Friday, July 9, 2021
व्यंकटेश माडगूळकर
व्यंकटेश माडगूळकर.
श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार .
६ जुलै १९२७ रोजी सांगली जिल्हयातील माडगूळ येथे त्यांचा जन्म झाला .
माडगूळकर यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नसले तरी त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला .
आरंभीच्या काळात पत्रकारिता केल्यानंतर १९५० च्या सुमारास ते मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले.
१९४९ मध्ये ‘माणदेशी माणसं’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिध्द झाला .
‘गावाकडच्या गोष्टी’, ‘हस्ताचा पाऊस’, ‘सीताराम एकनाथ’, ‘काळी आई’, ‘जांभळाचे दिवस’ आदी त्यांचे ग्रामीण कथासंग्रह प्रसिध्द आहेत
त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जगातिक भाषांत झालेले आहेत .
‘बनगरवाडी’, ‘वावटळ’, ‘पुढचं पाऊल’, ‘कोवळे दिवस’, ‘करूणाष्टक’ आणि ‘सत्तांतर’ या त्यांच्या ग्रामीण कादंबऱ्याही उल्लेखनीय ठरल्या
‘करूणाष्टक’, ‘वावटळ’ आणि ‘कोवळे दिवस’ या त्यांच्या आत्मचरित्रपर कादंबऱ्या प्रसिध्द आहेत.
‘तू वेडा कुंभार’, ‘सती’, ‘पति गेले गं काठेवाडी’ आदी त्यांनी लिहिलेली उल्लेखनीय नाटके होत.
‘सांगत्ये ऐका’, ‘पुढचं पाऊल’, ‘वंशाचा दिवा’, ‘जशास तसे’, ‘रंगपंचमी’ आदी मराठी चित्रपटांच्या कथा व पटकथा त्यांनी लिहिल्या
‘बिनबियांचे झाड’ आणि ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ ही त्यांनी लिहीलेली लोकनाटयेही गाजली.
‘चित्रे आणि चरित्रे’ ,‘नागझिरा’, ‘पांढरी मेंढरे हिरवी कुरणे’, ‘पांढऱ्यावर काळे’, ‘रानमेवा’ ही त्यांची ललित गद्य पर पुस्तके प्रसिध्द आहेत
१९५५ ते १९८५ अशा दीर्घ कालावधिसाठी त्यांनी आकाशवाणीत नोकरी केली.
चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती होती ,त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिध्द आहेत.
‘गावाकडील गोष्टी’, ‘काळी आई’ या कथासंग्रहास, ‘बनगरवाडी’ या कादंबरीस आणि ‘सती’ ही नाट्यकृती आदींना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले .
‘सत्तांतर’ या त्यांच्या कादंबरीस १९८३ मध्ये साहित्य आकदमी पुरस्कार प्राप्त झाला .
१९८३ मध्ये अंबेजोगाई येथे भरलेल्या ‘मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी भूषविले .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment