Friday, November 1, 2013

रोजगार म्हणून पत्रकारितेस दिल्लीत संधी आणि मुला मुलींची अनास्था



कोणताही समाज एकत्र यायला त्या समाजाशी बांधील नितीमूल्य आणि त्याचे अनुपालन महत्वाचे असते. तसेच कोणत्याही समाजाची प्रगती, ही त्या समाजाच्या शैक्षणीक प्रगतीवरही तेवढीच अवलंबून असते. तद्वत, भारतात शिक्षणासाठी आग्रही असणारे आणि स्वत: वर्तमानपत्र चालवणारे महात्मा ज्योतीबा फुले आणि स्त्री शिक्षणाच्या अध्वर्यु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महात्म्यांची बहूजन समाजास उज्ज्वल परंपरा आहे. आज या समाजातील मुलं-मुली उच्च शिक्षण घेऊन देश-विदेशात आपल्या किर्तीची पताका डौलाने फडकवत आहेत. मात्र, हात मजूरी आणि फारच फार शेती  प्रमुख व्यवसाय असणार्‍या या समाजातील मुला-मुलींनी आता पारंपरिक नौकर्‍यां(वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण शाखा) न करता पत्रकारितेसारख्या आव्हानात्मक आणि इंटरेस्टींग विषयाकडे वळण्याची गरज आहे. पत्रकारितेतील पदवी आणि किमान एक वर्ष अनुभव असणार्‍या व्यक्तीस दिल्लीत पत्रकारिता करण्यास प्रचंड वाव आहे आणि भविष्यासाठी खूप सार्‍या संधीही आहेत. मात्र, समाजात या विषयी कमालीची अनास्था असल्याचे चित्र आहे.हे चित्र बदलावे गैरसमज दूर व्हावे याच उद्देशाने हा अनुभवआधारित लेखन प्रपंच.
मुळात पत्रकारिता हे क्षेत्र आपले नाही, पत्रकारिता हे चरितार्थाचे साधन होऊ शकते का? पत्रकारितेच्या शिक्षणासाठी खूप खर्च येत असावा असे एकानेक प्रश्न सामान्य माणसाच्या आणि विद्यार्थ्याच्या मनात गलका करने सहाजिक आहे. पण, त्याचं योग्य उत्तर न मिळवताच किंवा तत्संबंधी आपली जिज्ञासा पूर्ण करुन न घेताचं आपण पत्रकारिता क्षेत्राकडे पाठ वळवतो हे वास्तव आहे. त्यातही दिल्ली सारख्या शहरात पत्रकारिता करणे म्हटल्यावर तर काही विचारता सोय नाही. या सर्व प्रश्नांचा अनुभवाधारित धांडोळा घेतानाच पत्रकारिता हे करिअर कसे होऊ शकते आणि या क्षेत्रातातील विविध संधीही आपणापुढे मांडता येतील.
घरी थोडीफार शेती असल्याने मुलाने शेतीच्या कामात मदत करावी हीच माफक अपेक्षा बहूजन समाजातील सामान्य माणसाची असते. थोडी आर्थिक परिस्थिती बरी असेल तर मुला-मुलीचे शिक्षण होऊ शकते. मग, ती स्थिती थोडी समाधानकारक असेल तर मुला-मुलींच्या उच्च शिक्षणास परवानगी किंवा त्याला वा तिला तशी संधी मिळते. पण, हे चित्र मुख्यत्वे नोकरीव्यवसायात असणार्‍या वर्गाच्या कुटुंबात आढळते. आता इथेही आपल्या मुलाने वा मुलीने कोणती स्ट्रीम निवडावी हे त्याचे पालकच ठरवतात आणि त्याने वा तीने आयुष्यात काय बनावं वा करिअर म्हणून कोणतं क्षेत्र निवडाव हेही पालकच ठरवतात. कलाशाखा घेऊन शिक्षण करणारे 12 वी नंतर डीएड तर पदवी शिक्षण व्हाया डीएड शिक्षक पेशा निवडतात. विज्ञान शाखा घेऊन 12 वी उत्तीर्ण होणारे वैद्यकीय वा अभियांत्रिकी शाखा निवडतात. त्यात पालकांनीही तोच व्यवसाय स्वीकारला असल्याने आपल्या पाल्यानेही तोच व्यवसाय स्वीकारावा हा अनाठायी आग्रह असतोच. हे शिक्षण पूर्ण करताना शासकीय विद्यालयांमध्ये शिक्षण पूर्ण झाल तर लाखांच्या घरातील खर्च निदान हजारांमध्ये येतो. पण, या सर्वांनी पत्रकारिता, हॉटेल मॅनेजमेंट, एअर होस्टेज, एव्हीयेशन आदी आव्हानात्मक व्यवसायांकडे जाणून बुजून पाठ फिरवली असते. ज्यांनी ही पठडी स्वीकारली तेही आपला निर्णय उचित होता हे सिध्द करून दाखविण्यासाठी तितकी मेहनत घेत नाहीत परिणामी त्यांच्या वाटयाला अपयश येते आणि म्हणूनच असले अभ्यासक्रम वा क्षेत्र नकोरे बाबा हा संदेश  समाजात पसरतो. मात्र, आता हे सर्व थांबण्याची नितांत गरज आहे. बहूजन समाजाचा टक्काही आता पत्रकारिते सारख्या क्षेत्रात चमकायला हवा.
