Thursday, July 23, 2020

घनकचरा मुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल




(स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनात महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरांचा समावेश असल्याचा एक निकाल आला आहे काल कृपया याबाबत सविस्तर लेख दयावा असा आमचे सहकारी व लोकराज्य मासिकाचे उपसंपादक राजाराम देवकर यांचा एक संदेश मिळाला मग काय याविषयाचा माग घेतला आणि केंद्रीय मंत्री महोदयांच्या काही ट्विट वरून चक्क बातमी तयार झाली व तो लेखही लोकराज्यच्या जून २०२० अंकामध्ये प्रकाशित झाला )



वृत्त विशेष 63                                                                                 दिनांक 20 मे 2020 




          घनकचरा मुक्त शहरांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल
                   राज्यातील ७६ शहरांना तारांकित मानांकनाचा बहुमान

नवी दिल्ली, 20 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशातील १४१ शहरांना तारांकित मानांकन मिळाले असून एकटया महाराष्ट्रातील ७६ शहरांचा यात समावेश आहेनवी मुंबई महानगरपालिकेला पंचारांकित तर ३४ शहरांना तीन आणि ४१ शहरांना एक तारांकित शहराचा बहुमान मिळाला आहे.
केंद्र शासनाच्या नागरीविकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मुलन मंत्रालयाकडून देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१८ पासून कचारामुक्त शहरांना विविध मानकांच्या आधारावरील चाचण्यानंतर तारांकित शहरांचा बहुमान मिळतो केंद्रीय नागरीविकास ,गृहनिर्माण व गरीबी उन्मूलन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांनी मंगळवारी वर्ष २०१९-२० साठी निवडण्यात आलेल्या कचरामुक्त तारांकित शहारांचा निकाल जाहीर केला. विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनासाठी देशभरातील ४ हजार ३७२ शहरांपैकी १४३५ शहरांनी आवेदन पाठविली होती यापैकी डिजीटल एमआयएस चाचणीत ६९८ शहर बाद ठरलीउर्वरीत ७३७ शहरांमध्ये नागरीकांचे मत व मंत्रालयाच्या अधिका-यांकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्यांची एकूण २० मानकांआधारे चाचणी करून अंतिम १४१ शहरांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातील ७६ शहरांनी बाजी मारली आहेदेशातील ६ शहरांना पंचारांकित मानांकन देण्यात आले असून यात नवी मुंबई महानगर पालिकेने बहुमान मिळविला आहे. देशातील ६५ शहरांना तीन तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील ३४ शहरांचा यात समावेश आहेदेशभरातील ७० शहरांना एक तारांकित शहरांचा मान मिळाला असून राज्यातील  ४१ शहरांचा यात समावेश आहे.
स्वच्छभारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील  महानगरपालिका ,नगर पालिका खालील प्रमाणे.
पंचारांकित मानांकन
   नवी मुंबई महानगर पालिका
तीन तारांकित मानांकन
अंबरनाथ,भिवंडी निजामपूरब्रह्मपुरी,चंद्रपूर, देवळाळी प्रवरा, धुळे, गड‍हिंगलजइंदापूर,जळगावजालनाजेजुरीजुन्नरकागल, क-हाड, खेड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, माथेरान, मौदा, मिराभाईंदर, मुर्गुड, नरखेड, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, आसवड, शिर्डी ,तासगाव, ठाणे, वडगाव, वेंगुर्ला आणि  विटा
एक तारांकित मानांकन
अहमदनगर, अकोला, अंजनगाव सुर्जी, आष्टा, बल्लारपूर, बार्शी, भगूर, दौंड, गेवराई,  जामनेर, जव्हार, कल्याण-डोंबिवली, खानापूर, खापा, खोपोली, कुळगाव-बदलापूरकुरुंदवड, महाड,  मलकापूर, मंगळवेढे, मुरबाड, नागभीड, नाशिक, पैठण, पनवेल, पेण, फुलंब्री, राजुरा, रामटेक, रावेर, सेलू, संगमनेर, शहादा, शेंदूरजनाघाट, शिरपूर-वरवाडे,  उरन, इस्लामपूर, विजापूर, वरणगाव, वसई-विरार आणि वाळूज.
    राज्य शासनाने घनकचरा स्ववस्थापनाबाबत आखलेले ठोस धोरण आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे स्वच्छभारत अभियानांतर्गत घनकचरामुक्त शहरांमध्ये देशात आपले  वर्चस्व निर्माण केले आहे.   
स्वच्छ सर्वेक्षणासाठी देण्यात येणा-या एकूण गुणांपैकी २५ टक्के म्हणजे ६००० पैकी १५०० गुण हे केवळ कचरामुक्तीसाठी देण्यात येत असल्याने तारांकित मानकांला विशेष महत्व असून यात महाराष्ट्राची सरसी पाहता येत्या काळात स्वच्छ सर्वेक्षण निकालातही महाराष्ट्र अग्रेसर ठरू शकतो.
              आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic
                                                            00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.63 /दि.20.05.2020











                                                                      





No comments:

Post a Comment