Monday, June 11, 2018

दिल्ली,अनुवाद आणि मी



देशाच्या राजधानीत करीअर करण्याचा घेतलेला निर्णय आणि तो प्रत्यक्षात नेण्यासाठी मला माझ्यातील ज्या गुणाची सर्वात ज्यास्त मदत झाली असेल तर तो म्हणजे अनुवाद. एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला.’ या संत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या ओळी माझ्यातील अनुवाद कलेसाठी चफकल लागू पडतात. मी काही अनुवादाचं शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतल नाही. मात्र, दिल्लीत जगण्यासाठी संघर्षाच्या काळात पोटाचीखळगी भरण्यासाठी अनुवाद क्षेत्रात उडी घेतली. मराठी भाषेतून हिंदी व हिंदीतून मराठी व पुढे पुढे चक्क मराठीतून इंग्रजी अनुवाद करण्याची कला मी आत्मसात केली. चांगलाच आत्मविश्वास निर्माण झाला. आता हिंदी, मराठी व इंग्रजी या तिनही भाषा संवादाचं माध्यम असून, त्यात आपल्याला लिलया व्यक्त होता येते हा आत्मविश्वास आलाय.



पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येणा-या प्राथिमीकीपासून(एफआयआर)सुरुवात झालेल्या माझ्या अनुवाद कार्यात अनेक यशाची पाने लिहीली गेली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नाशिक येथील व्याख्यानावर आधारित समन्वय का आधार या ३० पानी पुस्तकाचे समन्वयाचा आधार हे पुस्तक अनुवादित केले. दिल्लीतील नामांकीत प्रभात प्रकाशनासाठी दिवंगत राज्यसभा खासदार बाळ आपटे यांचा जीवनपट उलगडून दाखविणारे २५० पानांचे मराठी  पुस्तक हिंदी भाषेत अनुवादीत केले त्यासाठी प्रकाशकाने २५ हजार रूपये मानधन दिले. मात्र, त्यांना अनुवादाची क्रेडीट लाईन मागितली होती ती दिली किंवा नाही ते बघायला मिळाले नाही. (हे पुस्तक अनुवादाचे खूप मोठे काम असल्याने व वेळेत दयावयाचे असल्याने माझे मित्र अजित पाटील व मैत्रिण प्रियंका गौतम यांनीही काही पाने हिंदीत अनुवादीत करून दिली होती.). गोईंग टू स्कुलया शिक्षण क्षेत्रात कार्य करणा-या व युनेस्को सोबत जुळलेल्या संस्थेच्या विदर्भातील प्रशिक्षण कार्यावर आधारीत डिव्हीडी कॅसेटचे ट्रान्सक्रिप्शन कार्य, तसेच दिल्ली आयआयटी भागात कार्यरत एक एनजीओ जी युनेस्कोसोबत जुळलेली असून पहिली ते चौथीच्या मुलांसाठी पाठयपुस्तके तयार करते या संस्थेने तयार केलेल्या १४ पुस्तकांचे अंतिम संपादन कार्य करण्याचा अनुभव ठसठसीतपणे आजही आठवणीत आहे.
                 श्रीमान सुशीलकुमार शिंदे साहेबांसाठी अनुवाद कार्य
माझ्या उमेदिच्या काळात दिल्लीतील २ कृष्णमेनन मार्ग या तत्कालीन केंद्रीय उर्जा मंत्री व पुढे केंद्रीय गृह मंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांचे निवासस्थान म्हणजे माझ्यातील अनुवादकासाठी एक आधारवडच जणू. साहेबांच्या बंगल्यावर मी कित्तेकदा हक्काने जायचो. येथील खास महाराष्ट्रीय खानसामा व त्याच्या हातची चविष्ट कॉफी कायम स्मरणात राहील या माध्यमातून. श्री. शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या भाषणांचे (इंग्रजी, हिंदी व मराठी) संपादन व कंपायलेशन करण्याचा अनुभवही आनंददायी आहे. याशिवाय शिंदे साहेबांच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना शुभेच्छा पत्र लिहीने हा अनुभवही स्मरणीय आहे. शिंदे साहेबांवर एक डॉक्युमेंटरी तयार झालेली त्यासाठी इती पासून ते अथ पर्यंत संपूर्ण संशोधन व लिखानाचे कार्य व सोबतच मराठी व हिंदीतील स्क्रीप्ट लिखानाचे कार्यही केले हा खूप छान अनुभव होता. या ठिकाणी श्री. शिंदे साहेबांच्या विश्वासातील त्यांचे निकटवर्तीय व असीस्टंट पर्सनल सेक्रेटरी श्री. सोमनाथ घोलप यांच्यासोबत हे सर्व अनुवाद व संपादनाचे कार्य मी पार पाडले हे ही नम्रपणे वर्णन करावेसे वाटते.





याशिवाय दिल्लीत एलआयशी व  ग्राहक हक्क न्यायालयात फाइल होणा-या विविध केसेस साठी मराठीतून हिंदी व इंग्रजीत मोठया प्रमाणात अनुवाद केला. माझ्या अनुवादाचा दर सन २००८ ते आज तागायत स्थिर आहे तो म्हणजे मराठीतून हिंदी अनुवादासाठी प्रती पानाचा दर १५० रूपये व इंग्रजी अनुवादाचा दर २०० रूपये. हा दर कायम ठेवण्याचा हेतु हा ही की दिल्ली सारख्या शहरात लोकांना अनुवादाच्या रूपाने मदत करता यावी म्हणजे माझ्यातील अनुवादकाला मी कमी व्यावसायीक व ज्यास्त सामाजिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
पार्श्वनाथ बिल्डर्स या दिल्लीतील नामांकित संस्थेने अहमदनगर जिल्हयात शिर्डी भागात जमीन खरेदी केली होती. हे खरेदी विक्रीचे सर्व कागदपत्र मराठीत होते व या संस्थेला सर्व कागदपत्र इंग्रजीत करून घ्यायचे होते जवळपास ८० कागदपत्र मी इंग्रजीत अनुवादीत करून दिले, अनुवादाचा दर होता २०० प्रत्येक पान.  अशाच दिल्लीतील एका कॉर्पोरेट कंपनीसाठी फार मोठे काम मी हाती घेतले या कामावर मला स्वत:चा लॉपटॉप घ्यायचा होता, हे ध्येय समोर ठेवून अक्षरष: रात्र रात्र भर काम केल व या कंपनीसाठी केलेल्या कामातून मी फास्ट ट्रॅकची एक मनगटी घडयाळ( किंमत १८०० रूपये) जी अजूनही मी वापरतो, ४ हजारांचा एक नोकिया  फोन व ३५ हजारांचा लॅपटॉप खरेदी केला होता.
           एनसीटीईच्या वतीने स्थापित आयोगावर भाषा सल्लागार म्हणून कार्य
दिल्लीतील आयटीओ भागात राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद’ (एनसीटीई) चे कार्यालय आहे. या कार्यालयातून मला फोन आला, मग काय मी प्रत्यक्ष भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्ही देशभरातील डीएड व  बिएड विद्यालयांच्या इमारती उभारणीत झालेल्या घोळाचा आढावा घेण्यासाठी देशव्यापी आयोग स्थापन केला आहे. त्याचे अध्यक्ष हे सार्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश श्री. कृष्णा आहेत. देशभरातील जवळपास ६ सीईआरटीचे अध्यक्ष या समितीचे सदस्य होते महाराष्ट्रातील डीएडबीएड महाविद्यालयांच्या जमीन व्यवहारातील घोळाबाबत अचूक माहिती शोधण्यासाठी आम्हाला मराठी भाषा सल्लागार म्हणून तुमची मदत हवी आहे. असे या संस्थेतील वरिष्ठ अधिका-यांनी विनंती केल्यानंतर या कामासाठी मी ही होकार दिला. मग या समितीचे सदस्य मला महाराष्ट्रातील विविध डिएड’, बिएड विद्यायलयांचे खरेदी खत दाखवत त्याबाबत मी त्यांना मराठीतून हिंदी व इंग्रजीत विषय समजावून सांगत असे त्यानुसार ही मंडळी आपसात खलबत करून आप-आपला अहवाल तयार करीत असत. या कामासाठी दररोज ६ तासाच्या कामासाठी २५०० रूपये येण्या-जाण्याचा खर्च दुपारचे जेवन व दोन वेळ हाय टी देण्यात येत असे. केवळ भाषा ज्ञानाच्या जोरावर मला एवढं मोठ कार्य करता आलं. हे कार्य जवळपास ५ दिवस चालले. याकाळात देशातील एससीईआरटीच्या वरिष्ठ अधिका-यांसोबात व सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांसोबत चर्चा व खलबतांचा अनुभव मला समृध्द करून गेला.
                                दोन दिवसांचा निवासी अनुवाद
        दिल्लीतील एका व्यक्तीचा मुलगा जळगावला शिकायला होता, तिथे त्याला अफिम पिण्याच्या कारणावरून वसतीगृहातून काढण्यात आले असे एक प्रकरण होते. वडीलांचं म्हणन होत की त्याला चुकीच्या पध्दतीने या केस मध्ये फसविण्यात आले. त्या मुलाचे वडील मला भेटायला आले, आपका मोबाईल नंबर मिला है, क्या आप मेरे बेटे पे लगाई गयी मराठी केसेस के बारे में अंग्रेजी मे ट्रान्सलेट करके दोगे?’. असे त्यांनी निरागसपणे विचारले. त्यांची अडचण बघता एका बापाचं दु:खही मला पहावत नव्हत, मी होकार दिला कामाला. मग पुढचे दोन दिवस त्यांनी मला त्यांच्या घरीच निवासी ठेवून घेतलं. मग दोन दिवसात जवळपास ८० मराठी पानांचे मी इंग्रजीत भाषांतर करून दिले. या काळात त्यांनी माझी खूप बडदास्त ठेवली. वेळेवर कॉफी, नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवन, रात्री झोपायचे कपडे पुरविले अशी सर्व व्यवस्था केली त्यांनी. हा ही एक अनुभव मला अनुवादाच्या कलेमुळे मिळाला.
        या शिवाय खूप हाय प्रोफाईल लोकांच्या घटस्फोटाच्या पोलीस केसेसच्या अनुवादाचे कामही केले मी, त्यातून सामाजिक प्रश्नाची भिषणताही कळली. बहुतेक केसेस मध्ये महिलांवरील अत्याचारच दृष्टीपथास येत असे.



