आयुष्याच्या एका वळणावर काही गोष्टींचे सिंहावलोकन करताना आपल्याला
आपल्याच काही गोष्टींचा हेवा वाटतो. असाच हा प्रसंग. माझे थोरले बंधू मनिष भुयार
यांनी कालच वॉटसअप वर मला माझा लहानपणचा फोटो व माझ्या आयुष्यात लिहीलेल पहिल पत्र
मला पाठवल.
माझ गाव माझ कुटुंब सोडून मी मामाकडे
आलो. महात्मा फुले माध्यमिकशाळा विहीगाव येथे सहावीत प्रवेश घेतला. एवढया लहान
वयात घरापासून लांब राहण्याचा हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग (तेव्हा पासून
शिक्षण आणि आता नौकरी निमित्त अजूनही घरा पासून लांबच राहतोय). पहिले वहिले पत्र
आणि तेही आईला लिहीलेले. 12 वर्षांचा असेल तेव्हा जेमतेम. आयुष्याचा हा पट एकदम
मागे घेऊन जाताना थेट मला सहावीत घेवून जातो.
घरचं मोकळपण सोडून मामांकडे शिस्तीत राहणं माझ्यातील बालसुलभ मनाला
थोड अवघडच गेल. आजोडी मला जरी आजी व मामा- मामींकडून खूप प्रेम मिळाल चांगली वागणूक मिळाली तरी त्या वयात आईपासून लांब राहण
मला फार अवघड गेल. तोच भाव या पत्रातून प्रखरतेने जाणवतो. ‘आई तुझी खूप आठवण येते.
पण काय करू देवाने मला पंख सुध्दा दिले नाही.’ हे वाक्य माझ्या मनातील त्यावेळची
स्थिती दर्शविते. माझे मामा शामसुंदर पोटदुखे यांनी सुंदर अक्षरात या पत्रात माझ्या
घरचा पत्ता लिहून दिला. यावयात व पुढेही मामांचं सतत प्रोत्साहणच माझ्या व्यक्तीमत्वाला आकार देत गेल. आजही हा प्रवास
सुरु आहे. आपल्यामुळाकडे वळून पाहताना खूप गहीवरून येत असाच हा अनुभव.



No comments:
Post a Comment