 कोणत्याही शाखेची पदवी धारण करणारा विद्यार्थी- विद्यार्थीनी पत्रकारितेचे शिक्षणास पात्र ठरतो. आजमितीस राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो. तसेच यशवतंराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातूनही पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करता येऊ शकते. पण माझ्या मते दिल्लीस्थित इंडीयन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्यूनीकेशन एण्ड जर्नालिझम(IIMC) ही केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत येणारी संस्था, दिल्लीतीलच जामीया मिलीया इस्लामीया विद्यापीठाचा वृत्तविद्या विभाग तसेच महाराष्ट्राचा विचार करता पुणे विद्यापीठातील वृत्तविद्या व जनसंज्ञापन विभाग या शासकीय संस्थांच्या पात्रता परिक्षा उत्तीर्ण करून अगदी नाममात्र खर्चात  पत्रकारितेचे उत्तम शिक्षण अर्जीत करता येणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक तयारी अर्थात वाचन, मनन आणि इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक आहे. या उल्लेखीत संस्थांमध्ये वसतीगृह आणि उत्तम स्टुडिओसह प्रत्याक्षीक आधारित पत्रकारितेचे शिक्षण दिले जाते. त्यामुळेच या संस्थांची ब्रॅण्ड व्हॅल्यू सुध्दा जास्त आहे.
 मुळात समाजकार्याची आवड आणि कामाची धडाडी       असणार्‍या मुला मुलीस पत्रकारिता क्षेत्रात प्रंचड वाव आहे. त्यातही पत्रकारितेतील करिअरसाठी दिल्ली शहर ही उत्तम निवड ठरेल हा माझा स्वानुभव. पत्रकारिता म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण करून मुलगा वा मुलगी आपल्या खांदयात शबनम लटकवून आणि मोठासा झब्बा परिधान करून बातम्या संकलीत करेल अशीच सर्वसाधारण धारणा या व्यवसायाबदृल आहे. पण, चित्र वेगळे आहे. पत्रकारितेचा अभ्याक्रम पूर्ण करून शासकीय व खाजगी जनसंपर्क कार्यालय, जाहिरात क्षेत्रात संहिता लेखन वा व्हाईस वोव्हर, पुस्तक व प्रसिध्दी साहित्यासाठी अनुवाद, माध्यम सल्लागार, इव्हेंट मॅनेजमेंट आदी क्षेत्रात झळकण्याची नामी संधी आहे. पत्रकारितेचा अभ्यासपूर्ण करून आणि किमानपक्षी एक वर्ष पत्रकार म्हणून वृत्तपत्र वा वृत्तवाहिनीची कार्यपध्दत त्यात चालणारे कार्य याचा अनुभव घेवून आलेल्या मुला मुलींसाठी दिल्लीतील पत्रकारिता आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणारी व आत्मभान मिळवून देणारी आणि विचाराने पोक्त बनवणारी ठरेल. कारण, देशासाठी कायदे दिल्लीस्थित संसदेतूनच तयार होतात, सर्व राष्ट्रीय राजकीय पक्षांची मुख्यालय येथे असल्याने त्यांची रचना व कार्यपध्दतीचा देशव्यापी डोलारा समजून येतो, मोठया प्रमाणात भेटी देणारे परदेशी पाहुणे आणि भारत सरकारशी त्यांचे होणारे करार मदार, विविध मंत्रालयाच्या भव्य इमारतीत त्यात चालणारे काम तेथील प्रशासकीय यंत्रणा, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विविध