Monday, November 23, 2015

घेई छंद मकरंद ………… सामाजिक जाणीव जपणारा व जगणारा कलंदर कलावंत मकरंद अनासपुरे


           

कलावंत म्हटला की चित्रपट, सिरीयल, विविध शोजच्या चित्रीकरणात अत्यंत व्यस्त असलेला माणूस. पण, या गोष्टीला फाटा देत ज्या समाजाने आपणास मोठ केल त्या समाजाच्या दु:खात सहभागी होऊन दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या मदतीला धाऊन जात समाजबांधवांना सावरण्यास पुढे येणारा सच्चा कलावंत अशी ओळख असणारा मराठीतील सुप्रसिध्द कलावंत मकरंद अनासपुरे. सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांच्या प्रकट मुलाखातीच्या निमित्ताने कार्यक्रमात त्यांना थेट प्रश्न विचारण्याचा आणि कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचा दुर्लभ योग जुडून आला.
  या कार्यक्रमात मकरंदला माझा थेट प्रश्न, मराठी चित्रपट क्षेत्रातून फक्त तूम्ही आणि नाना पाटेकर अन ज्या मुंबईत बालीवूड इंडष्ट्री असून सर्वांना या इंडष्ट्रीन मोठ केल तेथून फक्त अक्षय कुमार या नटानेच सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच दु:ख पुसण्याकरिता पुढाकार घेतला. इतरांनी मात्र हे औदार्य दाखवल नाही. आपण यास काय म्हणाल?
 यावर त्यांच उत्तर उपरोधिक अन अगदी सरळसोट म्हणूनच पटणार होत ते म्हणाले, नाना ,अक्षय आणि मी असे आम्ही तीघ वेडे आहोत. इतर वेडेही आम्हाला जुडतील याची वाट आम्ही बघतो आहे. आणि सामाजिक बांधिलकी हा व्यक्तिसापेक्ष भाग आहे त्यामुळ आपण इतरांना दोषी ठरवू शकत नाही.’ या उत्तरानंर मकरंद ने सर्वांसमक्ष माझयावरच गुगली टाकत मला प्रश्न केला, तूम्ही कोणता व्यवसाय करता? मी उत्तरलो पत्रकार आहे, शासकीय सेवेतत्यावर मकरंद म्हणाला तूम्ही किती योगदान दिल याकामी? मी म्हटल मी तर दिल नाही पण मी वेगळया पध्दतीने सामाजिक जबाबदारी जपतोय . ते  आणखी विस्ताराने सांगायची ती वेळ नव्हती म्हणून थांबलो. अन कार्यक्रम संपताच स्टेजवर मकरंदला गाठल. त्यांना सांगितल सर मी वयाच्या १८ व्या वर्षापासून रक्तदान करून सामाजिक जबाबदारी जपण्याच काम करतोय. रस्त्याच्याकडेला पाल बांधून जीवन जगणा-या परिवारातील लहान मुला मुलींना शिकविण्याच काम ,झोपडपटटीत जाऊन तेथील मुला मुलींना शिकविण्याच काम करत मी सामाजिकभान जपलय. मकरंद म्हणाले, वा छान’.  मी त्यांना म्हणालो सर, ‘ आपल्या समाजात खुप होतकरू तरूण आहेत त्यांनाही आपण मार्गदर्शन करण्याची गरज असल्याच मला सारख जाणवत अन ते कामही मी करीत असतोआता मात्र मकरंद यांना हे मत पटल नाहीते म्हणाले, ‘ प्रत्येकात सामाजिक जाणिवा असतात व त्याच्या त्यानेच त्या स्वत: जागवायच्या असतात अन आपण काही मार्गदर्शकाच्या भूमीकेत राहून काम करायची गरज नाही let do  them .
मकरंद अनासपुरे यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरु झालेला नाटय क्षेत्रातील प्रवास उलगडताना ब-याच हीडन बाबी कळल्या. ते शिकत असलेल्या महाविद्यालयात कला शाखेतील मुलांचा नाटय स्पर्धांवर असलेला एकाधिकार मोडून काढण्यासाठी विज्ञान शाखेतील मुलांचे प्रतिनिधीत्व करून मोडीत काढलेली एकाधिकारशाही, त्यानंतर विद्यापीठांतर्गत व अन्य नाटय स्पर्धांमधे मिळविलेले विविध पुरस्कार, राष्ट्रीय युवा महोत्सवात मिळवेलेले सुवर्ण पदक असे विषय उलगडतानांच मकरंद यांनी नाटक आणि राजकारण हा विषयही सांगितला. अर्थात ते ज्या गृपमधे काम करायचे त्याचा प्रमुख हा गृप मधील कलाकारांना कामाचा मोबदला म्हणून पैसे देत नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. आणि येथूनच त्यांनी त्या गृप ला सोड चिठ्ठी दिली. मग मंगेश देसाई आणि मकरंद अनासपुरे असा दोघांचाच गृप तयार करून त्यांनी सादर केलेले धम्माल द्वीपात्री प्रयोग. या प्रयोत रंगमंच्च सज्जा, प्रकाश संयोजन नसल्याने त्यांच्यावर होत असलेली टिका. यातून त्यांनी प्रकाश व्यवस्था, रंगमंच सज्जा याबाबी सांभाळत स्वत: दिग्दर्शन केलेले मसन जोग्याच्या चित्तर कथेवरील नाटक त्यात ऐन वेळी माचिसची काळी न सापडल्याने चिताच न पेटल्याचा प्रसंग असे एकाहून एक किस्से उलगडले जात होते.
 मकरंद आणि नानांची भेट व येथूनच मकरंद यांची मुंबईत सुरु झालेली जगण्यासाठीची धडपड थक्क करून सोडणारी आहे. नानांनी एका नाटय स्पर्धेत कुणा मोठया दिग्गज कलाकाराच्या सांगण्याहून मकरंद अनासपुरे आणि मंगेश देसाई यांचे नाटय बघण्याचा प्रसंग, आमदार निवासातील मकरंद यांचे दिवस, मधेच ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांचा किस्सा ज्यात त्यांनी मकरंद अनासपुरे यांना आमदार निवासावर पडून राहण्यापेक्षा NCPA (National Council Performing Art) ला येऊन पुस्तक वाचण्याचा दिलेला सल्ला त्यातून आयुष्याला मिळालेली कलाटनी. १९९४ पासून सुरु असलेल्या स्ट्रगल ला २००६ मधे कायद्याच बोला या  चित्रपटातून मिळालेला ब्रेक व त्यानंतर ३ वर्षात ४४ चित्रपट करण्याचा मकरंद यांनी केलेला विक्रम हाही महत्वाचा टप्पा त्यांनी उलगडला. पत्नी शिल्पा, मुलगी इंद्रायणी आणि मुलगा इंद्रनील यांना त्यांचा वेळ देत कौंटुबिक जबाबदारी पार पाडत असलेला मकरंद आणि दुस-या बाजुला मराठवाडा व विदर्भातील आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीला नाना पाटेकरांच्या मदतीने  NAAM  या संस्थेच्या माध्यमातून सुरु केले काम म्हणजे मकरंद यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा आलेख.   
विनोदी आणि गंभीर भुमीका करत मराठवाडयाची आपली अस्सल भाषा जपणारा व तेवढाच कौंटुबिक– सामाजिकभान जपणारा कलंदर कलावंत मकरंद अनासपुरे यांची भेट अवस्मरणीय ठरली.        
                                                       *****


No comments:

Post a Comment