातून आपण अजून जगाच्या किती मागे आहोत हे लक्षात येईल.
आपल्या देशात किती लोकांचे Bank Account आहेत, इथून सुरुवात आहे. 
राजकारण बाजुला ठेवलं तरी आपणास 'जनधन' योजनेचं महत्व पटाव, ज्याद्वारे देशात जास्तीत-जास्त लोकांचे Bank Account उघडण्याचा स्तुत्य विचार मुळाशी आहे.
   भारत देश cashless होण्यासाठी आपली Communication System अधिक बळकट व्हावी लागेल ज्याद्वारे Hacking आणि Information decoding च्या प्रकारांना आळा बसेल.
*
मजेशीर गोष्ट तर पुढे आहे.
भारतात मॉलमधे अजूनही केवळ 10% व्यवहार डेबिट व क्रेडिट कार्ड ने होतो . याही पुढे असं की Online Purchasing करतांना भारतातील लोक  'Cash on Delivery' हा पर्याय निवडतात, गंमत तर पुढे आहे ! क्रेडिट,डेबिट कार्ड, मोबाईल बैंकिंग,माँल आणि Online Purchasing हे शब्द आपल्या किती देशबांधवांना माहीत आहे!. ( उपहासाने नव्हे चिंतेने म्हणावेसे वाटते)
आता मूळ मुद्दा, "आपल्याला ही स्थिती बदलविण्यासाठी काय योगदान देता येईल" प्रत्येकाने आपला वाटा उचलावा ही भावना आपल्यात जागावी याच अपेक्षेसह।
                   शुभ रात्री.
                         

Thursday, October 15, 2015

माझ्या नजरेतून लाल किल्ला








चला माझ दिल्ली पुराण सुरु करतो।
मी दिल्लीतील प्रमुख ऐतिहासीक वास्तुबद्दल तुम्हाला माझ्या नजरेतून समजावून सांगणार आहे. दील्लीत मी ज्या पहिल्या ऐतिहासीक वास्तुला भेट दिली ती 'लाल किल्ला'. 
शहराच्या मध्यवस्तीत चादंनी चौक भागात ही वास्तू आहे जिला, UNESCO ने जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत स्थान दिल आहे. दिल्लीतील 3 वास्तुंना हा बहुमान लाभला आहे त्याबद्द्ल मी नंतर सांगेनच.
लालकिल्याहून 15 August या स्वातंत्रदिनी पंतप्रधानाने देशाला उद्देशुन संबोधन करण्याची प्रथा पंडित नेहरुं पासून ते आता नरेंद्र मोदींपर्यंत चालत आलेली आहे.
एक लाल किल्ला आग्रा येथे ही आहे जो, मोगल बादशहा शहाजहाँच्या वडीलाने अर्थात जहाँगीराने बांधला होता( ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यात आले होते.) शहाजहाँ बादशहाने आपली राजधानी आग्राहून दिल्लीला आणली आणि इथे सन 1637 मधे लाल किल्ला बांधण्यास सुरुवात झाली. त्या अगोदर 1631 ला 'ताजमहल' बांधण्यास सुरुवात झाली होती. शहाजहाँ नेच दिल्लीतील लाल किल्या समोरील ऐतिहासीक जामा मस्जिद(भारतातील सर्वात मोठी मस्जिद) बांधली जिचे निर्माण कार्य 1646 ला सुरु झाले.
शहाजहाँ हा शुरवीर तसेच कलेचा भोक्ता आणि कलेची कदरकरणारा मुस्लिम शासक होता. वयाच्या 16 व्या वर्षीच शहाँजहाँ ने लाल किल्ला(आग्रा) येथे किल्याच्या आत स्वतः काही वास्तू तयार केल्या होत्या. तेंव्हाच जहाँगिराने आपल्या मुलातील कलाकार ओळखला व त्यास प्रोत्साहन दिले म्हणूनच आज (वर उल्लेख केलेल्या वास्तू)जागतिक दर्जाच्या वारसा वास्तू ठरल्या आहेत(जामा मस्जिद सोडून). 
शहाजहाँ ने सैन्य बळावर राज्य विस्तार तर केलाच पण भारताला या ऐतिहासीक वास्तुंची अनोखी भेट दिली. 
           लाल किल्ला(दिल्ली)
* किल्ला जवळपास 3 ते 4 एकरात पसरला आहे .
* धौलपुरी लाल दगडांनी याचं बांधकाम करण्यात आलं आहे जे अजूनही ताज तवान दिसतं.
* किल्यात प्रवेश करताच चौक लागतो (जिथून प्रधानमंत्री लाल किल्याच्या कमानीवर भाषण देण्यास चढ़तात तो भाग.).
* पुढे मीना बाजार आहे. त्याकालात राण्यांसह किल्यातील अन्य महिला वर्गासाठी काही वस्तू खरेदी करण्याची व्यवस्था होती.
*किल्यातील पहीला दरवाजा. दरवाज्याच्या वर जीना आहे त्यात एक संग्रहालय तयार करण्यात आल असून युध्दात वापरण्यात येणा-या शस्त्रांचं प्रदर्शन इथे बघायला मिळते.
* याच दरवाज्यापासून डाव्या हातावर दीड कि.मी. अंतरावर इंग्रजांच्याकाळात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पकड़ण्यात आलेल्या देश भक्तांना बंदी बनवण्यात येत असे त्या बरॅक आहेत(हे बहुतेक पर्यटकांना माहीत नाही - पण मी बघितलय). 
* किल्यात 'दिवाने आम' आणि 'दिवाने ख़ास' असे दोन वेगवेगळे सभामंडप आहेत. 'दिवाने आम' आर्थात जिथे राजा हा सामान्य जनतेच्या समस्या ऐकत असे, तर 'दिवाने ख़ास' म्हणजे जिथे राजा विशिष्ट लोकांशी बैठक करत असे.
* किल्यात नमाज पढ़ण्यासाठी शहाजहाँ ने मस्जिदही उभारली आहे जी ' मोती मस्जिद' म्हणून प्रसिद्ध आहे. 
* लाल किल्याच्या मागील बाजूस 'राज घाट', 'शक्ति स्थल'आदी स्मारक आणि त्या पलिकडे यमुना नदी आहे.
ईति वृतांत ( लाल किल्ला -माझ्या नजरेतून)
           रितेश मोतीरामजी भुयार, 
                  नवी दिल्ली