विभागांचे मंत्री,   विविध पक्षांचे आमदार, खासदार, राज्यातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी यांच्या दिल्ली भेटी आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधी या शहरात पत्रकारिता करणार्‍ यास सहज शक्य आहे. शिवाय दिल्ली शहरात महानगर पालिका, विधानसभा आणि संसद अशा तिनही कार्यकारीमंडळ आहेत. त्यांच्या कामाची पध्दत एकाच ठिकाणी बघावयास मिळते. याशिवाय देशभरातील वृत्तपत्र आणि वृत्त वाहिण्यांचे प्रतिनिधी येथे कार्यरत आहेत त्यांच्याशी व त्या त्या राज्यातील मंत्री, खासदार, आमदारांशी भेटण्याची सहज संधी उपलब्ध होत असल्याने देशव्यापी जनसंपर्क वाढतो आणि ज्ञानाच्या कक्षाही रुंदावतात. बहुभाषी व वैविद्यपूर्ण संस्कृतीने नटलेला भारत देश या राजधानीच्या शहरातून अनुभवन्याची नामी संधी पत्रकारितेच्या माध्यमातून मिळने शक्यप्राय आहे.
 दिल्लीत पत्रकारितेतील संधीबाबत थोडा प्रकाश टाकतो. आकाशवाणी दिल्लीतील मराठी विभागात अनुवादक-वृत्तनिवेदक पदी काम करण्याची नामी संधी उपलब्ध आहे. त्यासाठी आकाशवाणीच्या www.newsonair.nic.in या संकेत स्थळावर एप्रिल- मे महिण्यात जाहिरात दिली जाते. ही परिक्षा आणि आवाजाची परिक्षा उत्तीर्ण होताच आपण या विभागात कामास सुरुवात करू शकता. याशिवाय इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असेल तर पात्रता परिक्षा व मुलाखत उत्तीर्ण होऊन आकाशवाणीच्या संकेतस्थळासाठी किंवा मुख्य न्युज रुम मध्ये संपादन सहायक पदावर काम करता येते. त्यासाठीची जाहिरात आणि निवड प्रक्रिये संबंधी माहिती आकाशवाणीच्या संकेत स्थळावर उपलब्ध असते. मराठी विभागात प्रत्येक डयुटीला कामाचे तास 3 असतात तर त्याचा मोबदला 850 रुपये आणि मुख्य न्युज रुममध्ये 6 तास काम असतं त्याचा मोबदला प्रति डयुटी 1600 रूपये असतो. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मीडिया मॉनिटरींग सेंटर मध्ये मराठी मनोरंजन व वृत्त वाहिन्यांबाबत येणार्‍या तक्रारी समजून घेवून रिपोर्ट तयार करणे व दैनंदिन रिपोर्ट तयार करण्यासाठी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण झालेल्या मराठी मुला मुलीस उत्तम संधी आहे. मॉनीटर सिनीयर, मॉनीटर आणि सिए ही पद येथे आहेत त्या त्या पदानुसार पगार आणि आठवडयातून 2 सुटया, प्रतिदिन 8 तास डयुटी येथे दयावी लागते.
   उपरोक्त उल्लेखीत दोनही ठिकाणी काम करून डबींग आणि अनुवादाची कामही करण्याची नामी संधी दिल्लीत आहे. डबींग बदृल सांगायचे झाल्यास कोणतेही मोठे ब्रँड जेव्हा बाजारात येते तेव्हा त्याची लाँचींग हिंदी भाषेतील जाहिरातीच्या माध्यमातून देशभर केली जाते. पण आपला संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोचावा यासाठी बँडचे मालक ती जाहिरात आपल्या देशातील प्रत्येक प्रादेशिक भाषेत देतो. ती जाहिरात महाराष्ट्रासाठी बनवताना  मूळ जाहिरातीतील पात्र व संवाद तसेच ठेवून केवळ जाहिरातीची मुख्य संहिता मराठीत अनुवादीत करून स्टुडिओमध्ये डब केली जाते. अशाच प्रकारे भारत सरकारचे जगजागृतीबाबत टिव्ही किंवा रेडिओवरील कार्यक्रमातही मराठी भाषकांची निकड असते. या क्षेत्रात दिल्लीत काम करणार्‍या व्यक्तिंची भेट घेवून आपण त्यांच्या सोबत काम करून पैसे व अनुभव मिळवू शकतो.
          
