दिल्ली म्हणजे विविध क्षेत्रातील दिग्गजांची मांदीयाळी. या शहरात दिग्गजांना विविध जबाबदारी पाळताना किंवा आश्चर्यकारकपणे भेटण्याची संधी आली. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी हा लेखन प्रपंच.औचित्य भाारतीय कम्युनिष्ट पक्षाचे(भाकप) ज्येष्ठ नेते ए.बी. बर्धन यांचे दिनांक २ जानेवारी २०१६ या नविन वर्षाच्या प्रारंभीच रात्री ८.३० वाजता येथील जी.बी.पंत इस्पितळात दिर्घ आजाराने झालेले निधन. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत दिल्लीत कार्यरत आमच्या महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयाच्यावतीने आम्ही राज्यातील विविध विभागातील पत्रकारांसाठी दिल्ली अभ्यास दौ-याचे आयोजन करीत असू. आम्ही २०१३ पासून या आयोजनाला सुरुवात केली त्यातील हा सहावा पत्रकार दौरा १५ ते २१ जानेवारी २०१४ या कालावधित आयोजित या पत्रकार दौ-याच्या दुस-या दिवशी आम्ही. येथील 'आयटीओ' भागातील 'अजोय भवन' या इमारतीतस्थित असलेल्या भाकप च्या मुख्यालयात भेटीसाठी गेलो. या पत्रकार दौ-यात सहभागी बहुतेक पत्रकार है ज्येष्ठ असल्याने त्यांचा राजकीय व संघाटनात्मक बाबींचा दांडगा अभ्यास होता. त्यात ज्या नेत्याने महाराष्ट्रातून नागपूर येथूनच आपल्या राजकीय व संघटनात्मक कार्याला सुरुवात केली असे ज्येष्ठ भाकप नेते ए.बी.बर्धन यांना भेटण्यासाठी सर्वचजण उत्सुक होते.
अभ्यासू, जनतेत मिसळून काम करणारे आणि प्रखर देशप्रेमी म्हणून देशातील डाव्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ओळखले जातात. पक्षाचे राष्ट्रीय कार्यालय म्हटल्या नंतर प्रत्येकांनाच असे वाटले होते की फार मोठे कार्यालय असावे पण असे नव्हते. या इमारतीवरील सातवा माळा त्यावर अन्य कार्यालये आणि त्यात भाकपचे मुख्यालय असेच काहीसे चित्र होते. त्यात एका रूमवर ए.बी.बर्धन्ा यांच्या नावाची पाटी झळकत होती. सिरस्त्याप्रमाणे आम्हाला पक्षकार्यालयातील बैठक सभागृहात बसविण्यात आले. सर्वजन आसनस्थ होत असतानाच ए.बी.बर्धन यांचा सभागृहात प्रवेश होतो आणि ते सर्वांना विचारतात 'कसा राहिला तुमचा महाराष्ट्र ते दिल्ली प्रवास? ' हा मराठी आवाज ऐकूनच उपस्थितांच्या चेह-यावर प्रेमळ व आपल्या माणसांसाठीचा भाव झळकत होता.
मग प्रत्येकाने आपआपला परिचय दिला. ए.बी.नी अतिशय गांभीर्याने प्रत्येकाच्या परिचयातच त्या-त्या पत्रकाराच्या भागातील भाकप कार्यकर्त्यांच्या नावानीशी संघटनेच्या कामाबद्दलही हातोहात चौकशी केली. यातून त्यांच्या संघटनात्मक पकडीची झलक बघायला मिळाली. ए.बीं नी भाकपच्या विद्यार्थी विंगचे नेतृत्व केले व ते महाराष्ट्र विधानसभेतही निवडून गेले. त्यांनी पक्ष संघटनेत मोलाचे योगदान दिले. हाच कार्यकर्ता १९९२ मधे दिल्लीत जेथे देशाचे सत्ताकारण चालते त्या शहरात येतो पक्षाचा संघटक आज त्याच पक्षाच्या महासचिव या सर्वोच्च पदाची यशस्वी धुरा सांभाळतो हा ए.बीं चा राजकीय प्रवास त्यांच्याच शब्दातून ऐकताना प्रत्येकाला हा दुर्मीळ संवाद ऐकण्याचे भाग्य लाभले होते. ए.बीं नी देशातील भांडवलदार आणि राजकीय पक्षांमधे असलेले साटे लोटे त्यातून घडणारे मोठाले स्कॅम पर्यायाने जनतेची होणारी पिडवणूक या सर्वबांबीवर अभ्यासूपूर्ण मांडणी केली.
कम्युनिष्ट पक्षाची दिर्घकाळ सत्ता राहिलेल्या पश्चिम बंगाल राज्यात जन्मलेले ए.बी. बर्धन यांनी महाराष्ट्रात येऊन सुरु केलेली राजकीय कारकीर्द. दिल्लीत येवून राष्ट्रीय राजकारणात त्यांनी सोडलेली छाप. आणि या संघर्षमय जिवनाचा दिर्घ आजाराने दिल्लीतच झालेला अंत. बघताना समजून घेताना मोठया विचारक व देशाच्या महान सूपूत्राला अभिवाद करताना शिर स्वाभीमाने उंचावते. कॉमरेड तुम्हाला लाल सलाम.