                            महाराष्ट्र परिचय केंद्रात हिंदी प्रतिवेदकपदाची कारकीर्द
        सध्या महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ज्या कार्यालयात मी उपसंपादक म्हणून कार्यरत आहे तिथेच उमेदिच्या काळात मी हिंदी भाषा प्रतिवेदक अर्थात अनुवादक म्हणून कार्य करायचो.(जवळपास वर्षभर) यावेळी या कार्यालयातून प्रसिध्द करण्यात येणा-या मराठी बातम्या व लेख राष्ट्रीय प्रसार माध्यमांपर्यंत पोचविण्यासाठी मी याच बातम्या व लेख हिंदीतून अनुवादित करीत असे. इतर काम सांभाळून मी हे कार्य करीत असे. दर तीन महिन्यांनी या कार्यालयासोबत माझ्या कराराचे नुतनीकरण होत असे महिन्याला मला ५ हजार रूपये मानधन मिळत असे.  त्यामुळे मागे वळून पाहताना मज्जा येते.

        एकंदरीतच अनुवाद या कलेतून मला विविध विषय कळले व मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतील विविध शब्दांच्या छटा कळल्या. या सर्वांमुळे मला मोठा आर्थिक आधारही झाला. त्यामुळे मी खूप समाधानी आहे. या कार्यात जमीन व महसुलाबाबतच्या विविध टर्मीनोलॉजी समजून घेताना मला माझे मामा मंडळ अधिकारी श्रीयुत अविनाश पोटदुखे यांची तर माझे मित्र पोलिस निरीक्षक प्रमोद पाचकवडे यांची सुरुवातीच्या काळात खूप मदत झाली. या शिवाय त्या-त्या वेळी त्या-त्या क्षेत्रातील प्रत्येकांशी चर्चा करून मी माझ्याकडून उत्तम अनुवाद होइल व या जबाबदारीला न्याय देवू शकेल याचा पूर्ण प्रयत्न केला. या कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणा-या सर्वांचा मी खूप आभारी आहे.
                                                       ०००००००


Wednesday, June 6, 2018

लोकराज्य हिंदी



केंद्र शासनाला मे २०१८ मध्ये ४ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विशेषांक प्रकाशित झाला. या अंकात केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला विविध योजना व कार्यक्रमांमध्ये झालेला लाभ या विषयावरील लेख प्रसिध्द झाला. 








महाअहेड (इंग्रजी)


केंद्र शासनाला मे २०१८ मध्ये ४ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विशेषांक प्रकाशित झाला. या अंकात केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला विविध योजना व कार्यक्रमांमध्ये झालेला लाभ या विषयावरील लेख प्रसिध्द झाला. 










लोकराज्य गुजराती



केंद्र शासनाला मे २०१८ मध्ये ४ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विशेषांक प्रकाशित झाला. या अंकात केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला विविध योजना व कार्यक्रमांमध्ये झालेला लाभ या विषयावरील लेख प्रसिध्द झाला. 







लोकराज्य उर्दु




केंद्र शासनाला मे २०१८ मध्ये ४ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विशेषांक प्रकाशित झाला. या अंकात केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला विविध योजना व कार्यक्रमांमध्ये झालेला लाभ या विषयावरील लेख प्रसिध्द झाला. 