      
                                     
   

Wednesday, October 30, 2013

आई- वडीलांप्रती कृतज्ञता

खरे तरे 'आई असते जन्म भराची शिदोरी जी सरतही नाही अन उतरतही नाही' अगदी चपखल वर्णन केलय फमुंनी आपल्या कवीतेत आणि बाप हे कॅरेक्टरही माणसाच्या आयुष्यात तेवढच महत्वाच म्हणूनच तर डॉ. नरेंद्र जाधवांना 'आमचा बाप अन आम्ही' लिहावसं वाटल. आता आई-बापाच महत्व वर्णन करणार्‍या या दोन प्रातिनिधीक कलाकृतींचा संदर्भ देवून मूळ मुद्याकडे वळतो. माणसाला जन्म देणारे आणि त्याला जीवन मार्गावर चालण्यास सक्षम करणारे आई-बाप हे प्रत्येकच माणसाला कृतज्ञता व्यक्त करणार्‍या व्यक्ती. खरे तर त्यांच्या पासून लांब राहण्याची मला 20 वर्षांची सवय झाली. पण दूर राहूनही त्यांनी दिलेले संस्कार अण ताठ माणेन जगण्याच बळ शब्दात वर्णन करता येणार नाही. म्हणूनच त्यांच ऋण जिथे जिथे म्हणून जाहीररित्या व्यक्त करता येईल ते अगदी डोळसपणे केल. मग ते महाविद्यालयीन जीवनात शोध प्रंबंधाच्या अर्पण पत्रिकेतील त्यांचा उल्लेख असो किंवा त्यांच्या नावातील आध्याक्षरांनी तयार होणार्‍या टोपण नावाने(वनमोती-आईच नाव वनमाला तर वडलांच नाव मोतीरामजी)  लिखान करण्याची संधी.
                         पहिलं लिखान छापून आलयं राजकारण्यांबाबत आणि राजकारण्यांचीच मुलाखत करून ज्या राजकारण्याची बातमी करून मी सर्वात पहिली बायलाईन मीळवली होती ती सुध्दा एकाच दिवशी 11 आवृत्यांमध्ये तीही लीड स्टोरी. असो, हा केवळ योगायोग आहे तुर्तास ती मुलाखत येथे देत आहे. कृपया मुलाखतीच्या तळातील नावावर(पत्रकारितेच्या भाषेत क्रेडीट लाईन) लक्षद्या .
 