Tuesday, September 29, 2015

महाराष्ट्राची पताका उंचाविणारे अजित जोशी



महाराष्ट्र ही नररत्नांची खान आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातातील महाराष्ट्राच्या नररत्नांनी भारतदेशासाठी दिलेल्या योगदानाची दीर्घ परंपरा आहे. वर्तमानकाळातही ही परंपरा सुरु असल्याची प्रचिती मूळचे सोलापूरचे आणि सध्या हरियाणातील जिंद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित जोशी यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘बर्डस ऑफ भिंडवास’ या पुस्तक, ई-बुक, वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशन प्रकाशनाच्या वेळी आली. 

विशेष म्हणजे हे प्रकाशनही दिल्लीत मराठी मोहर उमटविणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि केंद्रीय पर्यावरण व वने राज्यमंत्री प्रकाश जावडेकर तसेच हरियाणाचे राज्यपाल कप्तानसिंह सोलंकी यांच्या उपस्थितीत झाले. 

भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००३ च्या परिक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आणि देशातून २९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन हरियाणा केडरसाठी अजित जोशी यांची निवड झाली. त्यांची पहिली पोस्टींग पानीपत या महाराष्ट्राशी ऐतिहासिक संबंध असणाऱ्या जिल्ह्यात झाली. वर्ष २००६ मधे झझ्झर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी झझ्झर पासून २० किलोमिटर अंतरावरील भिंडवास पक्षी अभियारण्याच्या विकासाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुढाकार घेऊन या अभयारण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन परिषदांचे आयोजन केले. त्याचवेळी देश-विदेशातील पक्षीनिरीक्षकांचे लक्ष या पक्षी अभयारण्याकडे वेधल्या गेले. त्यानंतर पुन्हा सोनीपत, पानीपत आणि सध्या जिंद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशी त्यांची पोस्टींग झाली. पण, भिंडवास पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी त्यांचा ध्यास कायम होता. यातूनच जन्माला आली भिंडवास मधील पक्ष्यांची माहिती देणाऱ्या पुस्तकाची. यात महाराष्ट्रातील पुण्याच्या इला फाउंडेशनची त्यांना मोलाची मदत लाभली. बर्डस ऑफ भिंडास या पुस्तकाचे सहलेखकही महाराष्ट्राचे अर्थात सतीश पांडे, निरंजन संत आणि प्रमोद देशपांडे. आपल्या प्रशासकीय जबाबदारीचे यशस्वी वहन करत त्यांनी पुस्तकासोबतच आधुनिक माध्यमाची जोड देत ई-बुक, वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशनही तयार केले. 