लोकराज्य मराठी





       केंद्र शासनाला मे २०१८ मध्ये ४ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विशेषांक प्रकाशित झाला. या अंकात केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला विविध योजना व कार्यक्रमांमध्ये झालेला लाभ या विषयावरील लेख प्रसिध्द झाला. 







Wednesday, May 30, 2018

व्हर्च्युअल होतोय आम्ही


माणसाच्या विकासाप्रमाणे त्याच्या संपर्क साधणांचा विकास झाला. राजा’ आपला संदेश दुसऱ्या राज्यात लखोटयावर लिहून दुताच्या माध्यमातून वा कबुत्तराच्या माध्यमातून पोचवत असे. हा काळनंतर पत्र व्यवहाराचा काळ, पुढे तंत्रज्ञानाचा विकास होत आज मोबाईल व अन्य डिजीटल गॅजेट्सच्या माध्यमातून क्षणात होणारा ये हृदयी चे ते हृदयी हा संवाद. काळानुसार तंत्रज्ञान बदललं वास्तव जीवन सोडून व्हर्च्युअल अर्थात आभासी जगात वावरणा-या प्रत्येकाला माणसासाठी तंत्रज्ञान की तंत्रज्ञानासाठी माणूस हे समजून घ्यायची आता वेळ आली आहे .
             
         प्रियकर आपल्या प्रेयसीला लपून -छपून पत्र लिहायचा,मग हे पत्र लपूनच मिळवायच ते वाचत आपल्या वेगळया भावविश्वात रमायचा असा तो काळ. त्यामुळे एकमेकांमध्ये प्रेमाचा ओलावा कायम असायचा आप-आपसात संयम राखून सर्व व्यवहार व्हायचे.आता मात्र, पहिल्याच भेटीत मोबाईलनंबर एक्सचेंज होतात भेटी नंतर मुलगा -मुलगी घरी जाईस्तोवर व्हाटसॲप किंवा फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून त्यांच्यात हाय-हॅलो होत व मग संवादाला सुरुवात. घरापासून दूर राहणारा मुलगा -मुलगीही  व्हीडीओ कॉलच्या माध्यमातून आपल्या आई-वडिलांशी थेट लाईव्ह संवाद साधू शकतो. या प्रातिनिधीक उदाहरणांतून एक बाब तर लक्षात आली की तंत्रज्ञानाने आपण वास्तव जीवनापेक्षा व्हर्च्युअल अर्थात आभासी जगात जास्त रमायला लागलो आणि माणसां-माणसांतील भावनिक नात्यातील ओलावा तर कोरडा ठाक होत नाहीये ना?  याबाबत अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे.



                   भारतात ८० च्या दशकात संगणक युगाची हाक देऊन तंत्रज्ञान सुलभ वातावरण निर्माण करण्यास सुरुवात झाली. या प्रवासात आज २०१८ मध्ये मोबाईल कंपन्यांचा देशभर सुळसुळाट झाला, त्यांच्यातील परस्पर स्पर्धेमुळे मोबाईल स्वस्त झाला व प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला, पर्यायाने प्रत्येकाच्या हातात जग आल. तंत्रज्ञानाने जग जवळ आल पण माणूस- माणसापासून लांब गेला हे वास्तवही जड अंत:करणाने सहन कराव लागत. जगाच्या पाठीवर घडणारी घटना क्षणात व्हॉटसपच्या माध्यमातून आपल्याला माहिती होते, हा झाला फायदा. आता यातील तोटा असा की, ती माहिती खरी असेलच याची शाश्वती नसते अन व्हाटसअपवर ही माहिती नियंत्रीत करणारी यंत्रणाही नाही त्यामुळे माहितीचा एकतर्फी मारा होत राहतो ज्यातील ९० टक्के माहिती चुकीची असते हा निष्कर्षही तज्ज्ञांकडून काढण्यात आला आहे. आता एका व्यक्तीकडे आलेली माहिती सहज चार जणांना फॉरवर्ड होते मग हे चार जण प्रत्येकी चार अशा सोळा जणांना पुढे पाठवतात. चुकीची माहिती वाचण्यात येवढे सर्व डोके विणाकारण एंगेज होतात. काही वेळा हेतुपुरस्सर माथे भडकविणारी व समाजात तेढ निमार्ण करणारी माहिती ही प्रसुत होते. हे अगदीच पायाभूत निरीक्षण आहे याशिवाय मोठया प्रमाणात बनावट कागदपत्रे तयार करणे, नौकरीचे आमीश दाखवून पैसा ट्रान्सफर करून घेणे असे सायबर गुन्हे मोठया प्रमाणात घडायला लागले.

