राजधानी दिल्लीत आलो. राजकीय पत्रकारितेतील बर्याच बारिक सारिक गोष्टींचा
गुंता आणि त्यातून जन्माला येणारी बातमी अस सर्व जाळ समजून घेत असतानाच दिल्लीत
मराठी माणूस देशातील दुसर्या क्रमांकाचा राजकीय पक्ष असणार्या पक्षाचा अध्यक्ष होतो
आणि नंतर केंद्रात मंत्री होतो. ती मराठी व्यक्ती आहे नितीन गडकरी. दिल्लीत
त्यांनी दोन मोठया पदाचा पदभार स्वीकारतानाचा मी साक्षीदार आहे. आज मी पाहिलेल्या
गडकरींबदृल लिहाव अस वाटल आणि हा लेखन प्रपंच.
वर्ष 2009 सायंकाळची वेळ
साधारणत: नोव्हेंबरचा महिना भाजपचे मुख्यालय 11, अशोक रोडलाच लागून असलेले अरूण
जेटली यांचे 9 , अशोक रोड वरिल निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांसोबत
भाजपच्या नेत्यांच्या खलबती सुरु होत्या. सर्वांना या बैठकीत काय चर्चा सुरु असेल
याची चुणुक लागली होती. बराच वेळ लोटल्यानंतर सायंकाळच्या वेळेस रामलाल हे भाजपचे
तत्कालीन खजीनदार आणि संघाचे विश्वासू बाहेर आले त्यांच्या पाठोपाठ एक व्यक्ति
बाहेर आली. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली ‘भाजपचे अध्यक्ष म्हणून तूमच नाव पुढे येत आहे’ त्यावर उत्तर होत ‘मै पार्टी का एक मामुली कार्यकर्ता हू दिवारों पर
पोस्टर चिपाकाने का काम करते करते पार्टी में आगे बडा महाराष्ट्र में pwd मंत्री के तौर पे काम करने का मौका मिला. नाही
मै इस से पहले कभी ज्यादा दिल्ली में आया हू . तो मुझे दिल्ली की आदत नही है. ना
मुझे यहा की राजनिती से ज्यादा ताल्लूक रहा.’ त्यांच्या या उत्तराने ते भाजपचे अध्यक्ष होतील आणि
ते यशस्वीपणे आपला कार्यकाळ पार पाडून दिल्लीवर छाप सोडतील अस वाटलही नव्हत. पण
बातमी लिहायची होती म्हणून दिसत्या परिस्थितीवर बातमी लिहीली.
पुढे डिसेंबर 2009 मध्ये
भाजपचे अध्यक्ष म्हणून नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यांनी 9, अशोक
रोड वर पत्रकारांसमोर केलेले वक्तव्य सतत 3 वर्ष देशभरातील विविध भाषणातून ऐकायला
मिळाले. पत्रकारांकडून त्यांच्यावर होत असलेली शेरेबाजी अण पक्ष मुख्यालयातील
कर्मचारी नेत्यांचा आडमुठेपणाचे वागणे नी बोलणे मी स्वत: बघीतले होते, पण गडकरींनी
आपल्या कतृत्वातून या सर्वांची तोंड बंद केली. त्यांच्या कार्यकाळात भाजपात अनेक प्रकोष्ठ (सेल)
सुरु केलेत त्यांनी पक्षातील तज्ज्ञ नेत्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घेत काँग्रेस
प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार विरोधात 2-जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोलगेट
घोटाळा आदींसह विविध घोटाळयांची माहिती बाहेर काढून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका
बजावण्यासाठी गतीमान केले. तर दुसरीकडे भाजप पक्षसंघटनेत नवी उर्जा निर्माण केली.
त्याचे सुपरिणाम पक्षाला मिळालेच आणि देशानेही बघीतले त्यामुळे केवळ महाराष्ट्रात
ओळख असणारे गडकरी हे खर्या अर्थाने राष्ट्रीय नेते झाले.
गडकरींचे स्थान भाजपमध्ये
कमालीचे वाढले पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतही ते आता महत्वाची भूमिका बजावू लागले.
वर्ष 2014 मध्ये पक्षाने त्यांना नागपूर या गृह जिल्हयातून खासदारकीची उमेदवारी
दिली आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ त्यांनी सर करत 2 लाख
मताधिक्याने विजय मिळवला. आता केंद्रात भाजपला 282 च्या जादुयी आकडयाच्या
मताधिक्याने भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर
आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निर्माण झालेल्या मंत्रिमंडळात गडकरी मंत्री
झाले. खात मिळाल दळणवळण, नवनवन व राजमार्ग मंत्रालाय.
त्यांनी भाजपच्या अध्यक्षपदाचा
आणि आता केंद्रीय मंत्री पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा एक साम्य मी अनुभवले. ते
म्हणजे ‘गडकरींची अर्धांगिणी
कांचनताई गडकरी आणि मुलगी केतकी हया यावेळी आवर्जून उपस्थित असणं’, नी, ‘गडकरींच मीशन ईगव्हर्नन्स राबवू आणि पारदर्शी कारभार
करू’ हे ठाम व तितकचं
आत्मविश्वासानं प्रसार माध्यमां समोर प्रतिपादन करणं Hats up गडकरी जी.


++Ritesh+Bhuyar+One+Page+scan++30.10.2013.jpg)