‘बर्डस ऑफ भिंडवास’ या पुस्तकातून भिंडवास हे झझ्झर जिल्ह्यात लोकसहभागातून तयार करण्यात आलेले पक्षी अभयारण्य असल्याचे सांगितले आहे. परिसरातील ७ ते ८ गावातील गावकऱ्यांनी आपल्या मालकीची जमीन या अभयारण्यासाठी दिली त्यातून ११०० एकर परिसरात हे पक्षी अभयारण्य उभे राहिले आहे. हिवाळ्यात या अभयारण्यात जवळपास अडीचशे प्रजातींचे दीड लाखाहून अधिक पक्षी येतात. विशेषत: ५० प्रजातींच्या परदेशी पक्ष्यांचाही यात समावेश असतो. भिंडवास पक्षी अभयारण्य व येथील वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची माहिती जास्तीत-जास्त पक्षीनिरीक्षक व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठीच पुस्तक तयार करण्यात आले आहे. 

पानिपतला पहिली पोस्टींग झाल्यानंतर काही आठवड्यातच सोनिपत जिल्ह्यातील गुहाना येथे हत्याकांड झाले. त्यावेळी अजित जोशी यांनी पुढाकार घेऊन स्थिती आटोक्यात आणली आणि तेव्हाच हरियाणा प्रशासनाला गुणी महाराष्ट्रीय अधिकारी भेटल्याची वर्दी मिळाली. गुहाना हत्याकांडाने निर्माण झालेला तनाव सैल करण्याच्या त्यांच्या योगदानाबाबत तत्कालीन दलीत प्रश्नांबाबतच्या संसदीय समितीचे अध्यक्ष रा.सू. गवई यांनी श्री.जोशी यांचे कौतुक केले. वीट भट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुला-मुलींसाठी त्यांनी सुरु केलेल्या भटटा शाळांच्या उपक्रमाची नोंद तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी घेत श्री. जोशी यांचे कौतुक केले. बिहारमधे २०१० साली कोशी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेलेल्या मुसेहारी गावाला दत्तक घेण्याचा निर्णय श्री. जोशींनी घेतला. हरियाणाच्या जनतेने श्री. जोशींच्या हाकेला प्रतिसाद देत मदतीचा ओघ मुसेहारीच्या दिशेने वळवला आणि बघता-बघता मराठी अधिकाऱ्याने हरियाणाच्या जनतेच्या मदतीने बिहारमधे गाव वसविल्याची महान कामगिरी घडली व बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार आणि हरियाणाचे मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुड्डा यांनी श्री.जोशीसह तमाम महाराष्ट्र वासियांच्या दातृत्वाचे कौतुक केले. आपल्या कामाने महाराष्ट्राच्या नररत्नांची यशस्वी परंपरा जपणाऱ्या व मराठी पताका फडकवत ठेवणाऱ्या या मराठमोळ्या अधिकाऱ्याचे राष्ट्रीय स्तरावर होत असलेले कौतुक महाराष्ट्राचेही कौतुकच ठरले आहे.

-रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

Saturday, September 19, 2015

दिल्ली स्थित गणेशोत्सव



दिल्ली स्थित गणेशोत्सव

गणेश चतुर्थी महाराष्ट्र का एक प्रमुख त्यहार है. यह त्यहार गणेशोत्सव के नाम से भी जाना जाता है. महाराष्ट्र राज्य में बडी़ धूमधाम से मनाया जाने वाला यह त्यौहार महाराष्ट्र के बाहर कर्नाटक, तमिलनाडू, आंध्रप्रदेश, दिल्ली इत्यादि राज्यों में भी हर्षोल्लास से मनाया जाता है. छत्रपती शिवाजी महाराज के काल से धार्मिक उत्साह से यह त्यौहार मनाया जाता है. अंग्रेजों के बेंडियों में बुरी तरह फंसे देशवासियों को इकठठा कर उनमें देशप्रेम का अलक जगाने, प्रबोधन करने के माध्यम से इस त्यौहार को सामाजिक एकता का प्रतिक बनाने का श्रेय महान देशभक्त लोकमान्य बाल गंगाधर तिलक को जाता है. तिलक ने महाराष्ट्र में गणेशोत्सव को सार्वजनिक तौर पर मनाने की शुरुआत की.  इस त्यौहार को राष्ट्रीय त्यौहार बनाने का श्रेय भी तिलक को ही जाता है. आज इस त्यौहार की लोकप्रियता चरमोत्कर्ष पर पहुंच गई है. इस में राजधानी दिल्ली भी पीछे नहीं है. यहां स्थित विविध महाराष्ट्र मंडल तथा अन्य दिल्लीवासी इस त्यौहार को बड़े ही धूमधाम और हर्षोल्लास से मनाते है. आइये डालते है दिल्ली में मनाये जाने वाले गणेशोत्सव पर एक नजर .
       