घरातच आपल एकमेकांशी बोलण कमी झाल आणि तंत्रज्ञानाने आपल्या हातात आणून ठेवलेला मोबाईल वेळोवेळी बघत राहण हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक होऊन बसला. नुकतेच सरकारची चार वर्ष पूर्तीतील उपलब्धी वर्णन करताना केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांनी माहिती दिलह त्यानुसार १३० कोटी भारतीय जनतेपैकी १२० कोटी जनतेजवळ मोबाईल पोचला आहे हे ही येथे नमुद केले पाहिजे.  



                   


                              ‘डीजीटल डिटॉक्स कँप माहितीये तुम्हाला ?
                 जगतिक महासत्ता अर्थात अमेरिकेत या व्हर्च्युअल जगाच्या दुष्परीणामाची लागन झालीय. अमेरिकेतील २५ टक्के लोक हे दिवसांतून ५० वेळा मोबाईल बघतात तर ५० टक्के लोक १०० वेळा मोबाईल बघतात असा निष्कर्ष एका शोधात काढण्यात आला आहे. म्हणूनच मोबाईल सदृष्य डिजीटल साधणांमुळे या देशात माणसा-माणसांत निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी व त्यांच्यात परस्पर संवाद घडवून आणण्यासाठी, त्याला पूर्ववत आपल्या आनंदी जगण्याची अनुभूती करून देण्यासाठी येथे डीजीटल डिटॉक्स कँप आयोजित करण्यात येतात. या कँप मध्ये सहभागी होणा-या प्रत्येकाने सुरुवातीलाच आपल्याकडील मोबाईल व अन्य डिजीटल गॅजेटस जमा करावे लागतात. मग कँप सुरु झाला की एकमेकांचे नावही सांगायचे नाहीत हा दंडक पाळून प्रत्येकजण टोपण नावाने वागतो हे टोपण नावही नदी, ऋतू आदिंचे असते. वेगवेगळे खेळ, योगा, निसर्गाच्या सानिध्यात राहून माणसांनी माणसांसोबत बोलाव गप्पा माराव्या व डिजीटल युगात हरवलेला माणूस पुन्हा परत आणण्याचा खटाटोप म्हणजे हा कँप . अन्य देशांप्रमाणे भारतातही अशा कँपच्या आयोजनाची शक्यता नाकारता येणार नाही.

देशांचे प्रमुख व त्यांच्याकडील मोबाईल

            देश दुनीयेत आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजविणारे विविध देशांचे नेते आता या व्हर्च्युअल जगाचा भाग झाले आहेत, त्यांचेही विविध सोशल मीडिया अकाऊंट आले आहेत. सुरुवात करूया भारताच्या प्रधानमंत्र्यापासून श्री मोदी हे खूप मीडिया शॅवी आहेत विविध प्रसंगी त्यांनी घेतलेले सेल्फी आपण पाहिले आहेत. श्री. मोदी यांच्याकडे सुरुवातीला सॅमसंग कंपनीचा अँड्राइड मोबाईल होता आता आयफोन हा महागडा फोन ते वापरतात. इंग्लडच्या पंतप्रधान तेरेसा मे यांच्याकडे २०१७ पर्यंत अँड्राईड मोबाईल होता आता त्याही आयफोन वापरतात. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या मोबाईलवर कोणतेही अप्लीकेशन डाऊनलोड करण्यात आलेले नाही. श्रीमंत म्हणून गणला जाणा-या अरबचे सुल्तान मात्र, एक बेसिक नोकिया फोन आणि एक अँड्राईड फोन वापरतात. सतत अणुचाचण्या घेऊन जगाला धडकी भरविणारा उत्तर कोरियाचा प्रमुख किम जोंग याला २०११ मध्ये शेवटचे मोबाईल वापरताना बघितले होते. जगातील दुसरी महासत्ता रशीया व या देशाचे सलग ४ थ्यांदा  राष्ट्रपती बनून विक्रम करणारे  राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे कोणताही मोबाईल वापरत नाहीत व त्यांचे कोणतेही  सोशल मीडीया अकाउंट नाही.
            एकंदरीत मोबाईल व अन्य डिजीटल तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात गती आली ,बरेच सकारात्मक बदल झाले. मात्र,तंत्रज्ञानाच्या या व्हर्च्युअल अर्थात आभासी जगात माणूस-माणसांपासून दूर होणार नाही व अमेरीकेतील डीटॉक्स कँप भरविण्याची वेळ भारतात येणार नाही हीच अपेक्षा बाळगूण लेखनीला पूर्ण विराम.
                                                                         *****