Wednesday, January 13, 2016

महाराष्ट्रभूषण पाडगांवकरांना आदरांजली




मंगेश पाडगांवकरांच्या रचनांनी मला शालेय जीवनापासूनच वेड लावल होत. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावेया गीताच्या प्रेमात पडून मला गायन शिकण्याची अतीव इच्छा झाली. या नंतर पाडगांवकरांच्या ब-याच रचना त्यातील भाव आणि प्रतीक ही वयानुसार आणि अनुभवानुसार आणखी खास समजायला लागली आणि त्यांच्या काव्यातील माधुर्य आणख्रीच भावू लागल.  पाडगांवकराचं गीत त्याला यशवंत देवांचं संगीत आणि अरूण दाते यांचा स्वरसाज चढलेल्या अनेक गीतांनी मराठी रसीकां प्रमाणेच माझ्या मनावरही गारूड केल. ‘शुक्रतारा मंद वारा, भातकुलीच्या खेळामधली राजा आणिक राणी,अखेरचे येतील माझ्या तेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रिती’ ,  ‘दिवस तुझे हे फुलायचे झोपाडया वाचून झुलायचेहे मला त्याकाळी आणि आजही भावलेली गीते.
                याच गीतांना त्याच दिग्गजांकडून ऐकण्याची अनोखी संधी मला लाभली आणि तीही दिल्लीत हे माझ महदभाग्य. दिल्लीतील वास्तव्यात ज्या दिग्गजांना जवळून बघण्याची ऐकण्याची सधी मिळाली त्यात अरूण दाते. येथील कमानी सभागृहात गणेशोत्सवकाळात दाते यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. वार्ध्यक्याने त्यांचा आवाज क्षिण झाला होता मात्र पाडगांवकरांचा भाव रसिकांपर्यंत पोचवण्यात ते कमालीचे यशस्वी झाले. (गावाकडे परतवाडा येथे आयोजित कार्यक्रमात अरूण दातेंना ऐकण्याची संधी मिळाली त्यात अगदी टापटीप गायन मनाला भिडून गेले होते).यावेळी पाडगांवकरांच निवेदन असत तर आणखी मजा आली असती अस सारख वाटत होत. हे चित्र बघण्याच स्वप्न तर पूर्ण झाल नाही. मात्र, पाडगांवकरांच्या काव्यावर आधारीत आणि स्वत: पाडगांवकरांनी सादर केलेल्या कविता व सोबत त्यांची मुलाखत अशी मेजवाणी गणेशोत्सव काळातच श्रीराम सेंटर या दिल्लीतील सभागहात मिळाल.
                या कार्यक्रमात काव्य निर्मितीचा एक प्रसंग जो स्वत: पाडगांवकरांनी सांगितला होता तो कायम स्मरणात राहणारा आणि पाडगांवकरांविषयी आठवण म्हणून हदयाच्या कप्प्यात कायम जपावा असा क्षण. ‘ दिवस तूझे हे फुलायचे या गीताच्या निर्मितीबाबत सांगताना पाडगांवकर म्हणाले होते, या गीताच्या शेवटचे कडवे मला बदलवावे लागले. त्‌याचे झाले असे, माझा मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला, बाबा या गीतातील शेवटच कडव जरा अश्लील वाटते. हे ऐकूण मी ताडकण उडालो आणि त्याला विचारल , ते कस?. मुलगा म्हणाला,माझ्या ग घ्रराच्या पाशी तू थांब नागडे जराशी अशी ही ओळ झाली आहे. मुलाचं म्हणन मला पटल आणि मी ते वाक्य सुट केल माझ्या ग घराच्या पाशी तू थांब ना गडे जराशी अस केल आणि हे गीत गातांना गायकांनीही याबाबत काळजी घेण्यास सांगितले. हा किस्सा ऐकूण सभागहात एकच हशा पिकला. पण गीत निर्मिती प्रक्र‍ियेत पाडगांवकर किती चौकस असत याचा अनुभव आला. लहाणग्यांसाठी लिहीलेल सांगसांग भोलानाथ हे बालगीत असोयाशिवाय प्रेम गीत विरह गीत , राजकीय व सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा त्यांचा उदासबोध हा काव्य संग्रह असो किंवा कबीरांच्या दोहयांचा त्यांनी केलेला भावानुवाद असो पाडगांवकरांच्या सच्च्या व कलंदर कवी व्यक्तीत्वाच्या छटा त्यातून दिसून येतात. जरी हा कलंदर कवी आपल्यातून गेला असला तरी त्यांच्या काव्याच्या माध्यमातून ते चिरकाल आपल्यात राहतील हयाच भावना त्यांना आदरांजली वाहताना उदधृत होतात.

लक्ष्मी नारायणाची भेट



       दिल्लीतील थंडी काही अर्थाने टोकाचीच. ऑफीस होत. त्यात कळल तत्कालीन महिला व बालकल्याण विकास मंत्री वर्षा गायकवाड दिल्लीत आल्या आहेत . मग त्यांची बैठक कुठे व कशासाठी आहे याची माहिती घ्रेण्यासाठी घाईघाईतच फोन लावलेत्यातून कळल की, लोधी रोडवरील इडिया इंटरनॅशनल सेंटरला एक बैठक आहे. ऑफीसची गाडी आणि फोटोग्राफरला घेऊन बैठकस्थळी पोहचण्यासाठी निघालो. मंत्री महोदय येण्या आधीच पोहचलो. हे दिल्लीतील Unicef च कार्यालय होत.  भडक मेकअप, उत्तमसाडी, केशसंभार, आणि भक्कम शरीरयष्टी असलेली एक व्यक्ती डोळयासमोर आली आणि लगेच डोळयासमोरून ओझरती निघून गेली ती व्यक्ती होती लक्ष्मी नारायण त्रिपाठी’. बैठकीचा विषय होता महाराष्ट्रात महिला धोरण तयार करण्याचे काम आणि त्यात तृतीय पंथींयाचा सहभाग व त्यांच्या विषयी धोरण’.
                लक्ष्मी नारायण त्रिपाठी, यांच्याशी या बैठकीनिमित्त गप्पा मारण्याची संधी मिळाली. तोपर्यंत ही व्यक्ती कोण? तीचं कार्यक्षेत्र याबाबत मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. मंत्री महोदयांशी लक्ष्मीचा सरळ आणि आत्मविश्वासपूर्ण संवाद आणि या कार्यालयात unicef च्या अधिका-यांसोबत वागण्या बोलण्यातून लक्ष्मी विषयी एक वेगळच इंप्रेशन माझ्या मनात तयार झालही व्यक्ती काहीतरी वेगळी आणि प्रंचड प्रतिभा असणारी व्यक्ती असल्याच सारख जाणवत होत. मग या बैठकीसंदर्भात काही फोटोग्राफ काढण्याचे निर्देश मी फोटोग्राफरला केलेत. आणि बैठकीविषयी माहिती विचारायला मंत्रीमहोदयांकडे गेलो त्यांनीही मला ओझरती माहिती दिलीपण अजूनही माझ्या आयडीया काही स्पष्ट होत नव्हत्या त्यात मंत्रीमहोदयांची आणखी काही बैठक आहे का  ? तस असेल तर ती ही कव्हर करावी लागेल असा दुसरा प्रश्नही डोक्यात होताच. तितक्यात लक्ष्मी ही मंत्री महोदयांना निरोप देण्यासाठी आलीनिरोप देऊन झाल्यानंतर मी लगेचच त्यांच्याशी बोलता झालो. मॅडम म्हणत मी सुरूवात केली. ही बैठक त्यातील आपली भूमिका? त्या उत्तरल्या महाराष्ट्रात महिला धोरण तयार करण्यात येत आहे त्यात तृतीय पंथीयाचाही सहभाग असावा असच आम्हा तृतीयपंथीयांची मागणी आहे. राज्य शासन त्याबाबत अनुकुल असून unicef च्या मदतीने आम्हाला यात आवश्यक मदत करण्याच्या शक्यतांवर ही बैठक होती. 'ओके डियर, आय गॉट लेट हा माझा नंबर घे आणि काही विचारायच असल्यास फोन कर' असं म्हणून ऑडीगाडीतून लक्ष्मी  निघून गेली.  मग मी ऑफीसमधे आलो आणि सर्वात आधी गुगलवर सर्च केल लक्ष्मी नारायण त्रिपाठी. तर भला मोठा परिचय समोर आला. लक्ष्मी नारायण त्रिपाठी हा ठाण्यातील एका उच्च्‍ाभ्रू कुटुंबात जन्मलेला पण नैसर्गिकरित्या आलेल वेगळपण. पण यावर मात करत आपल्या सारख्या देश-विदेशातील असंख्य सहका-यांसाठी लढा देणारा व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच नेतृत्व करणारा अर्थात करणारी लक्ष्मी. उत्तम नर्तकइंग्रजी- हिंदी व मराठीवर हुकमत असणारी, विविध संघटनांशी जुळलेली, चित्रपट, नाटकांमधे भूमिका वठवलेली, राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय वाहिन्यांनी जिच्या कामाची दखल घेतली. जिने व जिच्यावर पुस्तक लिहीली गेली त्याही पेक्षा जिला आदर्श ठेवून असंख्यांनी स्वत:ला सावरल अशी लक्ष्मी.  
       आज (दिनांक ९ जानेवारी २०१६ ) दिल्ली अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळयात वाणी प्रकाशनाच्या दालनात माझ्या हाती एक पुस्तक लागलं. त्याच नावं  मै हिजडा लक्ष्मी’  हे लक्ष्मी नारायण त्रिपाठीवरील आत्मचरित्रात्मक पुस्तक होत. या पुस्तकावर ओझरती नजर मारली तेव्हा लक्ष्मीसोबत झालेल्या भेटीची आठवण मनात तरळली
                 पुस्तकात लक्ष्मीचे लहानपनीचे तारूण्यातील व विविध आंदोलनातील सहभागांचे छायाचित्र दिसले. मग हळूच पुस्तकात डोकावल तेव्हा ओळ वाचण्यात आली , ‘ वयाच्या ७ व्या वर्षी माझे पहिल्यांदा शारीरिक शोषण झाले. नात्यातील एका लग्न समारंभात मी गेलो होतो. एका मुलाने माझ्या निरागसपणाचा फायदा घेत माझ्यावर जबरदस्ती केली. मग जेव्हाही त्या नातेवाईकांकडे जायचो तेव्हा हा प्रकार सतत होयी सतत ३ वर्ष हा अन्याय मी सहन करीत राहिलों. खूप वेदना होत होत्या. पण यातून सुटका करण्यासाठी स्वत:च धाडस करून विरोध केला. त्याचा परिणाम झाला. मग घरातल्यांनीही मोठया मनान माझ्या नैसर्गीक भावभावना व शरीरिची ठेवन लक्षात घेऊन मला मुला पेक्षा मुलगी म्हणून माझ्यात प्रबळ भावनांना वाट मोकळी करून दिली. यातून घडत गेलेली लक्ष्मी या पुस्तकात मांडली आहे.’
                लक्ष्मीशी भेट झाल्यानंतर तीने फोन नंबरही दिला. तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एखाद दिवशी भेटून तिच्या आंदोलनाविषयी, झुंजीविषयी जाणून घेण्याची इच्छा होती.  पण त्यानंतर लक्ष्मीची भेट झालीच नाही.
दिल्लीतील भेटीत समाजाने नाकारलेल्या अशा लोकांमधील सर्वोच्च प्रतिभेच्या व्यक्तीशी भेट झाल्याचा तो क्षण माझ समाजातील या प्रश्नाविषयी ज्ञानात भर घालून गेला. लक्ष्मीच्या निमित्ताने आता इथे एक अनुहत उल्लेख करावासावाटतो. १० फेब्रुवारी ते १० मार्च २०११ या कालावधीत केंद्र सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालयांतर्गंत कार्य करणा-या दिल्लीतील अशोक रोडवरील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित देशातील विविध राज्यांतील लोककलांतून मांडण्यात आलेला महाभारत महोत्सव’. या महोत्सवात मी महाराष्ट्रातील नारदिय किर्तन परंपरेचे दर्शन घडविणा-या चमुचा समन्वयक म्हणून काम पाहिल, तेव्हा या महोत्सवात सहभागी तामीळनाडूतील ५० तृतीय पंथींयाचा सहभाग असलेल्या चमुशी माझा परिचय झाला. यात सहभागी प्रत्येकाची वेगळी स्टोरी होती. पण मला माझ्या चमुच प्रतिनिधीत्व करताना आणि सोबतच माझा दैंनंदिन पत्रकारितेचा व्यवसाय सांभाळताना तृतीयपंथींयांच्या चमुशी संवाद साधण्याची फारशी संधी मिळाली नाही. मात्र काही प्रशासकीय बाबींसाठी मला माझ्या चमुचे प्रश्न सोडविताना या चमुलाही मदत करता आली त्यातच या चमुतील काहींशी संवाद करता आलाबहुतेक जण आपल्याकुटुंबापासून लांब राहतात पण कुटुंबाच्या वहनात मोलाची जबाबदारी पाळतात, त्यांना पोलीसांकडून व काही वेळा ग्राहकांकडून मारपीट होत असल्याचे ते सांगत होते. त्यांच्यात रूढ असलेली गुरु-शिष्य परंपरा, तामीळनाडू सरकारचे या लोकांसाठी शिथील असलेले शैक्षणीक धोरण व त्यांना देण्यात आलेल्या अन्य सोयीसुविधा परिणामी यातील बहुतेक लोकांनी पूर्ण केलेले पदवीपर्यंतचे शिक्षणसमाजाच्या मुख्यप्रवाहात येण्यासाठी त्यांची असलेली धडपड अशा विविध गोष्टी मला त्यांच्या सेाबतच्या संवादातून कळल्या.

                हा सर्व लेखन प्रपंच करत असताना, समाज म्हणून आपल असलेल वेगळपण. यात कुणाला आपली जाती, धर्म निम्न असल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना तर निसर्गानेच वेगळपण बहाल केलेल्या लक्ष्मी सारख्या असंख्य माणसांच वेगळपण नाकारणा-या समाजात आपण राहत असल्याचा व त्यात आपल्या वागण्याला किती मर्यादा असतात याची सारखी जाणीव होतेसमाजाने नाकारलेल्या पण ताठ मानेने जगणा-या लक्ष्मी सारख्या असंख्य माणसांना सलाम.  

Saturday, January 2, 2016

कॉमरेड तुम्हाला लाल सलाम. (श्री. ए.बी.बर्धन यांना भावपूर्ण श्रध्दांजली)

 

दिल्ली म्हणजे विविध क्षेत्रातील दिग्गजांची मांदीयाळी. या शहरात दिग्गजांना विविध जबाबदारी पाळताना किंवा आश्चर्यकारकपणे भेटण्याची संधी आली. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी हा लेखन प्रपंच.औचित्य भाारतीय कम्युनिष्ट पक्षाचे(भाकप) ज्येष्ठ नेते ए.बी. बर्धन यांचे दिनांक २ जानेवारी २०१६ या नविन वर्षाच्या प्रारंभीच रात्री ८.३० वाजता येथील जी.बी.पंत इस्पितळात दिर्घ आजाराने झालेले निधन.  महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत दिल्लीत कार्यरत आमच्या महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयाच्यावतीने आम्ही राज्यातील विविध विभागातील पत्रकारांसाठी दिल्ली अभ्यास दौ-याचे आयोजन करीत असू. आम्ही २०१३ पासून या आयोजनाला सुरुवात केली त्यातील हा सहावा पत्रकार दौरा  १५ ते २१ जानेवारी २०१४ या कालावधित आयोजित या पत्रकार दौ-याच्या दुस-या दिवशी आम्ही.  येथील 'आयटीओ' भागातील 'अजोय भवन' या इमारतीतस्थित असलेल्या भाकप च्या  मुख्यालयात भेटीसाठी गेलो. या पत्रकार दौ-यात सहभागी बहुतेक  पत्रकार है ज्येष्ठ असल्याने त्यांचा राजकीय व संघाटनात्मक बाबींचा दांडगा अभ्यास होता. त्यात ज्या नेत्याने महाराष्ट्रातून नागपूर येथूनच आपल्या राजकीय व संघटनात्मक कार्याला सुरुवात केली असे ज्येष्ठ भाकप नेते ए.बी.बर्धन यांना भेटण्यासाठी सर्वचजण उत्सुक होते. 
अभ्यासू, जनतेत मिसळून काम करणारे आणि प्रखर देशप्रेमी म्हणून देशातील  डाव्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ओळखले जातात. पक्षाचे राष्ट्रीय कार्यालय म्हटल्या नंतर प्रत्येकांनाच असे वाटले होते की फार मोठे कार्यालय असावे पण असे नव्हते. या इमारतीवरील सातवा माळा त्यावर अन्य कार्यालये आणि त्यात भाकपचे मुख्यालय असेच काहीसे‍ चित्र होते. त्यात एका रूमवर ए.बी.बर्धन्‍ा यांच्या नावाची पाटी झळकत होती. सिरस्त्याप्रमाणे आम्हाला पक्षकार्यालयातील बैठक सभागृहात बसविण्यात आले. सर्वजन आसनस्थ होत असतानाच ए.बी.बर्धन यांचा सभागृहात प्रवेश होतो आणि ते सर्वांना विचारतात 'कसा राहिला तुमचा महाराष्ट्र ते दिल्ली प्रवास? ' हा मराठी आवाज ऐकूनच उपस्थितांच्या चेह-यावर प्रेमळ व आपल्या माणसांसाठीचा भाव झळकत होता. 
मग प्रत्येकाने आपआपला परिचय दिला. ए.बी.नी अतिशय गांभीर्याने प्रत्येकाच्या परिचयातच त्या-त्या पत्रकाराच्या भागातील भाकप कार्यकर्त्यांच्या नावानीशी संघटनेच्या कामाबद्दलही हातोहात चौकशी केली. यातून त्यांच्या संघटनात्मक पकडीची झलक बघायला मिळाली. ए.बीं नी भाकपच्या विद्यार्थी विंगचे नेतृत्व केले व ते महाराष्ट्र विधानसभेतही निवडून गेले. त्यांनी पक्ष संघटनेत मोलाचे योगदान दिले. हाच कार्यकर्ता १९९२ मधे दिल्लीत जेथे देशाचे सत्ताकारण चालते त्या शहरात येतो पक्षाचा संघटक आज त्याच पक्षाच्या महासचिव या सर्वोच्च पदाची यशस्वी धुरा सांभाळतो हा ए.बीं चा राजकीय प्रवास त्यांच्याच शब्दातून ऐकताना प्रत्येकाला हा दुर्मीळ संवाद ऐकण्याचे भाग्य लाभले होते. ए.बीं नी देशातील भांडवलदार आणि राजकीय पक्षांमधे असलेले साटे लोटे त्यातून  घडणारे मोठाले स्कॅम पर्यायाने जनतेची होणारी पिडवणूक या सर्वबांबीवर अभ्यासूपूर्ण मांडणी केली. 
कम्युनिष्ट पक्षाची दिर्घकाळ सत्ता राहिलेल्या पश्चिम  बंगाल राज्यात जन्मलेले ए.बी. बर्धन यांनी महाराष्ट्रात येऊन सुरु केलेली राजकीय कारकीर्द. दिल्लीत येवून राष्ट्रीय राजकारणात त्यांनी सोडलेली छाप. आणि या संघर्षमय जिवनाचा  दिर्घ आजाराने दिल्लीतच झालेला अंत. बघताना समजून घेताना मोठया विचारक  व देशाच्या महान सूपूत्राला अभिवाद करताना शिर स्वाभीमाने उंचावते. कॉमरेड तुम्हाला लाल सलाम.         

Thursday, December 17, 2015

My Parents


Brief Introduction


         Hi, All. After long back I am posting video here. Actually this is 'Slide Show' of some selected photos of mine. You can easily see know about my  hobbies, social attachment and family attachment by this. back ground song which I have placed here has its own identity and my glorious memory attached with the song as well. That was Pune(Year 2006). Civilian used to experience Heavy rain every day. My first leg of Journalism education in University of  Pune. 'मेरे मन तू इतना बता ! किस और चला है तू ....'  Was very famous song in those days , if  you were tune in to FM Radio then you could only see that lovely song over there. So, I found my own shadow and stage of my mind was co related of that song.  

        Opening photo of  slide is talking about exercise which, help me to stay healthy. Shown ground in the photo is 'Hanuman Vyayam Prasarak Mandal' HVPM Amravati(Asia's renown institute,working in Physical Education). Girls were doing warm up and practice of Running , I went to them and ask for race they agreed and you know what miracle happened !  I won the race.( I used to participate, college level Running Competition). My visit to ‘ 'Tapovan’(Amravati, rehabilitation project for leprosy patient, Founded by Padmashree Shivajirao Patwardhan ) I talked with leprosy patient(their Family denies them Respectful living) .I  played with them. That was memorable experience for me. 
            Dancing scene in the slide is from Tribale Vilage of Melghat(Dist. Amravati) called 'Khirpani'. Since 2002 My attachment with villagers , which is still going on  and will be continued. My 'Sampradiyeek Awatar', I mean to say my appearance of traditional dress is talking about ‘Kiratn performing' which is my hobby . I took proper education of  'Kirtan performing art' also Performed near about 75 public program. I took opportunity to spread awareness about prevention of  Dowry, Illiteracy of our society. I found  Kirtan is an effective tool of communication. You can find my parents with me and one snap of mine in Aircraft(Aircraft snap was taken while I visited  National Udan Akademi – Pilot Training Centre at Fursoongi near Raibareli Uttarpradesh.)          

Saturday, December 12, 2015

महाराष्ट्राच्या गौरवाचा दिमाखदार सोहळा : शरद पवार यांचा अमृतमहोत्सव





केंद्र सरकारच्या विविध विभागांच्यावतीने देण्यात येणारे राष्ट्रीय पुरस्कार, सरकारच्या विविध राष्ट्रीय परिषदांच्या वार्तांकनासाठी दिल्लीतील विज्ञान भवनात जाण्याचा योग प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह दिल्लीत कार्यरत विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागात कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही येतो. या सर्वांनी संसद भवनापासून जवळपास दोन किलो मिटर अंतरावर मौलाना आझाद मार्गवरील याच विज्ञानभवनात नुकताच महाराष्ट्राच्या गौरवाचा दिमाखदार सोहळा अनुभवला. प्रसंग होता महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले, केंद्रात सलग १० वर्ष कृषीमंत्री पदाचा पदभार सांभाळणारे व भारतीय राजकारणात पाच दशके यशस्वी कारकीर्द गाजविणारे राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिमाखदार अमृतमहोत्सवी सोहळ्याचा. 

एरवी आपआपल्या पक्षाचा कार्यक्रम जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, पक्षाचे नेते, कार्यकर्ते हे पक्षाची भक्कम बाजू मांडतात तेव्हा इतर पक्षांवर सडकून टिका करताना दिसतात. मात्र, हेच दिग्गज आणि देशातील विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्ती एकत्र आणि अगदी कौटुंबि‍क समारंभात जमल्याचा हा दुर्मीळ सोहळा. मंचावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान आणि विविध राजकीय पक्षांचे प्रमुख. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या देशाच्या विविध भागातून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील दिग्गज आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहाच्या क्षमतेच्या तुलनेत ही संख्या जास्त असल्याने पद प्रतिष्ठा विसरून, मिळेल तिथे उभे राहून व रिकाम्या जागेत खालीच बसून हा कार्यक्रम डोळ्यात साठविणाऱ्यांची संख्याही मोठी होती. 

सभागृहात सायंकाळी ५.२५ वाजेपर्यंत मंचावरील खुर्च्यांवर मान्यवर आसनस्थ झाले. आता राष्ट्रपती महोदयांची प्रतिक्षा होती. आणि ठरलेल्या वेळेत चोख ५.३५ वाजता सभागृहात राष्ट्रपतींचे आगमन झाले, तोच उपस्थितांनी जागेवरच उभं राहत मानवंदना दिली. निवेदकाने राष्ट्रगीत होणार असल्याची घोषणा करताच सभागृहातील सर्वजण आपआपल्या जागी उभे राहिले. देशप्रेमाचे स्फुलींग जागविणाऱ्या राष्ट्रगीताने सभागृहाचे वातावरण भारावून गेले होते. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत काव्य पंक्तींतून शरद पवारांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आलेख मांडत उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. आता मंचावर उपस्थित राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमीत्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालु प्रसाद यादव, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी, माजी केंद्रीय मंत्री फारूख अब्दुला यांचे शरद पवारांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. 