दिल्ली में सार्वजनिक गणेशोत्सव मनाने की परंपरा लगभग ७५ से ८० वर्षों से चली आ रही है. पुरानी दिल्ली से शुरु हुई यह परंपरा पूरी दिल्ली तथा इसके परिसर में बसे गुडगांव, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाजियाबाद, फरीदाबाद तक पहुंच गई है. पुरानी दिल्ली के स्नेह संवर्धक समाज मंडल की ओर से दिल्ली में सर्वप्रथम गणेशोत्सव मनाने की शुरुआत हुई. आज नई दिल्लीस्थित सार्वजनिक उत्सव समिती, पीतमपुरा, सार्वजनिक उत्सव समिती, महाराष्ट्र सदन, गणेश सेवा मंडल, लक्ष्मी नगर, दत्त विनयाक मंदिर तथा महाराष्ट्र मित्र मंडल जनक पुरी, महाराष्ट्र मंडल-विठ्ठल मंदिर, आर.के.पुरम, मराठी मित्र मंडल अलकनंदा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडल पहाड़गंज, महाराष्ट्र मंडल- गीता मंदिर-फरीदाबाद, गणराज महाराष्ट्र मित्र मंडल- ग्रेटर नोएडा, महाराष्ट्रीयन समाज समिती-नोएडा इत्यादि राष्ट्रीय राजधानि क्षेत्र (एन.सी.आर) के शहरों में स्थित गणेश मंडल में गणेशोत्सव को श्रध्दापूर्वक मनाया जाता है. दस दिनों तक चलने वाले इस गणेशोत्सव में रोजाना गणपती की आरती तथा गायन, नृत्य, नाटक इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन होता है, जिस में सभी धर्मों के लोग सम्मिलित होकर इस त्यौहार का आनंद लेते है.
दिल्लीवासी गणेश भक्तोंको गणेशोत्सव में लगनेवाली गणेशजी की मूर्ति उपलब्ध कराने का कार्य दिल्ली के कनॉट प्लेस में बाबा खड़क सिंह मार्ग पर स्थित महाराष्ट्र लघु औद्योगिक विकास महानिगम द्वारा संचालित मर्‍हाटी महाराष्ट्र एम्पोरियम विगत ४४ वर्षों से कर रहा है. इस वर्ष भी महाराष्ट्र एम्पोरियम में गणेशमूर्ति का विक्री प्रदर्शन लगा था. तथा  यहां बड़ी संख्या में आये गणेशभक्तों में पूरे हर्षोल्लास के साथ अपने लाडले गणेशजी की प्रतिमा खरीदने व वस्त्र अलंकार और पूजा सामग्री इत्यादि खरीदने की होड़ लगी हुई है. ज्यादातर गणेश भक्त गणेशजी की मूर्ती खरीदने का ऑर्डर गणेशमूर्ति स्थापना के दो – तिन महीने पहले ही देना शुरु कर देते है. 
सुंदर और मनमोहक गणेश मूर्तियों के विक्री प्रदर्शन हेतू विगत २३ वर्षों से महाराष्ट्र के थाने जिले के गणेश शिल्प कला केंद्र के मालिक मंदार शिंदे ने इस प्रदर्शन के बारे में जानकारी देते हुए बताया कि इस वर्ष २ इंच से लेकर ६ फीट की ऊंचाई वाली गणपति की मूर्ती प्रदर्शन में लगाई गई थी. प्रदर्शन में रखी गई इन मूर्तियों की कींमत ३5० रुपये से लेकर ३० हजार रुपये तक रखी थी. इस वर्ष लगभग १,००० मूर्तियां प्रदर्शन में विक्री के लिए रखी थी. जिसमे से ६० फिसदी मूर्तियां मिट्टी की तथा ४० फीसदी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) की बनी थी. जयपूर, लखनऊ, पानीपत, सोनीपत इत्यादि शहरों से गणेश भक्त मूर्ती खरीदने के लिए यहा आते हैं. भारत के सभी धर्म, पंथ, समुदाय एंवम् भाषिक प्रदेशों के लोग मूर्ती खरीदने में रुची रखते है. भारत के विभिन्न प्रांतो के साथ ही अन्य देशोंमे मूर्तीयाँ भेजी जाती है. कई विदेशी भी एम्पोरियम में  आकर गणेशजी और उत्सव के बारे में जानकारी लेते है.
दिल्लीस्थित महाराष्ट्रीयन लोगों के साथही अन्य धर्मों के लोग भी आज गणेशोत्सव बड़े ही जोश और उत्साह से मनाते हैं. तथा महाराष्ट्र मंडलों में मनाये जाने वाले विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों में सहभाग लेते हैं. गणेशोत्सव के माध्यम से एक सांस्कृतिक व सामाजिक एकता का संदेश मिलता है.
दिल्ली तथा राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) में रहने वाले मराठी लोंग गणेशोत्सव मनाते है. प्रमुख रुप से निवासी आयुक्त कार्यालय जो कि दिल्ली के कोपरनिक्स मार्ग पर स्थित है ओर महाराष्ट्र सदन के नाम से परिचित है, यहां विगत २३ वर्षों से सार्वजनिक गणेशोत्सव समिती की और से गणेशोत्सव मनाया जाता है. इस मंडल की ओर से विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है.  
महाराष्ट्र सदन में दस दिन तक चलने वाले उत्सव में भारत के पूर्व राष्ट्रपति डॉ. शंकर दयाल शर्मा, प्रतिभा देवीसिंग पाटील, भूतपूर्व उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी के साथही विविध केंद्रिय मंत्री, महाराष्ट्र के मुख्यमंत्री, राज्यपाल, व मंत्रिमंडल के मंत्री, विधायक तथा सांसद गणेशोत्सव में सम्मिलित हुए है.
गणेश चतुर्थी के दिन ढोल नगाड़े, ताशे, लेझिम व अन्य गाजे-बाजें के साथ गणेशजी की स्थापना की जाती है. दस दिन तक हर्षोल्लास के वातावरण में चलनेवाले इस गणेशोत्सव का समापन समारोह अनंत चतुरदशी को होता है. दिल्ली के विविध मराठी मंडल यहा के चांदणीचौकस्थित टाऊन हॉल के पास एकत्रित होते है. महाराष्ट्र के लोकनृत्य, झांज पथक,ढोल नगाड़े, ताशे, लेझिम व अन्य गाजे-बाजों के साथ बडी संख्या में गणेशभक्त, इस आशा के साथ की गणेशजी अगले बरस जल्दी आएंगे, अपने प्यारे भगवान को दु:खी मनसे यमुना नदी में विसर्जन कर विदाई देते है.
                      .......*……..