Tuesday, October 15, 2013

शासकीय नोकरितील पहिल्याच दिवशी पहिलीच मुलाखत




 शासकीय नोकरितील पहिल्याच दिवशीचं पहिलंच काम :
         माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या(DGIPR) उपसंपादक पदाच्या निवड प्रक्रियेतील अंतिम यादी 14 फेब्रूवारी अर्थात 'व्हालेंटाईन डे' ला जाहीर झाली. तेव्हा मी इलेक्ट्रानीक मॉनिटरींग सेंटर(EMMC) या दिल्लीस्थित, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिनस्थ काम करणार्‍या विभागात डयुटीवर होतो. त्यावेळेस मी 'IBN लोकमत' या वृत्त वाहिनी वरील एका डिबेटबाबत आलेल्या तक्रारीवर काम करीत होतो. माझं नाव DGIPR च्या अंतीम यादीत असल्याचं कळताचं खूप आनंद झाला. तसेच, आई-बाबांना फोन करून बातमी कळवली. आणि EMMC च्या उपस्थित सर्व मित्रांनाही बातमी कळवली. अन पहिल्यांदा या ऑफिस मध्ये आनंदाच्या भरात मी चक्क कामच केलं नाही.
   त्याचवेळी सेटच्या(State Eligibility Test) परिक्षेचा फॉर्म भरला असल्याने गावाकडे जाण्याचा प्लॅन होताच. 17 फेब्रूवारीला ही परिक्षा होणार होती, त्यामुळे सर्व आवरून आणि EMMC राजीनामा देण्यासाठी 15 दिवस आधी दयावयाची नोटीस देवून गावाकडे निघालो. आज अख्या आयुष्याची मेहनत फळाला आल्याचा आनंद घरी परतताना होता.आजचा ट्रेनचा प्रवास अर्थात दिनांक 15 फेब्रूचा प्रवास त्याअर्थानेच माझ्यासाठी थोडा स्पेशल होता. अन 16 ला घरी पोचलो. आंघोड, जेवन आटोपून थोडं निवांत बसलो. तोच, पोस्टमन आला त्याच्याहातात 'माझी ऑर्डर' होती. अन 'पोस्टींग' होत. My Always Loving Delhi. मग काय! एक-दोन जाणकारांना फोन लावला अन सेटची परिक्षा न देताच दिल्लीला परत जावून कामावर रूजू होण्याचा निर्णय घेतला. ट्रेनचं तिकीटही बूक केल.आयुष्यात पहिल्यांदाच अस घडल की घरी गेलो अन लगेच परतलो नुसता प्रवास अन प्रवास. पातालकोट या मला नव्यानेच शोध लागलेल्या ट्रेनने बैतूल व्हाया दिल्लीच्या प्रवासाठी निघालो. ट्रेन लेट होती म्हणून पोचलीही दिल्लीत लेट. तेव्हा रूमवर न जाता थेट महाराष्ट्र परिचय केंद्र या माझ्या जीवनातील पहिल्या सरकारी कार्यालयात पोचलो सकाळी 9 वाजता, 18 फेब्रूवारी2013 ला. अन सर्वात आधी रूजू अहवाल दिला. येथील बॉसला मॅसेज करून तसं कळवलं. मग शेजारील कटींगच्या दुकानात कटींग व दाडी आटोपून थोडा फ्रेश झालो.  सोबत असलेल्या बॅगमध्ये कपडे होतेच ते परिधान करून आज पहिल्याच दिवशी काय खास न्यूज करता येईल ते बघितल. कळल की उद्या 19 फेब्रूवारीला साहित्य अकादमीचे पुरस्कार वितरीत होणार आहेत. तेव्हा महाराष्ट्रातून ज्यांना हा पुरस्कार मिळणारं ते महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार तसेच प्रसिध्द कथाकार जयंत पवार यांची मुलाखात केली तीही साहित्य अकादमीच्या सभागृहात जावून. 
 हाच माझ्या शासकीय नोकरीतील पहिला आनंदमय दिन. ती मुलाखात येथे देत आहे.
  ...................................................................
 सोमवार, 18 फेब्रुवारी, २०१३


लिखाण अधिक सकस आणि दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करावेत -- जयंत पवार
                                                 




देशभरातील विविध प्रादेशिक भाषांतील साहित्यिक योगदानासाठी देण्यात येणा-या 2012 च्या साहित्य अकादमी पुरस्कारावर मराठी भाषेची पताका उंचवणारे साहित्यिक जयंत पवारांना " फिनीक्सच्या राखेतून उठला मोर " या लघुकथासंग्रहासाठी सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे आनंदापेक्षाही आश्चर्य, संकोच व भिती यांचा त्रिवेणी संगम वाटतो अशा भावना व्यक्त करणारे मुळचे नाटय लेखनाच्या प्रांतात मुशाफिरी करणारे जयंत पवार कथेसारख्या लिखाणाच्या वेगळया पठडीला आपलेसे करतात. आणि तीच कलाकृती देशातील साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानल्या जाणा-या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवडली जाते हेच त्यांच्या लिखाणाचे वेगळेपण. कथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त एकूण मराठी साहित्यिकांमध्ये 1973 साली नामवंत लेखक व कथाकार जी.ए.कुलकर्णी नंतर दुसरा मान मिळवणारे जयंत पवार यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून साधलेला हा संवाद.

प्रश्न : साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर काय भावना आहेत ?
उत्तर :
पुरस्कार मिळाल्याबद्दल मनात आनंद आहे. पण त्याहीपेक्षा आश्चर्य या गोष्टीचं वाटत की, मी मुळात नाटय लेखन करतो. आणि कथा लेखनाच्या प्रारंभीच मला हा पुरस्कार मिळत आहे. संकोच या गोष्टीचा वाटतो की माझ्यापेक्षा ताकदीचे कथा लेखक मराठी भाषेत आहेत आणि अशा स्थितीत मला कामाची पावती मिळते.या पुरस्कारामुळे वाचकांकडून माझ्या बद्दल अपेक्षा वाढल्यामुळे त्या पूर्ण करु शकेल का, याचे दडपण येऊन थोडी भीती सुध्दा वाटते.

प्रश्न : मूळ नाटय लिखानाचा पिंड सोडून कथेकडे कसे वळलात आणि कथा लेखनाचा प्रांत कसा वाटतो ?
उत्तर
: मी जरी आजपर्यंत नाटय लिखाण केले असले आणि अधांतर’, ‘काय डेंजर वार सुटलय’, ‘टेंशनच्या स्वप्नात ट्रेनया माझ्या नाटकांना वाचक-प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असले तरी मला कथा लेखनाचा प्रांत तेवढाच प्रिय आहे. माझ्यामते तुम्ही एकदा नाटक लिहीले की, ते प्रेक्षकांसमोर येईपर्यंत मूळ संहितेत बराच बदल झालेला असतो. पण, कथा लेखनात तुम्ही एकदा कथा लिहिल्या की, त्या थेट वाचकांपर्यंत पोहचतात व इथे लेखक आणि वाचक यांचा थेट संवाद घडून येतो. माझ्या कथा लेखनामध्ये माणसांचे गुंतागुंत होत चाललेले आयुष्य मांडण्याचा प्रयत्न आहे. नामवंत कथाकार भाऊ पाद्ये यांनी कथा लेखनात घालून दिलेल्या काही मर्यादा व साच्यांना समोर ठेऊन मी कथा लेखन करतो. आणि ही पध्दती आता इतर लेखकही स्वीकारत आहेत.

प्रश्न : पुरस्कार प्राप्त " फिनीक्सच्या राखेतून उठला मोर " लघुकथा संग्रहाविषयी काय सांगाल ?
उत्तर :
या कथा संग्रहात मुंबई महानगारातील कामगार, कष्टकरी, अधिकारी आदीच्या जगण्यातील गुंतागुंतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक कथेत निवेदन शैलीचा वेग-वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्नही या कथा संग्रहात केला आहे.

प्रश्न : या कथा संग्रहातील तुम्हाला आवडलेल्या कथा कोणत्या ?
उत्तर :
मुंबईतील फिनीक्स टेक्सटाईल मिलच्या ठिकाणी उभा असलेला आजचा मॉल हे कथासूत्र घेऊन या मिलमध्ये काम करणा-या कामगारांच्या चार पिढयांच्या जीवनाचे स्थित्यंतर असणारी " फिनीक्सच्या राखेतून उठला मोर " आणि " एका रोमहर्षक लढयाचा गाढीव इतिहास " या दोन कथा मला फारच भावतात.

प्रश्न : सध्या काय लिखाण सुरु आहे ?
उत्तर :
सध्या मी एक नाटक लिहायला घेतले आहे.

प्रश्न : पत्रकारितेच्या व्यस्ततेत नाटय व अन्य लेखनाला न्याय देण्याच्या आपल्या सूत्राला कसे मांडाल ?
उत्तर :
एक नाटक लिहायला मला साधारण पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागतो. एक लेखक म्हणून समाजाचे चित्र उघडया डोळयाने बघणेही तेवढेच महत्वाचे असते आणि त्यासाठी बातम्यांव्यतिरिक्त टीव्ही न पाहणे, फेसबुक, ब्लॉग न लिहिणे यातून वेळ वाचवून मी, तो वेळ लिखानाचे संदर्भ गोळा करणे आणि निरीक्षणासाठी देतो.

प्रश्न: भारतातील रंगभूमीच्या स्थितीबाबत काय सांगाल?
उत्तर:
भारतात मराठी रंगभूमीनंतर पश्चिम बंगालची रंगभूमी श्रेष्ठ आहे. पण या बंगाली रंगभूमीला मध्यंतरी मरगळ आली.सद्य:स्थितीत केरळ आणि तामिळनाडूतील रंगभूमीसुध्दा ताकदीने पुढे येत आहेत.

प्रश्न: देशात सध्या कोणत्या भाषेत चांगले व मोठया प्रमाणात साहित्य लिखाण होत आहे?
उत्तर:
माझ्यामते सध्या आपल्या देशात हिंदी भाषेत विपुल प्रमाणात व दर्जेदार साहित्य निर्मिती होत आहे.

प्रश्न: मराठी भाषेत तरुण लेखकांची फळी उभी राहत आहे का आणि त्यांच्या लिखाणाबद्दल काय वाटते?
उत्तर:
हो, मराठी भाषेत मोठया प्रमाणात तरुण लेखकांची फळी उभी राहत आहे. मला येथे अधोरेखित करायला पाहिजे की खलिस्तान चळवळ, बाबरी मस्जीद, जागतिकीकरण या चालू शतकाच्या 80-90 च्या दशकात घडलेल्या घटनांनंतर मराठी भाषेत तरुण लेखकांची एक मोठी फळी निर्माण झाली. आणि समाजातील विविध घटना व प्रश्नांना त्यांच्या लिखानातून वाचा फुटली.

प्रश्न : नव्या लेखकांना काय संदेश आहे !
उत्तर :
मेहनतीला पर्याय नाही. आपले लिखाण आपणच निरखून वाचनं व ते आणखी सकस होण्यासाठी प्रयत्नरत राहावे लागेल. यातच काय तो संदेश आला.

प्रश्न : पुरस्कारानंतर आता पुढे काय ?
उत्तर :
पुरस्काराने मी मुळीच हुरळून गेलेलो नाही. यापुढेही माझ्या लेखनावर प्रेम करणा-या वाचक प्रेक्षकांना उत्तमोत्तम साहित्य सादर करणे व त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे यावर माझा भर राहील.

प्रश्न : दिल्लीत पुरस्कार स्वीकारतांना काय भावना आहेत ?
उत्तर :
देशभरातील साहित्यिकांचा सन्मान देशाच्या राजधानीत होत आहे. देशभरातील विविध भाषेतील दर्जेदार साहित्यात मराठी साहित्याचे प्रतिनिधीत्व करायला मिळत आहे हा ख-या अर्थाने मराठी लेखन, वाचन करणा-या व बोलणा-या तमाम मराठी जणांचा सन्मानच राजधानी दिल्ली दरबारी होत आहे. याचा मनस्वी अभिमान वाटतो.


Thursday, October 10, 2013

विज्ञान प्रदर्शनी


  डोक्यात शिरणार्‍या नवीन-नवीन कल्पना अन मग त्याचाच पिश्चा पूरवून त्याचा एक प्रयोग घडून प्रत्यक्षात येण, अन समाजाच्या उपयोगी पडनं, अशी मोठी चेन ज्या विषयाला आहे ते म्हणजे विज्ञान. मग याच ध्येयाने प्रेरित होवून कार्य केलेली आईनस्टाईन, गॅलीलीओ ते अगदी एपीजे अब्दुल कलाम, जयंत नारळीकरांपर्यंत शास्त्रज्ञांची अशी माेठी फळी सांगता येईल. तसेच, आपणही प्रत्येक जण आपल्या आजुबाजूच्या परिसराच्या सततच्या वावराने काहीना काही शोधत असतो. शालेय जीवनात ही ओढ असण आणि त्यास शालेय विज्ञान प्रदर्शनी सारख व्यासपीठ मिळन त्यातही भारी. अभ्यास सांभाळून अशा प्रदर्शीनींमध्ये सहभाग घेण म्हणजे आपली मांडणी कला आणि वक्तृत्वाची खरी कसोटी असते. अन हे ज्याला जमल तो बाल शास्त्रज्ञ होण्यास वा निदान त्या दृष्टीने त्याचे पाऊल पडण्यास सुरुवात होत असते. मी ही तसा प्रयत्न केला होता 6 वी‍त असताना. महात्मा  ज्योतिबा फुले विद्यालय विहीगाव या शाळेच प्रतिनिधीत्व अंजनगाव सुर्जी येथे आयोजित तालुक्का स्तरीय स्पर्धेतला तो माझा सहभाग. प्रयोगाच नाव 'मुळासकट रोपट उपटून काढण्याचे यंत्र'. लोखंडी बादलीला समसमान चिरा देवून तयार केलेले हे यंत्र आणि तिथेच माझ्यातील बाल शास्त्रज्ञ शांत झाला. पुढे माझ्या शिकवणीला येणार्‍या विद्यार्थीनीला 'घरगुती कुकरचे मॉडेल' बनवून देण्यात केलेली मदत येवढाच काय तो शालेय विज्ञान प्रदर्शनीशी आलेला संबंध. आणि आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर थेट राष्ट्रीय शालेय विज्ञान प्रदर्शनीचे वार्तांकण करण्यासाठी गेलो असतानाचा हा खास वृतांत.   

       केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने आयोजित तिसर्‍या राष्ट्रीय शालेय विज्ञान प्रदर्शनीत पश्चिम विभागातून महाराष्ट्राच्या क्षितीज महाजनच्या अंध व्यक्तिंना उपयुक्त ठरणारी काठीया प्रयोगाने प्रथम तर सुरेश पवार ने तयार केलेली आधुनिक बैलगाडी या प्रयोगाने दुसरा क्रमांक पटकावून कौतुकाची थाप मिळवली.
           येथील प्रगती मैदानावर 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. त्यात देशभरातून एकूण 5 विभागातून 935 प्रयोग सादर करण्यात आले होते. महाराष्ट्रातून एकूण 99 प्रयोग सादर करण्यात आले होते. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांचा मिळून पश्चिम विभाग तयार करण्यात आला. या विभागातून महाराष्ट्राच्या नागपूर येथील मुंडले इंग्लीश स्कुलचा इयत्ता 9 वीत शिकणारा विद्यार्थी क्षितीज महाजन ने तयार केलेली अंध व्यक्तिंना उपयुक्त ठरणारी काठीया प्रयोगाने प्रथम क्रमांक पटकवला. क्षितीजने ही काठी बनवण्यासाठी स्वत: नागपुरातील द ब्लाईंड बॉईज इन्स्टिटयुटमध्ये जावून तेथील अंध विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यांना दैनंदिन जीवनात येणार्‍या अडचणी समजून घेतल्या आणि येथूनच सेन्सर चा उपयोग करून अंधाना उपयुक्त ठरणार्‍या काठीच्या प्रयोगाचा जन्म झाला. आपल्या शिक्षकांशी चर्चा करून, विविध पुस्तक वाचून व इंटरनेटहून माहिती गोळा करून क्षितीजने सेंसरचा वापर करून ही काठी तयार केली. दिशा दर्शक काठीच्या माध्यमातून अंध व्यक्तिला रस्ता कळतो त्यासाठी त्या व्यक्तिच्या गळयात सेंसर अडकवण्यात येतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तिच्या मदतीशिवायही अंध व्यक्ती घराबाहेर जाऊन आपले काम सुरळीतपणे पार पाडू शकतात.
              कोल्हापूर जिल्हयातील, करवीर तालुक्यातील, कसबा आराळे येथील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी सुरेश पवार याने तयार केलेल्या आधुनिक बैलगाडी च्या प्रयोगाने दुसरा क्रमांक पटकावून कौतुकाची थाप मिळवली आहे. आजपर्यंत चारचाकी व दुचाकी गाडयांमध्ये बरेच प्रयोग झालेत. पण, देशातील शेतकर्‍यांची बैलगाडी मात्र या प्रयोगांपासून लांबच होती. सुरेश पवार ने आपल्या भागातील शेतकर्‍यांना होत असलेल्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी आधुनिक बैलगाडीचा प्रयोग तयार केला. त्यात बैलगाडीचा अपघात झाल्यावर बैलगाडीच्या काप्त्या आवळल्याने बैलांचा फासी लागून होणारा मृत्यू टाळण्यासाठी गाडीवानाच्या हाताशी एक यंत्र बसवले आहे. ज्यामुळे अपघाताच्यावेळी काप्‍त्या सुटून बैल सुरक्षीत बाहेर पळू शकतात.या  बैलगाडीच्या पुढच्या भागात एक चाक बसवून बैलांच्या खांद्यांवर येणारा भार कमी करण्यात आला आहे. बैलगाडीच्या चाकाद्वारे तयार होणार्‍या गतीज उर्जेचा उपयोग करून बैलगाडीला पुढील बाजुला दिवे बसविण्यात आले आहे तसेच मागच्या बाजुला इंडिकेटर बसविण्यात आले आहे. त्यामुळे रात्री बैलगाडीवर कोणती गाडी आदळून अपघात होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. बैलगाडीच्या चाकालाच करवत व हत्यारांना धार लावणारे एंब्री यंत्रही बसविण्यात आले आहे.
       याखेरीस सांगली जिल्हयातील,जत तालुक्यातील, कुंभारी येथील न्यू इंग्लीश स्कुलचा विद्यार्थी स्वप्नील पाटील ने तयार केलेला इलेक्ट्रो सेल्यूलर एक्स्प्लोजीव रिमोट इन बाय हयूमन इलेक्ट्रिक जनरेटर, अहमदनगर जिल्हयातील, संगमनेर येथील सर डी.एम.पेटीट विद्यालयाचा विद्यार्थी विशाल गुर्रप याने तयार केलेला एसएमएस द्वारे मोटार पंप सुरु करण्याचा प्रयोग हे प्रयोगही या विज्ञान प्रदर्शनीतचे विशेष आकर्षन ठरले.