Wednesday, March 31, 2021

परिचय केंद्राची ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ डॉ. विजय चोरमारे गुंफणार पहिले पुष्प

नवी दिल्ली, दि. १७ : थोर योध्दयांची ,संतांची व समाजसुधारकांची परंपरा असणा-या व विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणा-या महाराष्ट्र राज्य निर्मितीचे पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष हा सुवर्णयोग साधत परिचय केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमालेची’ १९ मार्च २०२१ रोजी सुरुवात होत आहे. कवी, लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमोरे हे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. ‘गेल्या ६० वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण’ या विषयावरील व्याख्यानाने डॉ. वियज चेारमारे हे १९ मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजता पहिले पुष्प गुंफणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत ६० वर्षांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने १९ मार्च ते १ मे २०२१ दरम्यान ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यान मालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होवून महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रगतीबाबत आपले विचार मांडणार आहेत. महाराष्ट्र परिचय केंद्राचाही हीरक महोत्सव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये १९६१ मध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करण्यात आली. राजधानीत महाराष्ट्राचे सांस्कृतिक दूतावास म्हणून हे कार्यालय ओळखले जाते . केंद्र व राज्य शासनातील दुवा म्हणून या कार्यालयाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या कार्यालयाने गेल्या ६० वर्षात यशस्वी वाटचाल केली आहे. राज्याचे व परिचय केंद्राचे स्थापना वर्षे असे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. विजय चोरमारे यांच्या विषयी डॉ. चोरमारे हे गेल्या ३३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दै.सकाळ (कोल्हापूर), दै. लोकमत ( कोल्हापूर आणि मुंबई) आणि दै.प्रहार (मुंबई), दै.महाराष्ट्र टाइम्स (कोल्हापूर आणि मुंबई) या वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. कोल्हापूर येथे सुरु झालेल्या दै.महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक म्हणून त्यांनी प्रारंभापासून जबाबदारी सांभाळली. 'बाबूराव पेंटर यांचे भारतीय चित्रपटांच्या विकासातील योगदान' या विषयावरील संशोधनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने त्यांना पीएचडी प्रदान केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारस्कारासह विविध पुरस्कार व फेलोशिफ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात आणि आतबाहेर सर्वत्र आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिध्द झाले आहेत. देवाशपथ खरं लिहीन आणि मुजरा या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लिखाण केले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे संपादन व अनुवाद केले आहे. दुपारी 12 वाजता समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण होणार शुक्रवार 19 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वरून तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi या युटयुब चॅनेल वर पाहता येणार आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi 000000 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४७/दिनांक १७.०३.२०२१

Monday, March 15, 2021

वासुदेव विष्णु मिराशी

वासुदेव विष्णु मिराशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक १३ मार्च १८९३ ला रत्नागिरी जिल्हयातील कुवळे येथे जन्म कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूल व राजाराम महाविद्याल आणि पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापकाची नौकरी, याच काळात त्यांनी ‘अद्वैतब्रह्यसिद्धि’ या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले नागपूर येथील मॉरिस कॉलेज व अमरावती येथील किंग एडवर्ड कॉलेज मध्ये प्राध्यापक व प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली एपिग्राफिया इंडिका (खंड २१–१९३१) यात त्यांचा पुराभिलेखासंबंधीचा पहिला शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यानंतरच त्यांनी ‘कालिदास’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले. ‘सातवाहन’, ‘वाकाटक’, ‘कलचुरी-चेदी’, ‘शिलाहार’ इ. प्राचीन राजवंशांचे पुराभिलेख त्यांनी संकलित आणि संपादित करून ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले कोरीव लेखांच्या आधारे त्यांनी ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख’ , ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काल’ , ‘कलचुरी नृपति आणि त्यांचा काल’ , ‘शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख’ हे चार प्रमुख ग्रंथ लिहिले संस्कृत साहित्याच्या संशोधनपूर्वक अभ्यासातून ‘कालिदास’, ‘मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक’ आणि ‘भवभूति’ ही तीन पुस्तके प्रसिद्ध केली पुराभिलेखाइतकाच नाणकशास्त्राचा त्यांचा व्यासंग मोठा व सखोल होता. या विषयातील त्यांचे चाळीसहून अधिक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध आहेत. १९४१ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही उपाधी दिली. १९५६ मध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि १९६१ मध्ये राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना ताम्रपट देण्यात आले. भारतीय मुद्राशास्त्र परिषद, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद व भारतीय इतिहास परिषद यांचे त्यां अध्यक्षपद भूषविले सागर, मुंबई, नागपूर आणि संपूर्णानंद (वाराणसी) या विद्यापीठांनी डी.लिट्‌. ही सन्मान्य पदवी त्यांना बहाल केली. मिराशी यांनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले तर सुरुवातीचे त्यांचे लेखन मराठीत आहे. त्यांच्या निवडक ग्रंथांची भारतातील प्रादेशिक भाषांतून– विशेषतः हिंदी, ओडिया, कन्नड – भाषांतरे झाली आहेत. मिराशी यांचे जवळपास ३८ ग्रंथ व चारशेहून अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झाले १९७५ मध्ये साहित्य अकादमीने प्रमाणपत्र व अधिछात्रवृत्ती देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला १९७५ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण हा मानाचा नागरी सन्मान देवून गौरविले

अभिनेते शाहू मोडक

अभिनेते शाहू मोडक मराठी चित्रपटसृष्टीतील अद्वितीय व्यक्तिमत्व २५ एप्रिल १९१८ रोजी त्यांचा जन्म ‘श्यामसुंदर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. ‘श्यामसुंदर’ हा भारतातला पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती. शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया साकारल्या . त्यांनी २९ चित्रपटांत श्रीकृष्णाची भूमिका साकारली. त्यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत. ‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत शांता हुबळीकर होत्या. माणूस, औट घटकेचा राजा, संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी भगत, झाला महार पंढरीनाथ आदी मराठी-हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत.

अभिनेते शाहू मोडक

अभिनेते शाहू मोडक मराठी चित्रपटसृष्टीतील अद्वितीय व्यक्तिमत्व २५ एप्रिल १९१८ रोजी त्यांचा जन्म ‘श्यामसुंदर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. ‘श्यामसुंदर’ हा भारतातला पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती. शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया साकारल्या . त्यांनी २९ चित्रपटांत श्रीकृष्णाची भूमिका साकारली. त्यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत. ‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत शांता हुबळीकर होत्या. माणूस, औट घटकेचा राजा, संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी भगत, झाला महार पंढरीनाथ आदी मराठी-हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत.