मंगेश पाडगांवकरांच्या रचनांनी मला शालेय
जीवनापासूनच वेड लावल होत. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’
या
गीताच्या प्रेमात पडून मला गायन शिकण्याची अतीव इच्छा झाली. या नंतर
पाडगांवकरांच्या ब-याच रचना त्यातील भाव आणि प्रतीक ही वयानुसार आणि अनुभवानुसार
आणखी खास समजायला लागली आणि त्यांच्या काव्यातील माधुर्य आणख्रीच भावू लागल.
पाडगांवकराचं गीत त्याला यशवंत देवांचं
संगीत आणि अरूण दाते यांचा स्वरसाज चढलेल्या अनेक गीतांनी मराठी रसीकां प्रमाणेच
माझ्या मनावरही गारूड केल. ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘भातकुलीच्या
खेळामधली राजा आणिक राणी’,‘ अखेरचे येतील
माझ्या तेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रिती’ , ‘दिवस तुझे हे फुलायचे झोपाडया वाचून
झुलायचे’ हे मला त्याकाळी आणि आजही भावलेली गीते.
याच गीतांना त्याच
दिग्गजांकडून ऐकण्याची अनोखी संधी मला लाभली आणि तीही दिल्लीत हे माझ महदभाग्य.
दिल्लीतील
वास्तव्यात ज्या दिग्गजांना जवळून बघण्याची ऐकण्याची सधी मिळाली त्यात अरूण दाते.
येथील
‘कमानी सभागृहात’ गणेशोत्सवकाळात दाते यांच्या मैफलीचे
आयोजन करण्यात आले होते. वार्ध्यक्याने त्यांचा आवाज क्षिण झाला होता
मात्र पाडगांवकरांचा भाव रसिकांपर्यंत पोचवण्यात ते कमालीचे यशस्वी झाले. (गावाकडे
परतवाडा येथे आयोजित कार्यक्रमात अरूण दातेंना ऐकण्याची संधी मिळाली त्यात अगदी
टापटीप गायन मनाला भिडून गेले होते).यावेळी पाडगांवकरांच निवेदन असत तर आणखी
मजा आली असती अस सारख वाटत होत. हे चित्र बघण्याच स्वप्न तर पूर्ण झाल
नाही. मात्र, पाडगांवकरांच्या काव्यावर आधारीत आणि स्वत:
पाडगांवकरांनी सादर केलेल्या कविता व सोबत त्यांची मुलाखत अशी मेजवाणी गणेशोत्सव
काळातच ‘श्रीराम सेंटर’ या दिल्लीतील सभागहात मिळाल.
या कार्यक्रमात
काव्य निर्मितीचा एक प्रसंग जो स्वत: पाडगांवकरांनी सांगितला होता तो कायम स्मरणात
राहणारा आणि पाडगांवकरांविषयी आठवण म्हणून हदयाच्या कप्प्यात कायम जपावा असा क्षण.
‘ दिवस
तूझे हे फुलायचे’ या गीताच्या निर्मितीबाबत सांगताना पाडगांवकर
म्हणाले होते, या गीताच्या शेवटचे कडवे मला बदलवावे लागले. त्याचे झाले
असे, “ माझा मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला, बाबा या गीतातील शेवटच कडव जरा
अश्लील वाटते. हे ऐकूण मी ताडकण उडालो आणि त्याला विचारल , ते
कस?. मुलगा म्हणाला,’माझ्या ग घ्रराच्या पाशी तू थांब नागडे
जराशी’ अशी ही ओळ झाली आहे. मुलाचं म्हणन मला पटल आणि मी ते वाक्य सुट
केल माझ्या ग घराच्या पाशी तू थांब ना गडे जराशी अस केल आणि हे गीत गातांना
गायकांनीही याबाबत काळजी घेण्यास सांगितले. हा किस्सा
ऐकूण सभागहात एकच हशा पिकला. पण गीत निर्मिती प्रक्रियेत पाडगांवकर
किती चौकस असत याचा अनुभव आला. लहाणग्यांसाठी लिहीलेल सांगसांग भोलानाथ
हे बालगीत असो. याशिवाय
प्रेम गीत विरह गीत , राजकीय व सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा त्यांचा उदासबोध
हा काव्य संग्रह असो किंवा कबीरांच्या दोहयांचा त्यांनी केलेला भावानुवाद असो
पाडगांवकरांच्या सच्च्या व कलंदर कवी व्यक्तीत्वाच्या छटा त्यातून दिसून येतात.
जरी
हा कलंदर कवी आपल्यातून गेला असला तरी त्यांच्या काव्याच्या माध्यमातून ते चिरकाल
आपल्यात राहतील हयाच भावना त्यांना आदरांजली वाहताना उदधृत होतात.

No comments:
Post a Comment