                                                 ध्वनी चित्रफीत
यानंतर शरद पवार यांच्या बहुआयामी व्यक्तीत्वाचा वेध घेणारी व त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकणारी हिंदी भाषेतील पंधरा मिनीटांची ध्वनी चित्रफीत दाखविण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गडगडाटात यास दाद दिली. 
                                                 प्रकाशन सोहळा 
शरद पवार यांच्या जीवनावर आधारीत ‘गौरव ग्रंथ’, ‘ऑन माय टर्म’ आणि ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकांचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.  
                                                     सन्मान
राष्ट्रपतींच्या हस्ते शरद पवार यांचा स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी श्रीमती प्रतिभा पवार यांना स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ देवून सन्मान केला. निवेदकाने शरद पवार यांना या सुखद प्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली. 

याप्रसंगी शरद पवार मनोगतात म्हणाले,‘मी वयाच्या अठराव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. वयाची पंचाहत्तरी, राजकीय जीवनाचे पच्चावन वर्ष आणि संसदीय जीवनाचे ४९ वर्ष अशा सर्व प्रवासात जनतेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतो.’ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून संसदीय कामकाज व राजकीय शिष्टाचाराचे धडे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आजच्याप्रसंगी आई-वडीलांची आठवण होत असल्याचा उल्लेख करीत त्यांच्याकडून शिक्षण प्रसार, सहकार आणि राजकीय क्षेत्राचे बाळकडू मिळाले असे ते म्हणाले. पंधरा मिनीटांच्या आपल्या मनोगतात त्यांनी यावेळी विविध आठवणींना उजाळा दिला. 

या कार्यक्रमात मान्यवरांची उद्बोधक भाषणे झाली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या, ‘शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात विविध पक्षांचे नेते एका मंचावर उपस्थित असल्याचे चित्रच त्यांच्या अजातशत्रु व्यक्तीमत्वाचा परिचय देणारी आहे.’ पवारांशी माझा स्नेह गेल्या दोन दशकांपासून असल्याचे सांगत, देशातील तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन वाढवून त्यांची निर्यात करण्याच्याकामी पवारांनी मोलाचे योगदान दिल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे असेही त्यांनी सांगितले. 

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह म्हणाले, ‘शरद पवारांनी देशाला सृजनात्मक योगदान दिले.’ महाराष्ट्रासह देशाच्या सहकार, कृषी, उद्योग व सामाजिक क्षेत्रात पवारांनी महत्वपूर्ण कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. ७० च्या दशकात यशवंतराव चव्हाण देशाचे वित्तमंत्री असताना त्यांच्या आर्थिक सल्लागारपदी आपण होतो तेव्हा शरद पवारांशी पहिली भेट झाल्याचे ते म्हणाले. त्यानंतर ८० च्या दशकात आपण आरबीआयच्या गव्हर्नर पदी नियुक्त झाल्यापासून ते माझ्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीपर्यंत पवारांचा सहवास लाभल्याचेही त्यांनी सांगितले. ‘तूम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार’ अशा शब्दात त्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या. 

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी, ‘शरद पवार हे एक अष्टपैलू राजकारणी आहेत’अशा शब्दात पवरांचा गौरव केला. कृषीमंत्री म्हणून पवारांना राज्यसभेत सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पवारांनी नेहमी संयत भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, शरद पवार यांचा मूळ पिंड हा रचनात्मक आहे. त्यामुळेच ते राजकारणातही रचनात्मक काम करू शकले. देशाच्या राजकारणात सतत पाच दशक वावर असणारे पवारांचे आयुष्य देशसेवेसाठी पूर्णपणे समर्पित राहीले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार आणि राजकारणात संतुलन राखले आहे. पवारांबरोबरील इस्त्राईल देशाच्या दौऱ्यातील काही प्रसंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी राज्यातील शेतीच्या विकासाची पाहणी करून कपाशी सोबतच गहू उत्पादनाचा दिलेला सल्ला आदी आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. 

‘भारताला जागतिकस्तरावर अन्न-धान्यात निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे.’ अशा शब्दात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पवार यांचा गौरव केला. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग १० वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. ९० च्या दशकात महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर अंडरवर्ल्डचे सावट होते याच काळात या शहरात बॉम्ब स्फोट झाले. अशा वाईट अवस्थेत पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सक्षम नेतृत्च दिले. कठोर व अचूक निर्णय घेत मुंबईतून अंडरवर्ल्डचा नि:पात केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना ‘सलाम बॉम्बे आणि सलाम पवार म्हणने’ औचित्याचे ठरेल, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांचा गौरव करत त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांच्या टाळ्यांचा गडगडाट आणि कार्यकर्त्यांच्या उद्घोषणा याने विज्ञानभवन दुमदूमून गेले.

सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांचे आभार मानतांना शरद पवारांनी देशाला दिलेल्या योगदानाचे अनन्य साधारण महत्व असल्याचे सांगितले. एक मुलगी आणि जबाबदार लोक प्रतिनिधी या नात्याने मी पवार साहेबांकडून सतत शिकत आले व शिकत राहीन असे सांगून वडीलांच्या खांद्याला खांदा लावत त्यांना साथ देणाऱ्या आई प्रतिभा पवार यांच्या उदारतेचे कौतुक त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित देशातील सर्वोच्च पदस्थ महानुभाव आणि शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या तमाम मान्यवर व नेत्यांचे त्यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सभागृहात उपस्थित सर्वच मान्यवर मंचा शेजारी उपस्थित महाराष्ट्राच्या व देशाच्या या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देत होतं आणि विज्ञान भवनही आपल्या कारकिर्दीतला महाराष्ट्राच्या गौरवाचा हा दिमाखदार सोहळा आपल्या स्वर्णीम आठवणीच्या कप्यात जपून ठेवत होता. 

-रितेश मोतीरामजी भुयार 
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली. 











महाराष्ट्र विधानमंडल बना ऑनलाईन प्रश्न स्वीकारणे वाला - देश का पहला विधानमंडल




           
                          
 देश में कई अच्छी योजना तथा पहल देने में महाराष्ट्र की अहम भूमिका रही है. रोजगार गारंटी स्कीम, सूचना का अधिकार आदी महत्वपूर्ण योजना इस कडी में अहम है. इसी कडी को बरकरार रखते हुए महाराष्ट्र विधानमंडल ने आधुनिक तकनिक को अपनाकर अधिवेशन के दौरान सदस्योंद्वारा ऑनलाईन प्रश्न स्वीकारना शुरु किया है. इसी के साथ ऐसी पहल करने वाला महाराष्ट्र देश का पहला राज्य बन गया है.

         राज्य की उपराजधानी नागपूर में महाराष्ट्र विधानमंडल का शितकालीन अधिवेशन प्रारंभ हुआ  है(दिनांक ७ दिसंबर २०१५ से). इस अधिवेशन से ही विधानमंडल  के निचले विधानसभा तथा वरिष्ठ सदन विधानपरिषद के सदस्योंद्वारा ऑनलाईन प्रश्न देने की पहल का क्रियान्वयन शुरु हुआ है. इसकी आधिकारीक घोषणा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागले तथा विधान परिषद सभापती रामराजे निबांलकर नाईक ने की.

 जनप्रतिनिधीयों द्वारा सदन में जनहीत के प्रश्न पुछे जाते है, जो अभी तक लिखित स्वरूप में उठाए जाते थे. लेकिन अब उल्लेखनीय सूचना, प्रस्ताव आदी लोकतंत्र के आयुधों का ऑनलाईन तरीके से प्रयोग किया जा रहा है. अधिवेशन के शुरूआत में ही सदस्योंद्वारा ४० प्रतिशत प्रश्न, प्रस्ताव ऑनलाईन तरीके से पुछे गए है. सदस्योंद्वारा इस पहल को अच्छा सहयोग मिल रहा है. नतिजन ज्यादातर सदस्यों ने लिखित प्रश्नों के बजाय ऑनलाईन प्रश्न पुछने को तवज्जो देने की बात सामने आयी है. महाराष्ट्र के इस पहल के साथ ही देश के अन्य राज्य भी इस दिशा में कदम बढाने की अपेक्षा जतायी जा रही है.   

                                                    ०००००